शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

तीन प्रवासी नियम लागू होताच रिक्षाभाडेवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 17:00 IST

भगूर : रिक्षामध्ये तीनच प्रवासी बसविण्याच्या निर्णयामुळे रिक्षाचालकांनी प्रवासी भाड्यात वाढ केली असून, त्यानुसार भगूर ते नाशिकरोड रिक्षाचे प्रवासी ...

ठळक मुद्देदहा रुपयांची वाढ : प्रवासी वर्गात मात्र नाराजी

भगूर : रिक्षामध्ये तीनच प्रवासी बसविण्याच्या निर्णयामुळे रिक्षाचालकांनी प्रवासी भाड्यात वाढ केली असून, त्यानुसार भगूर ते नाशिकरोड रिक्षाचे प्रवासी भाडे आता तीस रुपये इतके झाले आहे. या भाडेवाढीमुळे प्रवासी वर्गात नाराजी असताना चालकांनी मात्र पोलिसांच्या नियमावर खापर फोडले आहे. भाडेवाढ प्रवाशांना परवडत नसल्याचे काही रिक्षाचालकांचे म्हणणे असले तरी त्याशिवाय पर्याय नसल्याचेही म्हटले आहे.भगूर बसस्थानक ते नाशिकरोड बिटको प्रवासादरम्यान रिक्षाचालकांनी सध्याच्या वीस रुपये भाडे दरात दहा रु पये वाढ केली आहे. त्याप्रमाणेच भगूर देवळाली कॅम्पपर्यंत पाच रु पयांची भाडेवाढ केल्याने प्रवासी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भगूर ते बिटको वीस रु पये इतकेच भाडे होते. बसलादेखील तितकेच तिकीट पडत असल्याने प्रवासी बसची वाट न पाहता थेट रिक्षाचा प्रवास करीत होते. शिवाय पूर्णांकात भाडे असल्याने सुट्टे पैशांची अडचणी येत नव्हती. त्यामुळे प्रतिसाद चांगला होता.त्याबरोबरच भगूर ते देवळाली कॅम्प १० रु पये प्रतिसीट याप्रमाणे असे रिक्षाभाडे होते. आता तेथेही वाढ करण्यात आलेली आहे. गेल्या ८ जून रोजी पोलिसांनी रिक्षाचालकांची बैठक घेऊन रिक्षात फक्त तीनच प्रवासी घेऊन वाहतूक करण्याचा सक्त आदेश दिल्याने रिक्षाचालकांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी ८ जूनपासून भगूर ते देवळाली कॅम्प १५ रुपये, भगूर ते बिटको ३० रु पये, भगूर ते देवळाली रेल्वेस्टेशन २० रु पये रिक्षाभाडे घेण्यास सुरु वात केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकPublic Transportसार्वजनिक वाहतूक