शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 14:26 IST

शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेच्या समस्या, महागाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, रस्त्यांच्या समस्या, उद्योग, रोजगारात झालेली घसरण, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न, ढासळलेली शिक्षण व्यवस्था, आरोग्याच्या समस्या, कुपोषण यांसारख्या विविध समस्यांवर भाजप सपशेल अपयशी

ठळक मुद्दे सर्वच तालुक्यांच्या तहसीलदार कार्यालयांवर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.विविध समस्यांवर भाजप-शिवसेना युती सरकारने तातडीने लक्ष घालावे अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

नाशिक दि.२८ (प्रतिनिधी) :- गेल्या ३ वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप -शिवसेना युती सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेच्या समस्या, महागाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, रस्त्यांच्या समस्या, उद्योग, रोजगारात झालेली घसरण, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न, ढासळलेली शिक्षण व्यवस्था, आरोग्याच्या समस्या, कुपोषण यांसारख्या विविध समस्यांवर भाजप-शिवसेना युती सरकारने तातडीने लक्ष घालावे अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत दिंडोरी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून हल्लाबोल आंदोलन करण्यात आले होते. आज मंगळवार दुसऱ्या दिवशी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार श्री.शेवाळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दि.३० नोव्हेंबर रोजीपर्यंत सर्वच तालुक्यांच्या तहसीलदार कार्यालयांवर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयBJPभाजपाGovernmentसरकार