शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

धडधड वाढते ‘लसीकरणात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 17:34 IST

गोवर-रुबेला लसीकरण मोहिम २०१८-१९ राज्यभर राबविली जात आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात ९० टक्के लसीकरण झाल्यामुळे जिल्ह्याची आरोग्य ...

ठळक मुद्देविश्लेषण

गोवर-रुबेला लसीकरण मोहिम २०१८-१९ राज्यभर राबविली जात आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात ९० टक्के लसीकरण झाल्यामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आपलीच पाठ थोपटून घेताना दिसते. शंभर टक्केकडे वाटचाल करताना यंत्रणेचा या कामात हुरूप वाढणेही स्वाभाविकच. परंतु लसीकरणाची टक्केवारी एकीकडे वाढत असताना पालकांमध्ये लसीकरणाबाबत असलेली धडधड थांबलेली नाही हेही यंत्रणेला विसरून चालणार नाही. मात्र जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून वारंवार याबाबतीत पालकांनाच दोष दिला जात असेल तर यंत्रणेने आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता नक्कीच आहे. लसीकरणानंतर काही बालकांना त्रास झाल्याचे आणि काहींना रिअ‍ॅक्शन आल्याची प्रकरणे काही खोटी नाहीत. जिल्ह्यातही असे प्रकार घडलेले आहे. इतकेच नव्हे तर येवला तालुक्यातील अंदरसूल येथे एका बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोपही झाला. असे असतानाही जर आरोग्य विभाग पालक आणि बालकांनाच दोष देणार असेल तर मोहिमेतील हा स्वार्थीपणाच म्हटला पाहिजे. ज्या बालकांसाठी ही मोहीम आहे त्यांना कोणतीही वैद्यकीय अडचण उद्भवू नये म्हणून दक्षता घेतली जाते असे सांगितले जात असेल तर त्याचाही ढोल बडविण्याचे कारण नाही. आरोग्य यंत्रणेची ही जबाबदारीच आहे. मुद्दा आहे तो पालक आणि बालकांमधील भीती दूर करण्याचा. पालकांच्या मनात या लसीकरणाबाबत शंका असल्याचे वास्तव असतांना सरसकट बालकांचे लसीकरण करणे संयुक्तिक वाटत नाही. असे करण्यापूर्वी वैद्यकीय पूर्वइतिहास असलेल्या बालकांची माहिती मिळविणे अपेक्षित होते असे वाटते. मात्र आरोग्य आणि शिक्षणखात्याने याबाबतचे गांभीर्य दाखविलेले नाही. सर्वबालकांची शारीरिक, मानसिक आणि वैद्यकीय पार्श्वभूमीसारखी नसते हे कुणीही मान्य करेल. त्यामुळेच पालक आपल्या बाळाला लसीकरण करावे की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत असतील तर त्यांची मानसिकता समजावून घेणेही महत्वाचे ठरते. तसे न झाल्याने लसीकरणाचे विपरित परिणाम समोर आले आणि आरोग्य विभागाकडे बोट दाखविले गेले. अशाही परिस्थितीत लसीकरणाची टक्केवारी वाढली असेल तर ती लसीकरणाच्या सक्तीमुळे आणि याच सक्तीमुळे पालकांच्याही मनातील धडधड वाढली आहे हेही नाकारून चालणार नाही.

 

टॅग्स :NashikनाशिकMedicalवैद्यकीय