शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

देशात राहण्यायोग्य शहरांमध्ये नाशिक ३८ वे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:15 IST

केंद्र शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात देशात बंगलोर पहिल्या नंबरवर असून पुण्याचा दुसरा क्रमांक आहे. दहा लाख लोकसंख्येपेक्षा ...

केंद्र शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात देशात बंगलोर पहिल्या नंबरवर असून पुण्याचा दुसरा क्रमांक आहे. दहा लाख लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचे हे सर्वेक्षण होते. नाशिकचा नंबर मात्र ३८ वा आहे. तर महापालिकेच्या कार्यक्षमतेत इंदूरने बाजी मारली आहे. देशात चौथ्या क्रमांकावर राज्यातील पिंप्री चिंचवड महापालिका आहे तर नाशिक त्या तुलनेत मागे असून ३२ व्या स्थानावर आहे.

केंद्र शासनाच्या वतीने २०१९ मध्ये अशाप्रकारचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात नाशिकमध्येच स्मार्ट सिटीच्या वतीने सहभागाचे आवाहन करण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा संबंध केवळ महापालिकेशी संंबंधित नसून कायदा व सुव्यस्था, पर्यावरण, सुरक्षिता, रोजगार अशा अनेक बाबींशी संबंधित आहे. सर्वेक्षणात संस्थात्मक, सामाजिक, आर्थिक, भौतिक सुविधा असे प्रमुख चार निकष होते, त्याच प्रमाणे शैक्षणिक, सांस्कृतीक, आरोग्य, रोजगार निर्मिती, वाहतूक, गृहनिर्माण, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, अशा विविध निकषांवर काटेकोर तपासणी करण्यात येते. तसेच सर्वेक्षणाशिवाय नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून नंतर ही क्रमवारी जाहीर करण्यात येते. त्यानुसार ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई-पुण्याजवळ असलेले सुवर्ण त्रिकेाणातील शहर म्हणून नाशिकचा लाैकिक आहे. उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून देखील नाशिकला मान्यता आहे. औद्योगिक विकासाबरोबरच रस्ते, रेल्वे आणि हवाई जोडणीमुळे नाशिकच्या शहराचा रिच वाढला आहे. त्या तुलनेत अपेक्षित क्रमांक मात्र मिळालेला नाही.

कोट...

सुधारणा करण्यात येईल

केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात अनेक मुद्यांचा समावेश होता. येथील पायाभूत सुविधा सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था, ग्रीन बिल्डिंग, रोजगार असे अनेक मुद्दे होते. त्यात नाशिकची उणीव नक्की कशात आहे, याची चिकित्सा स्मार्ट सिटी कंपनी करीत आहे. त्यानुसार अहवाल तयार करून तो संबंधित विभागांना पाठवून अधिक सुधारणा करण्यात येईल.

- प्रकाश थवील, सीईओ, नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी

कोट...

देशपातळीवर ३८ वा क्रमांक येणे ही बाब चांगली असली तरी नाशिकचे एकंदर स्थान आणि येथील सुविधा बघता या शहराचा क्रमांक टॉप टेन मध्ये कसा येईल यासाठी नक्कीच अभ्यास करून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. स्वच्छ शहर सर्वेक्षणात ज्या पध्दतीने नाशिकने गेल्या वर्षी भरारी घेतली, त्याच पध्दतीने नजीकच्या काळात आता यापेक्षा चांगली कामगिरी करण्यावर भर दिला जाईल.

- सतीश कुलकर्णी, महापौर