शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:54 IST

नाशिक :  महाराष्ट  ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कर्मचाºयांवर कारवाई करण्याच्या कारवाईवरून मुख्य कार्याकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यातील अधिकारावरून निर्माण झालेल्या वादात अखेर मुख्य कार्यकारी अधिकाºयांची कारवाई ग्राहय धरण्यात आली असून संबंधित कर्मचाºयांची सेवा समाप्तीचे आदेश जिल्हाधिकाºयांनी काढले आहेत.महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मालेगाव येथील सहायक प्रकल्प अधिकाºयास मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची कारवाई: ‘त्या’ दोन्ही कर्मचाºयांची सेवासमाप्त तक्रारी असल्याने यासाठी चौकशी समिती गठीत

नाशिक:  महाराष्ट  ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कर्मचाºयांवर कारवाई करण्याच्या कारवाईवरून मुख्य कार्याकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यातील अधिकारावरून निर्माण झालेल्या वादात अखेर मुख्य कार्यकारी अधिकाºयांची कारवाई ग्राहय धरण्यात आली असून संबंधित कर्मचाºयांची सेवा समाप्तीचे आदेश जिल्हाधिकाºयांनी काढले आहेत.महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मालेगाव येथील सहायक प्रकल्प अधिकाºयास मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी गेल्या मे महिन्यात कार्यमुक्त केल्यामुळे जिल्ह्यात वादंग निर्माण झाले होते. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी यामध्ये हस्तक्षेप करून यासाठी बैठक घेतली होती. तसेच नाशिक मुख्यालय व मालेगाव येथील कर्मचाºयांची आपसी बदली केली होती. मात्र तरीदेखील दोन्ही कर्मचारी कामावर हजर न होता संघटनात्मक दबाव टाकत असल्याने जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दोन्ही कर्मचाºयांची सेवा समाप्त करण्याचे आदेश दिल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत घेतलेला निर्णय योग्य होता यावर शिक्कामोर्तब झाले आहे.गेल्या मे महिन्यात मालेगाव येथे आढावा बैठकीप्रसंगी जिल्हा परिषद प्रशासनाची परवानगी न घेता अनुपिस्थत राहिलेल्या प्रकरणी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कंत्राटी पद्धतीने कार्यरत सहायक प्रकल्प अधिकारी मयूर पाटील व तांत्रिक अधिकारी रजनीकांत सूर्यवंशी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी सेवेतून कार्यमुक्त केले होते. मात्र यावरून मोठा वादंग निर्माण झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्या अस्थापनेचा कर्मचारी असल्याचे सांगत सदर कर्मचाºयांची नाशिक मुख्यालयात बदली तर मुख्यालयातील कर्मचाºयाची मालेगाव येथे बदली केली होती. या दोघांनीही अर्ज तसेच निवेदन देवून संघटनात्मक दबाव टाकून प्रशासकीय कामात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. जिल्हाधिकारी यांनी आदेश देवूनही सदर दोन्ही कर्मचारी कामावर रु जू होत नसल्याने दोन्ही सहायक प्रकल्प अधिकाºयांची सेवा समाप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यानी दिले आहेत.विशेष म्हणजे मालेगाव येथील मयूर पाटील यांची सेवा ७ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सेवेतून मुक्त केले तेव्हापासून समाप्त करण्यात आली आहे. तर सचिन पाटील यांची सेवा ४ आॅगस्ट पासून समाप्त करण्यात आली आहे.दरम्यान, मालेगाव येथील सहायक प्रकल्प अधिकारी मयूर पाटील व तांत्रिक अधिकारी रजनीकांत सूर्यवंशी यांच्याविरूद्ध विविध प्रकारच्या तक्रारी असल्याने यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद