शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नाशिककरांनी घेतला किल्ले जीवधनच्या संवर्धनाचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 16:54 IST

जानोरी : नाशिकच्या स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेने जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधनच्या कल्याण दरवाजा पायरी मार्गाच्या संवर्धनाचा ध्यास घेतला असून, पर्यटकांकडून संस्थेच्या स्वयंसेवकांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.

ठळक मुद्देस्वराज्य संवर्धन बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम

किल्ले जीवधनच्या कल्याण दरवाजाच्या वरचा पायरी मार्ग ब्रिटिश काळात सुरुंग लावून फोडण्यात आला होता व तो मोठमोठ्या दगडांनी गाडला गेला होता. स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या स्वयंसेवकांकडून ते दगड फोडून मोकळा करण्यासाठी सुरुवात केली. विशेष म्हणजे रात्री १२ वाजता नाणेघाट येथे मुक्काम करून सकाळी किल्ल्यावरील सात पाय-ऱ्यांवरील मोठमोठे दगड फोडून व ते दगड किल्यावर संवर्धित केले. २२० किलोमीटरचा प्रवास करुन आलेल्या स्वयंसेवकांचे संवर्धन कार्य पाहून त्याठिकाणी येणार्‍या पर्यटकांनी संस्थेचे कौतुक केले. संवर्धनासाठी प्रवीण भेरे, भाऊसाहेब चव्हाणके, भाऊसाहेब कुमावत, सजन फलाने, नितीन ठाकरे, मयूर घुले, पंकज ठाकरे, प्रवीण घोलप , आशिष घोलप, नितीन देशमुख, करण कानडे, शुभम मेधने, समाधान जाधव, अमोल शिरसाठ, अक्षय उगले, गौरव पाटील, प्रशांत देशमुख, वैभव झनकर, नीलेश शिंदे, साईराज जाधव, बापू गांगुर्डे यांनी योगदान दिले. पस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी ट्रेलचे विश्वस्त विनायक खोत, विजय कोल्हे, प्रशांत केदारी व रमेश खरमाळे यांनी संवर्धन कार्यात सहभागी होऊन मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळात शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य संपूर्ण पायरी मार्ग मोकळा करणार असून किल्ले संवर्धन व जतनाचा संदेश ते तरुणांना याच माध्यमातून देणार आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकhistoryइतिहास