शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

नाशिक-पुणे महामार्ग धोकादायक

By admin | Updated: November 26, 2015 22:28 IST

मृत्यूचा सापळा : रस्त्यामधील झाडे, दुभाजक देताहेत अपघाताला निमंत्रण

उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावर नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत दोन्ही बाजूला रस्त्याच्या मधोमध उभे असलेले मोठमोठे वृक्ष अपघाताला निमंत्रण व वाहतुकीला अडथळा करणारे ठरत आहेत. यामुळे वाहनधारकांच्या दृष्टीने या मार्गावरील प्रवास धोक्याचा ठरत आहे.नाशिक-पुणे महामार्गावर पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात छोट्या-मोठ्या व अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत झालेली असून, हजारोंच्या संख्येने नागरिक राहण्यास आलेले आहेत. त्यामुळे नागरिक, महिला, विद्यार्थी, कामगार यांची मोठ्या प्रमाणात महामार्गावरून ये-जा सुरू असते. कुंभमेळ्याच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून द्वारका ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंतचा रस्ता सहापदरी करण्याचे नियोजित होते. मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने व इतर तांत्रिक अडचणीमुळे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. रुंदीकरणाऐवजी नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूने तीन ते चार फुटाचे डांबरीकरण करून रस्ता वाढविण्यात आला. यामुळे झाडे आता रस्त्याच्या मधोमध आली आहेत. त्यामुळे महामार्गाचे नावापुरते रुंदीकरण करूनदेखील वाहनधारकांच्या दृष्टीने काहीएक फायद्याचे झालेले नाही. उलटपक्षी ते वाहनधारकांच्या दृष्टीने धोक्याचे ठरत आहे. रस्ता रुंदीकरणामुळे रस्त्याच्या मधोमध आलेली झाडे अपघाताला निमंत्रण व वाहतुकीला अडथळा ठरत आहे. पर्यावरणाच्या नावाखाली व वृक्षप्रेमींच्या विरोधामुळे रस्त्याच्या मधोमध उभे असलेल्या धोकेदायक वृक्षांकडे शासन, मनपा, सार्वजनिक बांधकाम कोणीच लक्ष देण्यास तयार नाही. त्याचा सर्व त्रास सर्वसामान्य वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक अपघात होत असून, निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. तर काही जणांना गंभीर दुखापत होऊन अपंगत्व आले आहे. धोकेदायक रस्ता दुभाजकयाच परिसरातील रस्ता दुभाजकाचे कामदेखील अर्धवट स्थितीत झालेले आहे. रंगरंगोटी, सूचनाफलक न लावल्याने वाहनधारकांचा गोंधळ उडतो. वाहनांच्या धुरामुळे व उडणाऱ्या धुळीमुळे काळेकुट्ट झालेले गतिरोधक रात्रीच्या अंधारात दिसत नसल्याने उपनगर नाका, गांधीनगर, डीजीपीनगर या ठिकाणी दिवसाआड वाहनांना अपघात होऊन नुकसान होत आहे. वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता रस्त्याच्या मध्येच उभे असलेले जुने वृक्ष तोडण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच रस्ता दुभाजकांना रंगंरगोटी व सूचनाफलक लावण्याची मागणी रहिवासी, वाहनधारकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)