शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

गटबाजीच्या तक्रारीतून नाशिकचे मंत्रीपद हुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 14:38 IST

नाशिक शहरात भाजपाचे तीन आमदार निवडून आलेले असले तरी, या सर्वांमध्ये बाळासाहेब सानप सर्वांर्थाने वरचढ ठरले असून, त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून पक्षावर ताबा तर मिळविलाच परंतु पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून शासकीय यंत्रणेवरही आपला धाक निर्माण केला आहे. पक्ष संघटनेची धुरा त्यांच्या खांद्यावर असल्यामुळे नियुक्त्या,

ठळक मुद्देराणें नकोचा सूर : मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने पेच गडदआगामी मंत्रीपदापासून सानप यांचा पत्ता कट करणे हाच असल्याचा हेतू लपून राहिलेला नाही. 

नाशिक : शहरातील तीन आमदारांचे तीन दिशेला असलेली तोंडे व त्यातुन एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न दवडता स्वत:चे घोडे दामटवण्यातील अग्रेसरपणातून उफाळून आलेली भाजपांतर्गंत गटबाजीला आळा घालण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागल्यामुळे त्याचा परिणाम थेट नाशिकला मिळू (?) पाहणा-या मंत्रीपदावर गंडातर येण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे. विधानपरिषदेवर नाशिकमधून जाण्याचे स्वप्न पाहणाºया नारायण राणे यांना याच कारणावरून पक्षांतर्गंंत छुपा विरोध करून मंत्रीपदासाठी लॉबींग करताना वाढीस लागलेली गटबाजी एकमेकांचे पत्ते कापण्यासाठी मारक ठरणार आहे.नाशिक शहरात भाजपाचे तीन आमदार निवडून आलेले असले तरी, या सर्वांमध्ये बाळासाहेब सानप सर्वांर्थाने वरचढ ठरले असून, त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून पक्षावर ताबा तर मिळविलाच परंतु पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून शासकीय यंत्रणेवरही आपला धाक निर्माण केला आहे. पक्ष संघटनेची धुरा त्यांच्या खांद्यावर असल्यामुळे नियुक्त्या, नेमणूकांमध्ये त्यांचा वरचष्मा असणे साहजिक असले तरी, असे करतांना त्यांनी पद्धतशीरपणे पक्षाच्या अन्य आमदारांना व त्यांच्या समर्थकांचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याची प्रचिती महापालिका निवडणूकीत सर्वांनाच आल्याने खºया अर्थाने तेव्हापासूनच गटबाजीला उधाण आले असून, महापौरपद असो वा उपमहापौर सत्तेचे सारी पदे सानप यांनी स्वत:च्या ताब्यात ठेवल्यामुळे महापालिकेच्या कारभारातही त्यांचा हस्तक्षेप ओघाने आल्यामुळे अन्य आमदारांचे महत्व त्यातून कमी झाले आहे. आता तीन वर्षानंतर राज्यमंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा पुन्हा जोर धरू लागल्याने सानप यांच्या वाढत्या वर्चस्वामुळे त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडण्याचा छातीठोक दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात असतानाच त्यांच्या विरोधात दोन आमदार व एका खासदाराने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यामागे खरे तर हेच कारण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सानप यांचे पक्षांतर्गंत वर्चस्व गेल्या अडीच वर्षापासून असून या दरम्यानच्या काळात मुख्यमंत्र्यांचे डझनभर नाशिक दौरे झाले आहेत, तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देखील वरचेवर अनेकवार येऊन गेल्याने त्यावेळी सानप यांच्याविरोधात तक्रारी करण्याची पुरेपूर संधी सानप विरोधकांना उपलब्ध होती, मात्र त्यावेळी सबुरीने घेणा-यांनी आताच तक्रार करण्यामागची खेळी आगामी मंत्रीपदापासून सानप यांचा पत्ता कट करणे हाच असल्याचा हेतू लपून राहिलेला नाही. 

टॅग्स :BJPभाजपाNashikनाशिक