शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

पाणी सोडल्यास राष्ट्रवादी करणार पालकमंत्र्यांना नाशिक बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 15:32 IST

नाशिक जिल्हासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात दुष्काळाची झळ बसत असताना नाशिकचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जायकवाडी धरणात सध्या ५६ टक्के पाणीसाठा असतानासुद्धा नाशिकच्या हक्काचे ७ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याची

राष्ट्रवादी कॉँग्रेस : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदननाशिक : नाशिकच्या दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करूनच जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात घ्यावा तसेच नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणास दिल्यास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाशिक बंदी करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्हासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात दुष्काळाची झळ बसत असताना नाशिकचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जायकवाडी धरणात सध्या ५६ टक्के पाणीसाठा असतानासुद्धा नाशिकच्या हक्काचे ७ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याची गरज काय? असा प्रश्न नाशिककरांना पडलेला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यांना खुश करण्यासाठी शासनाने अभ्यास न करता हा निर्णय घेतला असून, त्याची किंमत तहानलेल्या दत्तक नाशिककरांना चुकवावी लागणार आहे. शासनाने नाशिकच्या दुष्काळी जिल्ह्यातील परिस्थितीचा अभ्यास करावा व त्यानुसार जनहितार्थ पुढील निर्णय घ्यावा. नाशिककरांवर अन्याय होणारा निर्णय जलसंपदा विभागाने घेऊन जायकवाडी धरणास पाणी सोडले तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाशिक बंदी करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. यावेळी शहराध्यक्ष अंबादास खैरे, अ‍ॅड. चिन्मय गाढे, रोहन नहिरे, किरण मानके, नवराज रामराजे, नीलेश सानप, डॉ. संदीप चव्हाण, भूषण गायकवाड, सुनील घुगे, राकेश जाधव, योगेश लगरे, रोहित जाधव, राज रंधावा, राहुल घोडे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक