शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

मराठा आरक्षणाबाबत सरकारने ठोस भूमिका घेणे अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 19:22 IST

नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने आपली ठोस भूमिका स्पष्ट केली पाहिजे. केवळ प्रसिद्धीसाठीची विधाने करणे सरकारला शोभणारे नाही, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. सरकार नेमके काय करणार आहे याची काहीही स्पष्टता नसल्याने आपण मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीस जाणार नसल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : मराठा आरक्षणाबाबत निव्वळ विधाने मराठा आमदारांनी दिलेले राजीनामे हे निव्वळ नौटंकी

नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने आपली ठोस भूमिका स्पष्ट केली पाहिजे. केवळ प्रसिद्धीसाठीची विधाने करणे सरकारला शोभणारे नाही, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. सरकार नेमके काय करणार आहे याची काहीही स्पष्टता नसल्याने आपण मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीस जाणार नसल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात त्यांना विचारले असता मराठा आरक्षणाकडे सकार गांभीर्याने पाहत नसल्याने त्यांची भूमिका कळत नसल्याचे म्हटले. सरकारने अगोदर आपली भूमिका जाहीर केली पाहिजे. आरक्षण देण्याची तयारी असल्याचे सरकार म्हणत असले तरी हे केवळ सवंग प्रसिद्धीसाठी केलेले विधान असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.कोणत्या निकषावर आरक्षण देता येऊ शकते, याबाबत मराठा कार्यकर्त्यांचा विश्वास हा मराठा नेत्यांवर आहे. त्यामुळे इतर कुणी याबाबत स्पष्ट भूमिका मांडत नाही. कुणी अशी भूमिका मांडली तर त्यावर लागलीच ‘रियॅक्शन’ येऊ शकेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सायमन कमिशन समोर मांडलेला ‘मागासलेपण’ यावरूनच पुढे आरक्षणाची रेघ ओढता येऊ शकते, असा बचावात्मक पवित्रा घेत आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आमदारांनी दिलेले राजीनामे हे निव्वळ नौटंकी आहे, अशा शब्दात राजीनामा नाट्यावर टीका केली तर आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे असे म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना आपण फारसे महत्त्व देत नसल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.--इन्फो--शरद पवार यांचे विधान खूष करण्यासाठीराष्टÑवादीचे नेते शरद पवार यांनी घटनेत दुरुस्ती झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. परंतु घटनेत नेमकी कोणती दुरुस्ती करावी, हे त्यांनी स्पष्ट केले असते तर त्यावर चर्चा होऊ शकली असती अन्यथा मराठा समाजाला खूष करण्यासाठीचे विधान एवढाच त्याचा अर्थ काढता येऊ शकतो, असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारण