शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

गटबाजीच्या तक्रारीतून नाशिकचे मंत्रीपद हुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 14:38 IST

नाशिक शहरात भाजपाचे तीन आमदार निवडून आलेले असले तरी, या सर्वांमध्ये बाळासाहेब सानप सर्वांर्थाने वरचढ ठरले असून, त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून पक्षावर ताबा तर मिळविलाच परंतु पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून शासकीय यंत्रणेवरही आपला धाक निर्माण केला आहे. पक्ष संघटनेची धुरा त्यांच्या खांद्यावर असल्यामुळे नियुक्त्या,

ठळक मुद्देराणें नकोचा सूर : मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने पेच गडदआगामी मंत्रीपदापासून सानप यांचा पत्ता कट करणे हाच असल्याचा हेतू लपून राहिलेला नाही. 

नाशिक : शहरातील तीन आमदारांचे तीन दिशेला असलेली तोंडे व त्यातुन एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न दवडता स्वत:चे घोडे दामटवण्यातील अग्रेसरपणातून उफाळून आलेली भाजपांतर्गंत गटबाजीला आळा घालण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागल्यामुळे त्याचा परिणाम थेट नाशिकला मिळू (?) पाहणा-या मंत्रीपदावर गंडातर येण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे. विधानपरिषदेवर नाशिकमधून जाण्याचे स्वप्न पाहणाºया नारायण राणे यांना याच कारणावरून पक्षांतर्गंंत छुपा विरोध करून मंत्रीपदासाठी लॉबींग करताना वाढीस लागलेली गटबाजी एकमेकांचे पत्ते कापण्यासाठी मारक ठरणार आहे.नाशिक शहरात भाजपाचे तीन आमदार निवडून आलेले असले तरी, या सर्वांमध्ये बाळासाहेब सानप सर्वांर्थाने वरचढ ठरले असून, त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून पक्षावर ताबा तर मिळविलाच परंतु पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून शासकीय यंत्रणेवरही आपला धाक निर्माण केला आहे. पक्ष संघटनेची धुरा त्यांच्या खांद्यावर असल्यामुळे नियुक्त्या, नेमणूकांमध्ये त्यांचा वरचष्मा असणे साहजिक असले तरी, असे करतांना त्यांनी पद्धतशीरपणे पक्षाच्या अन्य आमदारांना व त्यांच्या समर्थकांचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याची प्रचिती महापालिका निवडणूकीत सर्वांनाच आल्याने खºया अर्थाने तेव्हापासूनच गटबाजीला उधाण आले असून, महापौरपद असो वा उपमहापौर सत्तेचे सारी पदे सानप यांनी स्वत:च्या ताब्यात ठेवल्यामुळे महापालिकेच्या कारभारातही त्यांचा हस्तक्षेप ओघाने आल्यामुळे अन्य आमदारांचे महत्व त्यातून कमी झाले आहे. आता तीन वर्षानंतर राज्यमंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा पुन्हा जोर धरू लागल्याने सानप यांच्या वाढत्या वर्चस्वामुळे त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडण्याचा छातीठोक दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात असतानाच त्यांच्या विरोधात दोन आमदार व एका खासदाराने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यामागे खरे तर हेच कारण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सानप यांचे पक्षांतर्गंत वर्चस्व गेल्या अडीच वर्षापासून असून या दरम्यानच्या काळात मुख्यमंत्र्यांचे डझनभर नाशिक दौरे झाले आहेत, तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देखील वरचेवर अनेकवार येऊन गेल्याने त्यावेळी सानप यांच्याविरोधात तक्रारी करण्याची पुरेपूर संधी सानप विरोधकांना उपलब्ध होती, मात्र त्यावेळी सबुरीने घेणा-यांनी आताच तक्रार करण्यामागची खेळी आगामी मंत्रीपदापासून सानप यांचा पत्ता कट करणे हाच असल्याचा हेतू लपून राहिलेला नाही. 

टॅग्स :BJPभाजपाNashikनाशिक