शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नाशिकच्या तपमानाने चाळिशीकडे वाटचाल

By admin | Updated: April 20, 2015 01:31 IST

नाशिकच्या तपमानाने चाळिशीकडे वाटचाल

नाशिक : अनेक दिवसांपासून अवकाळीचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता पावसापासून दिलासा मिळाला असला, तरी काही दिवसांपासून सुरू झालेल्या उकाड्यामुळे नाशिककर हैरान झाले आहेत. दुपारच्या वेळी लागणाऱ्या उन्हाच्या झळांमुळे रस्ते सुनसान होत आहेत. नाशिकच्या तपमानाने चाळिशीकडे वाटचाल सुरू केली आहे. गेल्या ५ दिवसांत ज्या वेगाने तपमानात वाढ झाली ते पाहिले तर या महिनाअखेरीस तपमान चाळिशी गाठेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उन्हाळा लागल्यानंतरही दर पंधरा दिवसांत हजेरी लावणाऱ्या अवकाळीमुळे वातावरणातील विषमता निर्माण झाली होती. तपमानही ३० ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यानच होते. त्यातच स्वाइन फ्लू आजारानेही डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीही निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत मागील आठवड्यापर्यंत असलेल्या ढगाळ वातावरणाने पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली होती. त्यादरम्यान पावसाने शहरात केवळ हजेरीच लावल्याने त्यानंतर सुरू झालेल्या तपमानवाढीत सातत्य राहिल्याने मार्च अखेरीस पाऱ्याने चाळिशीकडे वाटचाल सुरू केली आहे. शनिवारपासून ३८ अंशांवर पोहोचलेल्या पाऱ्याने खऱ्या अर्थाने वैशाख वणवा काय असतो हे दाखवून दिले. पाच दिवसांत तपमानाचा पारा २३ पासून थेट ३८ वर पोहोचला आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात कमी-जास्त झालेला पारा पाहिला तर येत्या काही दिवसांत पारा ४०च्या पार जाण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. दुपारच्या वेळेस वाढलेल्या उष्म्यामुळे गजबजलेले रस्तेही त्यामुळे दुपारच्या वेळेस निर्मनुष्य झाले होते. जे काही मोजके नागरिक बाहेर पडलेले दिसत होते त्यांनीही उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी, गॉगल आणि पंचा यांचा आधार घेतला होता. शीतपेये आणि रसवंतीगृहावर नागरिकांची गर्दी दिसू आली. बर्फाच्या गोळ्याची चव चाखण्यासाठीही लहान मुलांनी हजेरी लावली. (प्रतिनिधी)