शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

नाशिक-पुणे महामार्ग धोकादायक

By admin | Updated: November 26, 2015 22:28 IST

मृत्यूचा सापळा : रस्त्यामधील झाडे, दुभाजक देताहेत अपघाताला निमंत्रण

उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावर नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत दोन्ही बाजूला रस्त्याच्या मधोमध उभे असलेले मोठमोठे वृक्ष अपघाताला निमंत्रण व वाहतुकीला अडथळा करणारे ठरत आहेत. यामुळे वाहनधारकांच्या दृष्टीने या मार्गावरील प्रवास धोक्याचा ठरत आहे.नाशिक-पुणे महामार्गावर पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात छोट्या-मोठ्या व अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत झालेली असून, हजारोंच्या संख्येने नागरिक राहण्यास आलेले आहेत. त्यामुळे नागरिक, महिला, विद्यार्थी, कामगार यांची मोठ्या प्रमाणात महामार्गावरून ये-जा सुरू असते. कुंभमेळ्याच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून द्वारका ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंतचा रस्ता सहापदरी करण्याचे नियोजित होते. मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने व इतर तांत्रिक अडचणीमुळे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. रुंदीकरणाऐवजी नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूने तीन ते चार फुटाचे डांबरीकरण करून रस्ता वाढविण्यात आला. यामुळे झाडे आता रस्त्याच्या मधोमध आली आहेत. त्यामुळे महामार्गाचे नावापुरते रुंदीकरण करूनदेखील वाहनधारकांच्या दृष्टीने काहीएक फायद्याचे झालेले नाही. उलटपक्षी ते वाहनधारकांच्या दृष्टीने धोक्याचे ठरत आहे. रस्ता रुंदीकरणामुळे रस्त्याच्या मधोमध आलेली झाडे अपघाताला निमंत्रण व वाहतुकीला अडथळा ठरत आहे. पर्यावरणाच्या नावाखाली व वृक्षप्रेमींच्या विरोधामुळे रस्त्याच्या मधोमध उभे असलेल्या धोकेदायक वृक्षांकडे शासन, मनपा, सार्वजनिक बांधकाम कोणीच लक्ष देण्यास तयार नाही. त्याचा सर्व त्रास सर्वसामान्य वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक अपघात होत असून, निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. तर काही जणांना गंभीर दुखापत होऊन अपंगत्व आले आहे. धोकेदायक रस्ता दुभाजकयाच परिसरातील रस्ता दुभाजकाचे कामदेखील अर्धवट स्थितीत झालेले आहे. रंगरंगोटी, सूचनाफलक न लावल्याने वाहनधारकांचा गोंधळ उडतो. वाहनांच्या धुरामुळे व उडणाऱ्या धुळीमुळे काळेकुट्ट झालेले गतिरोधक रात्रीच्या अंधारात दिसत नसल्याने उपनगर नाका, गांधीनगर, डीजीपीनगर या ठिकाणी दिवसाआड वाहनांना अपघात होऊन नुकसान होत आहे. वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता रस्त्याच्या मध्येच उभे असलेले जुने वृक्ष तोडण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच रस्ता दुभाजकांना रंगंरगोटी व सूचनाफलक लावण्याची मागणी रहिवासी, वाहनधारकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)