शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्रामार्फत पंतप्रधानांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 16:17 IST

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्यावतीने कृषी उन्नती मेळावा आणि भारतातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कृषी चर्चासत्रा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभासी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सुमारे तीनशेहून अधिक शेतकरी उपस्थित विद्यापीठाच्या कृषीविज्ञान केंद्रातर्फे थेट प्रक्षेपण

नाशिक : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्यावतीने कृषी उन्नती मेळावा आणि भारतातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कृषी चर्चासत्रा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभासी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषीविज्ञान केंद्राने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले.मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांसाठी  निरनिराळे प्रकल्प राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना मोठ्या पडद्यावर पंतप्रधानांचेशेतकऱ्यांना संबोधन पाहण्याची आणि ऐकण्याची संधी कृषी विद्यान केंद्राने शेतकऱ्यांसाठी  नुकतीच उपलब्ध करून दिली होती. यासाठी नाशिक जिल्ह्यातील सुमारे तीनशेहून अधिक शेतकरी उपस्थित होते.यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन उपस्थित होते. प्रा. वायुनंदन यांनीशेतकऱ्यांना रासायनिक खतांचा मर्यादित वापर करून सेंद्रिय शेती करण्यावर भर देण्याचे आवाहन केले.शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीवर भर देताना आपल्या जमिनीचे आरोग्यही सांभाळणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येक शेतºयांकडे जमीन आरोग्य पत्रिका असणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विद्यान केंद्रात उपलब्ध माती आणि पाणी परीक्षण सुविधेचा लाभ घ्यावा व आवश्यकतेनुसारच रासायनिक खतांचा वापर करावा असे सांगितले. यावेळी शेतकऱ्यांना शेळीपालन या विषयावर केंद्राचे पशुसंवर्धन तज्ञ डॉ. श्याम पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रस्ताविक केंद्राचे प्रमुख राजाराम पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन केंद्राचे उद्यानविद्या तज्ञ प्रा. हेमराज राजपूत यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठagricultureशेती