शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट होणार गडद; अनेक दिवसांपासून पाणीकपातीची चर्चा

By suyog.joshi | Updated: January 3, 2024 14:04 IST

गेल्या अनेक दिवसांपासून पाणीकपातीची चर्चा सुरू आहे.

नाशिक (सुयोग जोशी) : गेल्या अनेक दिवसांपासून पाणीकपातीची चर्चा सुरू आहे. पाणीकपात होणार की टळणार या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रोषाला सामोरे जायला नको म्हणून महापालिका प्रशासन पाणी कपातीचा निर्णय घेणे टाळत असली तरी हा निर्णय घेण्यास जेवढा उशीर होईल तेवढे नंतर जादा प्रमाणात पाणी कपातीला सामोरे जावे लागेल. सद्यस्थितीत १८ दिवसांचा शाॅर्टफाॅल असून चर न खोदल्यास उन्हाळ्यात हमखास पाणी कपात लागू करावी लागेल. चर खोदण्याबाबत मनपा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही.

समन्यायी पाणी वाटप निर्णयानुसार नाशिकमधील गंगापूर व दारणा समूहातून तीन टीएमसी पाणी जायकवाडीला सोडायला लागले. परिणामी नाशिककरांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आली. मनपाने जलसंपदाकडे वर्षभरासाठी ६१०० दलघफू पाण्याची मागणी केली होती. मात्र त्यापैकी ५३०० दलघफू पाणी मंजूर करण्यात आले. त्यामुळे पाचशे दलघफू पाण्याची कमतरता आहे. मनपासमोर उपलब्ध जलसाठ्यात ३१ जुलैपर्यंत नाशिककरांची तहान भागविण्याची कसरत करावी लागणार आहे. जलसंपदाने गंगापूर धरणातील ६०० दलघफू मृत जलसाठा वापरण्यास परवानगी दिली असली तरी हे पाणी वापरण्यासाठी चर खोदावा लागेल. त्याशिवाय हे पाणी वापरता येणार नाही. ५३०० दलघफू पाण्याचा विचार केला तर त्यात वर्षभर नाशिककरांची तहान भागवायची असेल तर १८ दिवसांचा तुटवडा निर्माण होत आहे. मनपाकडून पाणी कपातीचा निर्णय घेण्यास जेवढी टाळाटाळ केली जाईल तेवढा हा शाॅर्टेज वाढत जाणार आहे.चर खोदण्याचा सल्ला

गंगापूर धरणातील सहाशे दलघफू मृत जलसाठा वापरण्यासाठी मनपाने धरणात चर खोदावा असा सल्ला जिल्हा प्रशासनाने दिला आहे. मात्र तरी देखील मनपाकडून चर खोदण्याबाबत कोणतीही हालचाल दिसत नाही. जेव्हा उन्हाळ्यात पाणी टंचाई भीषण होईल तेव्हा मनपाला चर खोदण्यास जाग येईल अशी शक्यता आहे.