शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

पॉस मशीन ताब्यात घेण्याचा राष्टवादीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:22 IST

गोरगरीब जनतेच्या रेशन धान्याचा काळाबाजार न होता गरीब रेशन कार्डधारकांना योग्य लाभ मिळावा, याकरिता पीओस मशीनच्या आधारे धान्य वाटप केले जात आहे. परंतु पीओस मशीनद्वारे केल्या जाणाऱ्या धान्य वाटपात गोंधळ निर्माण झाला असून, रेशन दुकानावर स्वस्त धान्य घेण्यासाठी गरीब जनतेला प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

नाशिक : गोरगरीब जनतेच्या रेशन धान्याचा काळाबाजार न होता गरीब रेशन कार्डधारकांना योग्य लाभ मिळावा, याकरिता पीओस मशीनच्या आधारे धान्य वाटप केले जात आहे. परंतु पीओस मशीनद्वारे केल्या जाणाऱ्या धान्य वाटपात गोंधळ निर्माण झाला असून, रेशन दुकानावर स्वस्त धान्य घेण्यासाठी गरीब जनतेला प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांचा पाढा वाचत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शरद कोशिरे, निवृत्ती अरिंगळे, अशोक सावंत, संजय खैरनार, अशोक पाटील मोगल, मनोहर बोराडे, बाळासाहेब मते यांनी निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले.  रेशन धान्य दुकानातील धान्य वाटपात गोंधळ निर्माण झाला असून, स्वस्त धान्य घेणाºया गरीब जनतेला या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गरीब कुटुंबातील रेशन कार्डधारकांची नावे आधार कार्ड देऊनही लिंक न झाल्याने तसेच काहींच्या बोटांचे ठसे मशीनशी जुळत नसल्याने रेशन धान्य दुकानदार त्यांना धान्य देत नाही. त्यामुळे गरीब जनतेला पोटाला चिमटा देत जीवन जगावे लागत आहे. तसेच स्वस्त धान्य घेणाºया नागरिकांमध्ये मोलमजुरी व धुणीभांडी करणाºया महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले आहेत. त्यांच्या बोटांचे ठसे पीओएस मशीनमध्ये येत नसल्याने संबंधित अधिकारी येईपर्यंत नागरिकांना चार-चार तास रेशन दुकानांसमोर ताटकळत उभे रहावे लागत असल्याने त्यांचा दिवसाचा रोजगार बुडत आहे.  पीओएस मशीनवर बहुतांशी कार्डधारकांची नावेच नाहीत, तर ज्यांची नावे आहेत त्यांच्या बोटांचे ठसे मशीनमध्ये जुळत नाही. त्यातच मशीनला अनेकदा नेटवर्क मिळत नसल्याने गोरगरिबांना स्वस्त धान्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. रेशन धान्याचा काळाबाजार न होता गरीब रेशन कार्डधारकांना योग्य लाभ मिळावा याकरिता पीओस मशीनच्या आधारे धान्य वाटप केले जात आहे. तसेच गरीब जनतेला या पद्धतीने धान्य घेताना काही अडचणी येऊ नये व आल्यास त्या सोडविण्याकरिता अधिकाºयांची नेमणूक केली आहे. मात्र हे अधिकारी कुठेच फिरताना दिसत नसल्याने व जनतेला यातील काही माहिती नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.  यावेळी जयप्रकाश गायकवाड, अ‍ॅड. चिन्मय गाढे, मकरंद सोमवंशी, राजेश जाधव, प्रफुल्ल पाटील, नवराज रामराजे, संतोष भुजबळ, मुन्ना अन्सारी, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस