शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नाशिकची साक्षी दुबे : फेसबुकवरील एका पोस्टमुळे केला संपर्क श्वानाच्या भूतदयेने मनेका गांधी पोहोचल्या तिच्यापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:16 IST

सांयकाळी साडेपाच वाजेची वेळ.. सिडकोतील महाराणा प्रताप चौकात वर्दळ सुरू असतानाच वाहनाच्या ठोकरेने जखमी झालेले कुत्रे अधिकच विव्हळू लागले.

ठळक मुद्देकुत्र्याला उडवून गाड्या पुढे जाऊ लागल्याजखमी कुत्र्याला प्राणिमित्र संस्थेकडे पोहोचवले

नाशिक : सांयकाळी साडेपाच वाजेची वेळ.. सिडकोतील महाराणा प्रताप चौकात वर्दळ सुरू असतानाच वाहनाच्या ठोकरेने जखमी झालेले कुत्रे अधिकच विव्हळू लागले. त्याच्या वेदनेने मात्र कोणाला कणव आली ना दु:ख झाले. उलट रस्त्याच्या मधोमध असलेल्या या कुत्र्याला उडवून गाड्या पुढे जाऊ लागल्या. कुत्र्यांचं जिणं त्याच्या नशिबी असे आले असताना ती मात्र देवदुतासारखी धावून आली. स्वत:च जायंबदी असताना तिने कुत्र्याला संरक्षण दिले आणि वाहनचालकांना जाणीव करून दिली. चौकातील मुलांमध्ये ती चेष्टेचा विषय ठरत असताना तिने त्याकडे दुर्लक्ष करून त्या जखमी कुत्र्याला अखेर एका प्राणिमित्र संस्थेकडे पोहोचवले. तिची ही कामगिरी मात्र सोशल मीडियाने थेट प्राणिमित्र तसेच केंद्रीय महिला तथा बालविकासमंत्री मनेका गांधी यांच्यापर्यंत पोहोचली आणि कौतुकाची थाप त्यांनी दिली.शहरातील या घटनेने समाजातील निर्दयीपणा उघड झाला, परंतु कुठे तरी संवेदनशील मन जागृत असल्याचे दिसून आले. सोमवारी (दि.१८) सायंकाळी सिडकोत घडलेल्या मन विषण्ण झाले त्या मुलीचे नाव साक्षी दुबे. बीवायके महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला शिकणारी साक्षीचा हात फॅक्चर असून, ती डॉक्टरांकडे जात असताना रस्त्याच्या मधोमध जखमी अवस्थेत असलेला कुत्रा बघून तिचे मन हळहळले. रस्त्यावरील वाहतुकीचा विचार न करता साक्षीने त्या कुत्र्याला वाचविण्याचे प्रयत्न केले. ‘शरण’ या जखमी प्राण्यांना मदत करणाºया संस्थेला फोन केला आणि त्यांची मदत पोहोचेपर्यंत कुत्र्याला संरक्षण दिले. जखमी अवस्थेतील हे कुत्रे बाजूला ठेवण्याच्या अवस्थेतही नव्हते. अखेरीस पाऊण तासाने शरण संस्थेची मदत करणारी व्हॅन घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत साक्षीने खूपच वेगळे अनुभव घेतले. रस्त्यात उभ्या असणाºया साक्षीची काहींनी चेष्टा केली, तर काहींनी तो कुत्रा मरणारच आहे कशाला विनाकरण रस्ता अडवते, असा प्रश्न केला. परंतु ती तेथेच उभी राहिली.

प्राणी मित्र म्हणून काम वाढविण्याचा दिला सल्लाएका जखमी आणि मरणासन्न कुत्र्याला नेटाने वाचवल्यानंतर शरण या संस्थेने आपल्या फेसबुक पेजवर त्याची माहिती पोस्ट केली, ती थेट मनेका गांधी यांच्यापर्यंत पोहोचली. दुपारी साक्षीला थेट दिल्लीवरून फोन आला आणि मनेका गांधी बोलणार असल्याचे सहायकाने सांगितले. काही क्षणातच मनेका गांधी बोलू लागल्या त्यांनी साक्षीचे कौतुक तर केलेच, परंतु नाशिकमध्ये प्राणिमित्र म्हणून काम वाढव, त्यासाठी काही मदत लागेल तर मदत करण्याचा सल्ला दिला. तसेच स्वत:चा व्यक्तिगत मेल आयडीही दिला. साक्षी प्राणिमित्र आहेच, परंतु मनेका गांधी यांच्या आश्वासक शब्दामुळे तिला पाठबळ मिळाले.