शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नाशिककरांनी साडेतीन लाखांचा भरला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 23:24 IST

नाशिक : लॉकडाउन काळात सर्रासपणे दुचाकी घेऊन रस्त्यांवर वावरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमांतर्गत कारवाई करून पोलिसांनी ३ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा दंड नाशिककरांकडून लॉकडाउन काळात वसूल केला आहे.

नाशिक : लॉकडाउन काळात सर्रासपणे दुचाकी घेऊन रस्त्यांवर वावरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमांतर्गत कारवाई करून पोलिसांनी ३ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा दंड नाशिककरांकडून लॉकडाउन काळात वसूल केला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना एकूण दंड १८ लाख ९० हजार १०० रुपये इतका करण्यात आला असून, त्यापैकी १५ लाख २६ हजार ७०० रुपयांची वसुली शिल्लक आहे.नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच दररोज संशयित रुग्णही उपचारार्थ रुग्णालयात दाखल होत आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा २७६ वर पोहोचला आहे. सर्वाधिक २५३ रुग्ण मालेगावमधील आहेत. तसेच शहरातदेखील ११ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीकरिता सकाळी १० ते दुपारी ४ अशी वेळ निर्धारित केली गेली आहे. शहर पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड लावून कोणीही विनाकारण घराबाहेर पडणार नाही, याची खबरदारी घेतली आहे.२० एप्रिलपासून लॉकडाउनमध्ये काहीशी सूट काही ठराविक अस्थापनांना विविध नियम, अटींच्या अधीन राहून देण्यात आली आहे. त्याचा गैरफायदा सर्वसामान्य लोकांकडून घेतला जात आहे.पोलीस प्रशासनाकडून संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, गस्त वाढविण्यात आली आहे. मात्र नागरिकांकडून आद्यपही फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. १९ मार्चपासून अद्याप १ हजार ५३९ लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच ३ हजार ६७६ लोकांविरुद्ध भादंवि कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलीस आयुक्तांनी शहरात अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. मात्र बहुतांश लोक अद्यापही मास्कचा वापर करण्याकडे दुर्लक्ष करतात. या लोकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. अद्याप तब्बल ५८० लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.---------पावणे चार हजार लोकांवर गुन्हेलॉकडाउन लवकर संपवावा, असे प्रत्येकालाच वाटते; मात्र अपवाद वगळता प्रामाणिकपणे किती लोक आपापल्या घरातच थांबतात? विनाकारण रस्त्यांवर येण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. तरीदेखील अद्याप फारसे गांभीर्य नागरिकांत दिसून येत नाही. महिनाभरात लॉकडाउनला बाधा निर्माण करत जमावबंदी, संचारबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाºया तब्बल ३ हजार ६७६ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक