शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

पर्यटनासाठी नाशिक जिल्हा मॉडेल म्हणून विकसीत करण्याची गरज: दत्ता भालेराव

By संजय पाठक | Updated: March 7, 2020 23:32 IST

नाशिक- महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी १४०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे राज्य सरकारला पर्यटन विषयक गांभिर्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने आता नाशिक सारखा सुवर्ण त्रिकोणातील एक जिल्हा पर्यटनासाठी मॉडेल म्हणून विकसीत करावा अशी मागणी नाशिक येथील पर्यटन व्यवसायिकांच्या संघटनेचे (तान) माजी अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी केली आहे.

ठळक मुद्देअर्थसंकल्पातील भरीव तरतूद स्वागतार्हपर्यटनामुळे रोजगार वाढेल

नाशिक- महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी १४०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे राज्य सरकारलापर्यटन विषयक गांभिर्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने आता नाशिक सारखा सुवर्ण त्रिकोणातील एक जिल्हा पर्यटनासाठी मॉडेल म्हणून विकसीत करावा अशी मागणी नाशिक येथील पर्यटन व्यवसायिकांच्या संघटनेचे (तान) माजी अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी केली आहे. भालेराव यांनी राज्यातील आणि नाशिकमधील पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न : राज्य सरकारच्या वतीने अर्थसंकल्पात केवळ पर्यटनासाठी करण्यात आलेल्या तरतूदींविषयी काय वाटते ?भालेराव : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या पहिल्याच अर्थसंकल्पात पर्यटन व्यवसायाची व्याप्ती व क्षमता लक्षात घेऊन सुमारे १४०० कोटी रूपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्राला दिलासा देणारी ही बाब आहे. मात्र त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे राज्य सरकारला या क्षेत्राचे महत्व कळाले हे खूप महत्वाचे आहे. मुळात आदित्य ठाकरे यांनी नवीन मंत्री मंडळात या व्यवसायाची धुरा सांभाळली, तेव्हाच काही तरी सकारात्मक होईल अशी अपेक्षा होती. त्यानुसार अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात १४०० कोटी रूपयांची तरतूद करून देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सज्ज करण्याची तयारी केली आहे.प्रश्न: पर्यटनविषयक तरतूदीचा काय फायदा होईल असे वाटते ?भालेराव: निसर्गाने महाराष्टÑावर साधन संपत्तीची मुक्त उधळण केली आहे. ऐतिहासीक गड किल्ले, पुरातन मंदिरे, ७२० किलो मीटरचा अथांग सागर किनारा, बारमाही उत्तम हवामान, उद्योग व्यवसायानिमित्त जगाच्या कानाकोपऱ्यातून येणारे नागरीक, नैसर्गिक बंदरे, या माध्यमातून नियोजनबध्द विकास केलाच तर पर्यटन हा राज्याचा प्रमुख व्यवसाय होऊ शकतो. या माध्यमातून लाखो युवकांना रोजगार मिळू शकतो. इतकी पर्यटन क्षेत्राची ताकद आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील तरतूदीचा योग्य कामासाठी वापर करावा, पर्यटनासाठी सरकारने रस्ते बांधणीवर भर द्यावा असे वाटते.प्रश्न: पर्यटनाचा नाशिकच्या दृष्टीने काय उपयोग होऊ शकतो.भालेराव: सुवर्ण त्रिकोणातील शहर म्हणून नाशिकचे विशेष महत्व आहे. येथे धार्मिक पर्यटन आहे, त्याच बरोबर गड किल्ले आहेत. अ‍ॅग्रो आणि वाईन टुरिझम देखील आहे. महत्वाचे म्हणजे मुंबई- पुण्याहून जवळ आहे. दळणवळणाची साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे राज्य सरकारने निधीची तरतूद केल्यानंतर संपूर्ण राज्यातील पर्यटन क्षेत्राचा एकावेळी कायापालट शक्य नसला तरी नाशिकला एक मॉडेल जिल्हा म्हणून विकसीत केले तरी उपयुक्त ठरू शकेल. एक जिल्हा असा मॉडेल ठरला तर अन्यत्र देखील याच धर्तीवर विकास होऊ शकेल. नाशिकमध्ये या आधीही पर्यटनाच्या अनेक योजना आल्या होत्या. परंतु काही साकारल्या गेल्या तर काही पुढे जाऊ शकल्या नाही.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकState Governmentराज्य सरकारbudget 2020बजेटtourismपर्यटन