शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या तपमानाने चाळिशीकडे वाटचाल

By admin | Updated: April 20, 2015 01:31 IST

नाशिकच्या तपमानाने चाळिशीकडे वाटचाल

नाशिक : अनेक दिवसांपासून अवकाळीचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता पावसापासून दिलासा मिळाला असला, तरी काही दिवसांपासून सुरू झालेल्या उकाड्यामुळे नाशिककर हैरान झाले आहेत. दुपारच्या वेळी लागणाऱ्या उन्हाच्या झळांमुळे रस्ते सुनसान होत आहेत. नाशिकच्या तपमानाने चाळिशीकडे वाटचाल सुरू केली आहे. गेल्या ५ दिवसांत ज्या वेगाने तपमानात वाढ झाली ते पाहिले तर या महिनाअखेरीस तपमान चाळिशी गाठेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उन्हाळा लागल्यानंतरही दर पंधरा दिवसांत हजेरी लावणाऱ्या अवकाळीमुळे वातावरणातील विषमता निर्माण झाली होती. तपमानही ३० ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यानच होते. त्यातच स्वाइन फ्लू आजारानेही डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीही निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत मागील आठवड्यापर्यंत असलेल्या ढगाळ वातावरणाने पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली होती. त्यादरम्यान पावसाने शहरात केवळ हजेरीच लावल्याने त्यानंतर सुरू झालेल्या तपमानवाढीत सातत्य राहिल्याने मार्च अखेरीस पाऱ्याने चाळिशीकडे वाटचाल सुरू केली आहे. शनिवारपासून ३८ अंशांवर पोहोचलेल्या पाऱ्याने खऱ्या अर्थाने वैशाख वणवा काय असतो हे दाखवून दिले. पाच दिवसांत तपमानाचा पारा २३ पासून थेट ३८ वर पोहोचला आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात कमी-जास्त झालेला पारा पाहिला तर येत्या काही दिवसांत पारा ४०च्या पार जाण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. दुपारच्या वेळेस वाढलेल्या उष्म्यामुळे गजबजलेले रस्तेही त्यामुळे दुपारच्या वेळेस निर्मनुष्य झाले होते. जे काही मोजके नागरिक बाहेर पडलेले दिसत होते त्यांनीही उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी, गॉगल आणि पंचा यांचा आधार घेतला होता. शीतपेये आणि रसवंतीगृहावर नागरिकांची गर्दी दिसू आली. बर्फाच्या गोळ्याची चव चाखण्यासाठीही लहान मुलांनी हजेरी लावली. (प्रतिनिधी)