शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा परिषदेचा ट्रक रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 19:39 IST

नाशिक: कोल्हा पूर आणि सांगली येथील पूर आपत्तीमुळे येथील जीवनमान विस्कळीत झाले असून रोजगार, आरोग्य आणि अन्नधान्याचा मोठा प्रश्न ...

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी; पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे योगदान

नाशिक: कोल्हापूर आणि सांगली येथील पूर आपत्तीमुळे येथील जीवनमान विस्कळीत झाले असून रोजगार, आरोग्य आणि अन्नधान्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पूरग्रस्तांचे आश्रू पुसण्यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला असून जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला एक ट्रक कोल्हापूरकडे रवाना करण्यात आला.जिल्हा परिषद आवारात सकाळी अध्यक्षा शितल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, बांधकाम सभापती मनिषा पवार, आरोग्य व शिक्षण सभापती यतीन पगार, समाजकल्याण सभापती सुनिता चारोस्कर, महिला बालकल्याण समिती सभापती अपर्णा खोसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. यामध्ये १७ लक्ष रु पयांपर्यतच्या वस्तुंचा समावेश आहे.अतिवृष्टीमुळे कोल्हापूर व सांगली जिल्हयात शहरे व गावे पूरपाण्यामुळे अद्यापपर्यत पूर्णपणे वेढलेली आहेत. त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा मिळणे दुरापास्त झाले आहे. कोल्हापूर जिल्हयातील प्रशासकीय यंत्रणेने व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून मानवतेच्या दृष्टीकोनातून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी नाशिक जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, कर्मचारी व विविध कर्मचारी संघटना यांना वस्तू स्वरु पात धान्य, व जिवनावश्यक मुलभूत साहित्य परिषदेस जमा करण्याबाबत आवाहन केलेले होते. या आवाहनास प्रतिसाद म्हणून ग्रामसेवक संघटना, औषध निर्माण अधिकारी संघटना, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटना, नर्सेस संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, पशु वैद्यकीय अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना यांच्यासह जिल्हा परिषदेच्या कर्मचा-यांनी वैयिक्तक स्वरु पात मोठया प्रमाणात वस्तु जिल्हा परिषदेच्या पूरग्रस्तांसाठीच्या मदतीसाठी जमा केल्या.

टॅग्स :floodपूरRainपाऊस