शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

राज्य हगणदारीमुक्त नव्हे शौचालययुक्त?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 16:17 IST

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्र  हगणदारीमुक्त झाला असून, प्रत्येकाच्या दारात शौचालय उभे असल्याचा दावा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून करण्यात आला ...

ठळक मुद्दे लोक उघड्यावर शौचास बसत असल्याचे वास्तव

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्र  हगणदारीमुक्त झाला असून, प्रत्येकाच्या दारात शौचालय उभे असल्याचा दावा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी तर याबाबतची अधिकृत घोषणाच करून टाकली. दुसरीकडे गावकऱ्यांनी शौचालयात जावे यासाठी विविध उपक्रमांतून अजूनही प्रयत्न सुरू असेल, तर मग महाराष्ट्र  खरेच हगणदारीमुक्त झाला आहे का हा संशोधनाचा विषय ठरावा.राज्यात सुमारे ६० लाखांपेक्षा अधिक शौचालये बांधण्याचा दावा करण्यात आलेला आहे. केवळ शौचालयाच्या संख्येवरून राज्य हगणदारीमुक्त झाले असे कसे म्हणता येईल? फारतर शौचालययुक्त महाराष्ट्र  म्हणणे अधिक संयुक्तिक आहे. ग्रामीण आणि शहरी भागात अजूनही लोक उघड्यावर शौचास बसत असल्याचे वास्तव शासनाच्याच्या ‘गुडमॉर्निंग’ पथकाने उघड केले आहे. इतकेच कशाला अशा ‘टमरेल’ बहाद्दरांवर कारवाई करणाºया अधिकाºयांना पिटाळून लावण्यात येत असल्याची उदाहरणे राज्यात घडली आहेत. याचाच अर्थ उघड्यावरील शौचास मज्जाव करणाºयांनाच गावात ‘मज्जाव’ करण्यात आला असल्याने ग्रामस्थांची मानसिकताही अधोरेखित झाली आहे.स्वच्छ महाराष्ट्र  अभियानांतर्गत राज्यात व्यापक स्वरूपात शौचालये बांधण्याचे आव्हानात्मक काम महाराष्ट्र ने केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. राज्य हगणदारीमुक्त करून दाखविले असे त्यांनी म्हटले आणि दुसरीकडे लोकांना शौचालयात जाण्याची सवय लावण्यासाठी गुडमॉर्निंग पथक, दरवाजा बंद, शिट्टी असे उपक्रम (नव्हे प्रयोग) करून पाहिले आहेत. आता वारकºयांच्या माध्यमातून ‘प्रबोधन’ करण्याचा प्रयोग हाती घेण्यात येत असेल तर हा सारा खटाटोप अप्रत्यक्षपणे राज्य हगणदारीमुक्त नाही हे सांगण्यासाठीच आहे, असे म्हटले जात असेल तर वावगे ते काय?खरेतर राज्य हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा करण्याची मोठी घाई सरकारला झाली आणि वास्तव समोर आल्यानंतर प्रबोधन हा दुसरा टप्पा असल्याची सारवासारव होऊ लागली. शौचालयांचे बांधकाम झाल्यानंतर लागलीच त्याचा वापर होणार नाही हे सरकारलाही माहीत आहे. आता होत असलेल्या विविध उपाययोजनाही लगेच फलद्रूप होतील, असेही नाही. यासाठी वेळ जाऊ द्यावा लागेल. ही प्रदीर्घ प्रक्रिया राबविण्याची आवश्यकता आहे. शासन, प्रशासन आणि नागरिकही अनुकूल आहेत. पण काहीकाळ नक्कीच लागू शकतो. वाद किंवा घाई श्रेयासाठी असून शकते. तूर्तास राज्य हगणदारीमुक्त नव्हे शौचालययुक्त झाले एवढे समजले तरी पुरेसे आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद