शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शहरातील वीजपुरवठा वारंवार विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 14:45 IST

राज्यात सर्वत्र सुरळीत वीजपुरवठा सुरू असून कुठेही भारनियमन नसल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला असला तरी नाशिक शहरात मात्र दररोज वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. वीजपुरवठा खंडीत होण्यामागचे कारण महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याला सांगता येत नसल्याने ग्राहक संभ्रमात असून महावितरणकडून छुपे भारनियमन राबविले जात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

ठळक मुद्देग्राहकांच्या तक्रारी : भारनियमन नसल्याचा दावा वाढत्या उन्हामुळे घरोघरी पंखे आणि कुलर्सचा वापर

नाशिक : राज्यात सर्वत्र सुरळीत वीजपुरवठा सुरू असून कुठेही भारनियमन नसल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला असला तरी नाशिक शहरात मात्र दररोज वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. वीजपुरवठा खंडीत होण्यामागचे कारण महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याला सांगता येत नसल्याने ग्राहक संभ्रमात असून महावितरणकडून छुपे भारनियमन राबविले जात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.नाशिकचा पारा चाळीस अंशापर्यंत पोहचल्याने कडाक्याच्या उन्हामुळे नाशिककर घामाघुम झालेले आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असल्यामुळे मे मंिहन्यातील ऊन्हाळा नागरिकांना आताच असह्य होऊ लागला आहे. वाढत्या उन्हामुळे घरोघरी पंखे आणि कुलर्सचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शहरात दररोज कुठे ना कुठे वीजपुरवठा गायब होत असल्यामुळे नाशिककरांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषता: गंगापूररोड, शरणपूररोड,महात्मानगर, सातपूर, सिडको तसेच पंचवटीच्या काही परिसरात वीजपुरवठा खंडीत होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नाशिकरोड परिसरातही अनेक भागात काहीवेळ वीजपुरवठा खंडीत होऊन पुर्ववत होत असल्याच्या तक्रारी आहेत. वीजेचा लपंडाव ही आता नित्याचीच बाब झाल्याने नेमकी तांत्रिक अडचण काय आहे याविषयी ग्राहक संभ्रमावस्थेत आहेत.खंडीत वीजपुरवठ्याचा हा प्रकार रहिवासी आणि व्यावसायिक क्षेत्रातही अलिकडे वाढीस लागला आहे. या संदर्भात वीज कर्मचाºयांना विचारणा केल्यानंतर त्यांना याबाबत पुरेशी माहिती नसते. टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर मुख्य कारण कळण्यासाठी ग्राहमाकला किमान तासभर तरी वाट पहावी लागते. टोल फ्री यंत्रणा संपुर्णपणे तांत्रिक असून संबंधित व्यक्तीकडून ग्राहकाला नेमके कारण कधीच सांगितले जात नाही किंबहूना या यंत्रणेला स्थानिक वीजपुरवठ्याच्या बाबतीतल कोणतेही बारकावे माहित नसतात. केवळ थोड्याच वेळात वीजपुरवठा सुरळीत होईल असे सांगितले जाते. वास्तविक ही संपुर्ण यंत्रणा वेळकाढूपणाची आणि परावलंबी असून यामुळे ग्राहकांचे कोणतेही हित साधले गेले नसल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Power Shutdownभारनियमनmahavitaranमहावितरण