शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील वीजपुरवठा वारंवार विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 14:45 IST

राज्यात सर्वत्र सुरळीत वीजपुरवठा सुरू असून कुठेही भारनियमन नसल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला असला तरी नाशिक शहरात मात्र दररोज वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. वीजपुरवठा खंडीत होण्यामागचे कारण महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याला सांगता येत नसल्याने ग्राहक संभ्रमात असून महावितरणकडून छुपे भारनियमन राबविले जात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

ठळक मुद्देग्राहकांच्या तक्रारी : भारनियमन नसल्याचा दावा वाढत्या उन्हामुळे घरोघरी पंखे आणि कुलर्सचा वापर

नाशिक : राज्यात सर्वत्र सुरळीत वीजपुरवठा सुरू असून कुठेही भारनियमन नसल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला असला तरी नाशिक शहरात मात्र दररोज वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. वीजपुरवठा खंडीत होण्यामागचे कारण महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याला सांगता येत नसल्याने ग्राहक संभ्रमात असून महावितरणकडून छुपे भारनियमन राबविले जात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.नाशिकचा पारा चाळीस अंशापर्यंत पोहचल्याने कडाक्याच्या उन्हामुळे नाशिककर घामाघुम झालेले आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असल्यामुळे मे मंिहन्यातील ऊन्हाळा नागरिकांना आताच असह्य होऊ लागला आहे. वाढत्या उन्हामुळे घरोघरी पंखे आणि कुलर्सचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शहरात दररोज कुठे ना कुठे वीजपुरवठा गायब होत असल्यामुळे नाशिककरांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषता: गंगापूररोड, शरणपूररोड,महात्मानगर, सातपूर, सिडको तसेच पंचवटीच्या काही परिसरात वीजपुरवठा खंडीत होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नाशिकरोड परिसरातही अनेक भागात काहीवेळ वीजपुरवठा खंडीत होऊन पुर्ववत होत असल्याच्या तक्रारी आहेत. वीजेचा लपंडाव ही आता नित्याचीच बाब झाल्याने नेमकी तांत्रिक अडचण काय आहे याविषयी ग्राहक संभ्रमावस्थेत आहेत.खंडीत वीजपुरवठ्याचा हा प्रकार रहिवासी आणि व्यावसायिक क्षेत्रातही अलिकडे वाढीस लागला आहे. या संदर्भात वीज कर्मचाºयांना विचारणा केल्यानंतर त्यांना याबाबत पुरेशी माहिती नसते. टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर मुख्य कारण कळण्यासाठी ग्राहमाकला किमान तासभर तरी वाट पहावी लागते. टोल फ्री यंत्रणा संपुर्णपणे तांत्रिक असून संबंधित व्यक्तीकडून ग्राहकाला नेमके कारण कधीच सांगितले जात नाही किंबहूना या यंत्रणेला स्थानिक वीजपुरवठ्याच्या बाबतीतल कोणतेही बारकावे माहित नसतात. केवळ थोड्याच वेळात वीजपुरवठा सुरळीत होईल असे सांगितले जाते. वास्तविक ही संपुर्ण यंत्रणा वेळकाढूपणाची आणि परावलंबी असून यामुळे ग्राहकांचे कोणतेही हित साधले गेले नसल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Power Shutdownभारनियमनmahavitaranमहावितरण