शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

नाशिककर सावरकर प्रेमीची राहुल गांधी यांना नोटीस; 16 मार्चला नाशिकच्या न्यायालयात सुनावणी

By संजय पाठक | Updated: February 10, 2024 09:57 IST

अनुद्गार प्रकरणी नाराजी

नाशिक- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी काढलेल्या कथित वादग्रस्त विधान  प्रकरणी नाशिकचे सावरकर प्रेमी तथा निर्भय फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी नाशिकच्या न्यायालयात दावा दाखल केला आहे.

न्यायालयाने भुतडा यांचा जबाब नोंदवला असून पुढील सुनावणी 16 मार्चला होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ८ ऑक्टोबर २०२२ रोजी  हिंगोली येथे तर १७ नोव्हेंबर २०२२ रोजी अकोला येथील सभेत सावरकर यांच्यावर टीका केली होती सावरकर हे केवळ दोन-तीन महिने जेलमध्ये होते तसेच सदाशिव रानडे नामक आपल्या एका सहकाऱ्यामार्फत त्यांनी स्वतःचे जीवन चरित्र लिहून घेतले आणि स्वतःला स्वातंत्र्यवीर अशी पदवी लिहून घेतली अशी टीका राहुल गांधींनी केली होती त्याचबरोबर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी राहुल सावरकरांचे संबंध असल्याचाही आरोप केला होता. या संदर्भात निर्भय फाउंडेशनचे अध्यक्ष  देवेंद्र भुतडा यांनी एडवोकेट मनोज पिंगळे यांच्यामार्फत राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर नाशिकच्या न्यायालयात दावा दाखल केला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे अंदमान येथील कारागृहात तब्बल बारा वर्षे होते ६ जानेवारी १९२४ रोजी त्यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली. त्यामुळे राहुल गांधी यांचा दावा चुकीचा आहे स्वातंत्र्यवीर ही पदवी सावरकरांनी स्वतः सहकाऱ्याकडून देऊन घेतली, याचेही कोणते पुरावे आढळत नाहीत त्याचप्रमाणे सावरकर हयात असताना भाजपची स्थापना देखील झाली नव्हती, सावरकर यांचा हिंदू महासभा हा स्वतंत्र पक्ष होता त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप तथ्यहीन असून त्यांच्या विधानामुळे सावरकर प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी माफी मागावी किंवा केलेल्या आरोपा संदर्भात पुरावे सादर करावे अशी मागणी पुतळा यांनी न्यायालयात केली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी