शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

विजेच्या लपंडावाने नाशिककर हैराण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:14 IST

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून विजेच्या सातत्याने होणा:या लपंडावाने नाशिककर नागरिक हैराण झाले आहेत.नागरिकांना वर्क फ्रॉम होम आणि विद्यार्थ्याना आॅनलाईन शाळादेखील करण्यास वीज नसणो अडथळा ठरु लागले असल्याने महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देवारंवार येणा:या अडथळ्यांनी कामकाजावर, विद्यार्थ्याच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो.

नाशिक ( प्रतिनिधी )- गेल्या काही दिवसांपासून विजेच्या सातत्याने होणा:या लपंडावाने नाशिककर नागरिक हैराण झाले आहेत.नागरिकांना वर्क फ्रॉम होम आणि विद्यार्थ्याना आॅनलाईन शाळादेखील करण्यास वीज नसणो अडथळा ठरु लागले असल्याने महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.लॉकडाऊनपासून गेले सहा महिने नागरिकांचे वर्क फ्रॉम होम सुरु आहे. प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे आॅनलाईन वर्ग, क्लासेस सुरू आहेत. त्यामुळे सर्वांनाच विजेवर अवलंबून रहावे लागते. अशातच सातत्याने काही मिनिटांपासून तासांपर्यंत वीजप्रवाह खंडित होतो व काम ठप्प होते. वारंवार येणा:या अडथळ्यांनी कामकाजावर, विद्यार्थ्याच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो.घरांमध्ये वयोवृद्ध नागरिक तसेच रूग्णही असतात त्यांना विजेअभावी अडचणींचा सामना करावा लागतो. नागरिकांकडून विजिबलाची रक्कम विद्युत वितरण विभाग तत्परतेने जमा करतो. एखाद्या ग्राहकाने काही कारणाने विजिबलाची रक्कम वेळेत भरली नाही तर तातडीने त्याची विजजोडणी तोडली जाते. ही तत्परता एरवी कुठे जाते ? असा सवाल नागरिक करीत आहेत. अनेकदा तर ग्राहकांकडून वाढीव बिलांबाबत बोंब झाल्यानंतरही त्याची दखलही घेतली जात नाही. वीज बिल वेळेवर भरणा:या नागरिकांना अखंडीतपणो वीज मिळणो हा ग्राहकांचा हक्क आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्यावर संबंधित विभागाशी दूरध्वनीवर संपर्क साधल्यास ब:याचदा एंगेजटोन येत राहतो. यदाकदाचित फोन लागलाच तर तो स्वीकारला जात नाही. संभाषण झालेच तर थातुरमातुर उत्तर मिळते.पावसाळ्यात वीज प्रवाह खंडीत होण्यासाठी थोडयाशा पावसाचेही निमित्त पुरते. वारंवार तांत्रिक बिघाड कसे होतात ? असाही प्रश्न नागरिकांना पडतो. तसेच गत पंधरवड?ापासून पाऊस फारसा नसूनदेखील वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत आहेत. सध्या भारिनयमन नाही पण केंव्हाही वीज गायब होते. भारिनयमनासाठी ठराविक वेळ तरी ठरलेली असते. त्यानुसार सर्वजण आपल्या कामकाजाचे वेळापत्नक ठरवू शकतात.पण सध्या वीज केव्हा गायब होईल याला धरबंधच राहिलेला नाही. त्यामुळे वीजपुरवठ?ाबाबत महावितरणने गांभियर्पूर्वक काम करण्याची आवश्यकता असून नागरिकांना नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा द्यावा, अशी ते मागणी करीत आहेत.

 

टॅग्स :electricityवीजStudentविद्यार्थी