शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

पर्यटनासाठी नाशिक जिल्हा मॉडेल म्हणून विकसीत करण्याची गरज: दत्ता भालेराव

By संजय पाठक | Updated: March 7, 2020 23:32 IST

नाशिक- महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी १४०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे राज्य सरकारला पर्यटन विषयक गांभिर्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने आता नाशिक सारखा सुवर्ण त्रिकोणातील एक जिल्हा पर्यटनासाठी मॉडेल म्हणून विकसीत करावा अशी मागणी नाशिक येथील पर्यटन व्यवसायिकांच्या संघटनेचे (तान) माजी अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी केली आहे.

ठळक मुद्देअर्थसंकल्पातील भरीव तरतूद स्वागतार्हपर्यटनामुळे रोजगार वाढेल

नाशिक- महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी १४०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे राज्य सरकारलापर्यटन विषयक गांभिर्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने आता नाशिक सारखा सुवर्ण त्रिकोणातील एक जिल्हा पर्यटनासाठी मॉडेल म्हणून विकसीत करावा अशी मागणी नाशिक येथील पर्यटन व्यवसायिकांच्या संघटनेचे (तान) माजी अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी केली आहे. भालेराव यांनी राज्यातील आणि नाशिकमधील पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न : राज्य सरकारच्या वतीने अर्थसंकल्पात केवळ पर्यटनासाठी करण्यात आलेल्या तरतूदींविषयी काय वाटते ?भालेराव : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या पहिल्याच अर्थसंकल्पात पर्यटन व्यवसायाची व्याप्ती व क्षमता लक्षात घेऊन सुमारे १४०० कोटी रूपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्राला दिलासा देणारी ही बाब आहे. मात्र त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे राज्य सरकारला या क्षेत्राचे महत्व कळाले हे खूप महत्वाचे आहे. मुळात आदित्य ठाकरे यांनी नवीन मंत्री मंडळात या व्यवसायाची धुरा सांभाळली, तेव्हाच काही तरी सकारात्मक होईल अशी अपेक्षा होती. त्यानुसार अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात १४०० कोटी रूपयांची तरतूद करून देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सज्ज करण्याची तयारी केली आहे.प्रश्न: पर्यटनविषयक तरतूदीचा काय फायदा होईल असे वाटते ?भालेराव: निसर्गाने महाराष्टÑावर साधन संपत्तीची मुक्त उधळण केली आहे. ऐतिहासीक गड किल्ले, पुरातन मंदिरे, ७२० किलो मीटरचा अथांग सागर किनारा, बारमाही उत्तम हवामान, उद्योग व्यवसायानिमित्त जगाच्या कानाकोपऱ्यातून येणारे नागरीक, नैसर्गिक बंदरे, या माध्यमातून नियोजनबध्द विकास केलाच तर पर्यटन हा राज्याचा प्रमुख व्यवसाय होऊ शकतो. या माध्यमातून लाखो युवकांना रोजगार मिळू शकतो. इतकी पर्यटन क्षेत्राची ताकद आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील तरतूदीचा योग्य कामासाठी वापर करावा, पर्यटनासाठी सरकारने रस्ते बांधणीवर भर द्यावा असे वाटते.प्रश्न: पर्यटनाचा नाशिकच्या दृष्टीने काय उपयोग होऊ शकतो.भालेराव: सुवर्ण त्रिकोणातील शहर म्हणून नाशिकचे विशेष महत्व आहे. येथे धार्मिक पर्यटन आहे, त्याच बरोबर गड किल्ले आहेत. अ‍ॅग्रो आणि वाईन टुरिझम देखील आहे. महत्वाचे म्हणजे मुंबई- पुण्याहून जवळ आहे. दळणवळणाची साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे राज्य सरकारने निधीची तरतूद केल्यानंतर संपूर्ण राज्यातील पर्यटन क्षेत्राचा एकावेळी कायापालट शक्य नसला तरी नाशिकला एक मॉडेल जिल्हा म्हणून विकसीत केले तरी उपयुक्त ठरू शकेल. एक जिल्हा असा मॉडेल ठरला तर अन्यत्र देखील याच धर्तीवर विकास होऊ शकेल. नाशिकमध्ये या आधीही पर्यटनाच्या अनेक योजना आल्या होत्या. परंतु काही साकारल्या गेल्या तर काही पुढे जाऊ शकल्या नाही.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकState Governmentराज्य सरकारbudget 2020बजेटtourismपर्यटन