शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

विजेच्या यंत्रापासून दूर साजरी करा होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 16:46 IST

नाशिक : होळी , धुळवड आणि रंगपंचमी सणाचा उत्साह साजरा करताना कोणताही अपघात घडू नये यासाठी महावितरणने ग्राहकांना विजेपासून ...

ठळक मुद्देमहावितरणचे आवाहन : रंग खेळतानाही अपघाताचा धोका

नाशिक : होळी, धुळवड आणि रंगपंचमी सणाचा उत्साह साजरा करताना कोणताही अपघात घडू नये यासाठी महावितरणने ग्राहकांना विजेपासून दूर राहत सणाचा आनंद लुटण्याचा सल्ला दिला आहे. विजेच्या यंत्रणेजवळ आग, पाणी यांचा संपर्क आल्यास दुर्घटना घडू शकते ही शक्यता गृहित धरून अशा प्रकारच्या सणाच्या काळात अपघाताचा धोका टाळण्यासाठी ग्राहकांना सूचना करण्यात आलेल्या आहेत.सणाच्या काळात उत्साहाच्या भरात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जाते. यातून अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे बालगोपाळांनी काळजी आणि दक्षता घेण्याबरोबरच पालकांनीदेखील आपल्या पाल्यांच्या खेळण्याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. त्यांना धोक्याची कल्पना देण्याच्यादृष्टीने महावितरणने विजेच्या संभाव्य धोक्याबाबत ग्राहकांना आवाहन केले आहे.रंगोत्सव साजरा करताना पाण्याचा फवारा वीज वाहिन्यांपर्यंत उडणार नाही याची खबरदारी घ्यावी, रंग भरलेले फुगे परस्परांवर टाकताना ते वीज वितरण यंत्रणांना लागणार नाहीत, ओल्या शरीराने वीज वितरण यंत्रणांना स्पर्श करू नये, विजेच्या खांबाभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी, घरात होळी खेळताना वीजमीटर, विजेचे प्लग, वीजतारा व वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करावा, ओल्या हाताने या वस्तू हाताळू नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.होळी पेटवितानादेखील दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे महावितरणने म्हटले आहे. जेथे होळी पेटवायची आहे तेथे सभोवताली वीज वाहिन्या किंवा रोहित्र नाहीत ना याची खातरजमा करूनच होळी पेटवावी. अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडणे व यातून अपघाताचा धोका संभवतो.

टॅग्स :NashikनाशिकHoliहोळी