शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जिल्हा परिषद कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 17:20 IST

जिल्हा परिषद सर्व संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या  प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी शासन वेळकाढूपणा करीत असल्याने आगामी काळात जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या वतीने आंदोलन उभारले जाईल, असा इशारा जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या वतीने देण्यात आला. नाशिकमध्ये आयोजित राज्यभरातील १६ संघटनांच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देप्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी शासनाची वेळ काढू भूमिका सातवा वेतन आयोगासाठी तरतूद करून आयोग लागू करावा

नाशिक : जिल्हा परिषद सर्व संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या  प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी शासन वेळकाढूपणा करीत असल्याने आगामी काळात जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या वतीने आंदोलन उभारले जाईल, असा इशारा जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या वतीने देण्यात आला. नाशिकमध्ये आयोजित राज्यभरातील १६ संघटनांच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला.राज्यातील सर्व जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांची बैठक नाशिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य युनियनचे राज्याध्यक्ष बलराज मगर, लेखा कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष विजयसिंग सूर्यवंशी व आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण खरमाटे यांनी शासनाच्या भूमिकेवर टीका करीत आंदोलनाचा प्रसंग आल्याचे नमूद केले.वेतन त्रुटी दूर करून त्यात सुधारणा करून ग्रेड पे वाढविणे, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे, कर्मचारी कपात धोरण तत्काळ थांबवून रिक्त पदे भरणे, सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू करणे आदी मागण्यांबाबत संघटनांनी वेळोवेळी राज्याच्या ग्रामविकासमंत्री, अर्थमंत्री व मुख्यमंत्री यांना निवेदने व प्रत्यक्ष भेटी घेऊन शासनाला अजूनही या प्रश्नांकडे बघण्यासाठी वेळ मिळालेला नाही, असे बलराज मगर यांनी म्हटले. तर याकामी शासन अतिशय उदासीन असून, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे लेखा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजयसिंग सूर्यवंशी यांनी म्हटले.जिल्हा परिषद कर्मचारी हा तळागाळातील कर्मचारी असून, ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यामध्ये प्रामुख्याने शेती, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, समाज कल्याण, पाणीपुरवठा, बांधकाम इ. महत्त्वाच्या योजनांसाठी तालुक्याच्या ठिकाणी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सेवा बजावत आहेत; मात्र शासन या घटकाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे मत संघटनेचे कार्याध्यक्ष विजयकुमार हळदे यांनी व्यक्त केले.शासनाने तमाम जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे तत्काळ लक्ष घालून त्या मंजूर कराव्यात व येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातवा वेतन आयोगासाठी तरतूद करून आयोग लागू करावा अशा सर्व संघटनांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण खैरनार यांनीदेखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अतिशय नाराजी व्यक्त केली.

 

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashikनाशिक