शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

पर्यटनासाठी नाशिक जिल्हा मॉडेल म्हणून विकसीत करण्याची गरज: दत्ता भालेराव

By संजय पाठक | Updated: March 7, 2020 23:32 IST

नाशिक- महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी १४०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे राज्य सरकारला पर्यटन विषयक गांभिर्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने आता नाशिक सारखा सुवर्ण त्रिकोणातील एक जिल्हा पर्यटनासाठी मॉडेल म्हणून विकसीत करावा अशी मागणी नाशिक येथील पर्यटन व्यवसायिकांच्या संघटनेचे (तान) माजी अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी केली आहे.

ठळक मुद्देअर्थसंकल्पातील भरीव तरतूद स्वागतार्हपर्यटनामुळे रोजगार वाढेल

नाशिक- महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी १४०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे राज्य सरकारलापर्यटन विषयक गांभिर्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने आता नाशिक सारखा सुवर्ण त्रिकोणातील एक जिल्हा पर्यटनासाठी मॉडेल म्हणून विकसीत करावा अशी मागणी नाशिक येथील पर्यटन व्यवसायिकांच्या संघटनेचे (तान) माजी अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी केली आहे. भालेराव यांनी राज्यातील आणि नाशिकमधील पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न : राज्य सरकारच्या वतीने अर्थसंकल्पात केवळ पर्यटनासाठी करण्यात आलेल्या तरतूदींविषयी काय वाटते ?भालेराव : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या पहिल्याच अर्थसंकल्पात पर्यटन व्यवसायाची व्याप्ती व क्षमता लक्षात घेऊन सुमारे १४०० कोटी रूपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्राला दिलासा देणारी ही बाब आहे. मात्र त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे राज्य सरकारला या क्षेत्राचे महत्व कळाले हे खूप महत्वाचे आहे. मुळात आदित्य ठाकरे यांनी नवीन मंत्री मंडळात या व्यवसायाची धुरा सांभाळली, तेव्हाच काही तरी सकारात्मक होईल अशी अपेक्षा होती. त्यानुसार अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात १४०० कोटी रूपयांची तरतूद करून देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सज्ज करण्याची तयारी केली आहे.प्रश्न: पर्यटनविषयक तरतूदीचा काय फायदा होईल असे वाटते ?भालेराव: निसर्गाने महाराष्टÑावर साधन संपत्तीची मुक्त उधळण केली आहे. ऐतिहासीक गड किल्ले, पुरातन मंदिरे, ७२० किलो मीटरचा अथांग सागर किनारा, बारमाही उत्तम हवामान, उद्योग व्यवसायानिमित्त जगाच्या कानाकोपऱ्यातून येणारे नागरीक, नैसर्गिक बंदरे, या माध्यमातून नियोजनबध्द विकास केलाच तर पर्यटन हा राज्याचा प्रमुख व्यवसाय होऊ शकतो. या माध्यमातून लाखो युवकांना रोजगार मिळू शकतो. इतकी पर्यटन क्षेत्राची ताकद आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील तरतूदीचा योग्य कामासाठी वापर करावा, पर्यटनासाठी सरकारने रस्ते बांधणीवर भर द्यावा असे वाटते.प्रश्न: पर्यटनाचा नाशिकच्या दृष्टीने काय उपयोग होऊ शकतो.भालेराव: सुवर्ण त्रिकोणातील शहर म्हणून नाशिकचे विशेष महत्व आहे. येथे धार्मिक पर्यटन आहे, त्याच बरोबर गड किल्ले आहेत. अ‍ॅग्रो आणि वाईन टुरिझम देखील आहे. महत्वाचे म्हणजे मुंबई- पुण्याहून जवळ आहे. दळणवळणाची साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे राज्य सरकारने निधीची तरतूद केल्यानंतर संपूर्ण राज्यातील पर्यटन क्षेत्राचा एकावेळी कायापालट शक्य नसला तरी नाशिकला एक मॉडेल जिल्हा म्हणून विकसीत केले तरी उपयुक्त ठरू शकेल. एक जिल्हा असा मॉडेल ठरला तर अन्यत्र देखील याच धर्तीवर विकास होऊ शकेल. नाशिकमध्ये या आधीही पर्यटनाच्या अनेक योजना आल्या होत्या. परंतु काही साकारल्या गेल्या तर काही पुढे जाऊ शकल्या नाही.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकState Governmentराज्य सरकारbudget 2020बजेटtourismपर्यटन