शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
3
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
4
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
5
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
6
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
7
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
8
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
9
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
10
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
11
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
12
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
13
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
14
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
15
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
16
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
17
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
18
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
19
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
20
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!

नाशिक महापालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:15 IST

- केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणामध्ये नाशिकने यंदा बाजी मारली आणि देशात अकरावा, तर राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. - ...

- केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणामध्ये नाशिकने यंदा बाजी मारली आणि देशात अकरावा, तर राज्यात दुसरा क्रमांक पटकावला.

- गेल्या चार वर्षांपासून नाशिक महापालिकेचे टॉप टेनमध्ये येण्याचे स्वप्न होते. ते पूर्ण झाले नसले, तरी टॉप टेनपर्यंत धडक मारली आहे.

---------------

स्मार्ट सिटी शायनिंग

- स्मार्ट सिटीबाबत कितीही वाद-विवाद असले, तरी नाशिकने यंदा चमकदार कामगिरी बजावत देशात पहिला क्रमांक पटकावला. अर्थात, त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात हा क्रमांक घसरला असून, आता राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

- स्मार्ट रोड झाला खुला. अवघा १.१ किलोमीटर लांबीचा आणि तब्बल १७ कोटी रुपये खर्च झालेला स्मार्ट रोड अखेरीस महिन्यात नागरिकांसाठी खुला झाला.

- स्मार्ट सिटी कंपनीचे अनेक प्रकल्प आता मार्गी लागले, यात प्रोजेक्ट गोदा, गावठाण विकास प्रकल्प आणि अन्य प्रकल्पांचा समावेश आहे.

- स्मार्ट सिटीच्या वतीने मग मखमलाबाद येथे ७०३ एकर क्षेत्रावर साकारण्यात येत असलेला ग्रीनफिल्ड विकास प्रकल्प बऱ्यापैकी मार्गी लागला आहे.

- या प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या टीपी स्किमचा आराखडा शासनाच्या नगररचना खात्याला सादर करण्यात आला आहे.

--------------

युनिफाइड डीपीसीआर मार्गी

- सर्व शहरांसाठी एकच सामूहिक बांधकाम नियमावली असलेला युनिफाइड डीसीपीआर अखेरीस नोव्हेंबर महिन्यात मंजूर झाला. त्यामुळे शहरातील बांधकामांचा रखडलेल्या विकास कामांचा मार्ग मेाकळा झाला आहे. २०१७ मध्ये मंजूर नाशिकच्या बांधकाम नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत वाहनतळासाठी अतिरक्त जागा सोडणे, बारा टक्के ॲमेनिटी स्पेस आणि सामासिक अंतराच्या निर्बंधांचा प्रश्न सुटल्याने बांधकाम व्यवसायाला चालना मिळाली आहे.

-------------

नवे बिटको रुग्णालय सुरू

- केारोना संकटामुळे महापालिकेत आणखी एक इष्टापत्ती झाली आणि नाशिक रोड येथील नवे बिटको रुग्णालये उद्घाटनाविनाच सुरू झाले. दोनशे खाटांचे हे रुग्णालय असून, या ठिकाणी वीस हजार लीटर्स क्षमतेची ऑक्सिजन टाकी बसविण्यात आल्याने व्हेंटिलेटर बेडचा प्रश्न सुटला आहे.

- महापालिकेचे डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयही डेडिकेटेड कोविड सेंटर म्हणून घोषित झाले. या ठिकाणी दहा हजार लीटर्स क्षमतेची ऑक्सिजनची टाकी बसविण्यात आली आहे.

- महापालिकेने केारोना काळात निव्वळ आरोग्य व्यवस्थेवर ४५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा खर्च केला आहे. अजूनही खर्च होत आहे.

-------------

मनपाच्या विकास कामांची पायाभरणी

- शहरात एकात्मिक वाहतूक विकास आराखड्याअंतर्गत त्र्यंबक रोडवर भवानी चौक आणि सिडकोत त्रिमूर्ती चौकाला मंजुरी देण्यात आली. या दोन्ही पुलांसाठी १२० कोटी रुपये खर्च येणार आहे.

- गंगापूर रोडवर गोदावरी नदीवर तीन पूल बांधण्यास महापालिकेने मंजुरी दिल्यानंतर त्याच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. अर्थात, त्यातील चव्हाण कॉलनी येथील एका पुलाला उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यात आली आहे.

- नाशिक रोड येथे दर वर्षी उन्हाळ्याच्या शेवटी पाणी समस्येला सामाेरे जावे लागते. ती दूर करण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी १९ केाटी रुपयांची थेट जलवाहिनी टाकण्यासाठी मंजुरी दिली आहे.

- सिडकोत मुकणे धरणातून पाणीपुरवठा सुरू झाला असला, तरी त्यानंतरही पर्यायी सोय म्हणून गंगापूर धरणातून पाणी पुरविण्यासाठी आणखी एक पर्यायी जलवाहिनी टाकण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

- शहरातील विविध भागांतील जलवितरण सुधारवण्यासाठी १३ नवीन जलकुंभ बांधण्यास महापालिकेने मान्यता दिली आहे.

- वडाळा शिवारात आठ हेक्टर क्षेत्राची कब्रस्तानसाठी आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी ६० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यास महासभेत मान्यता देण्यात आली आहे.

------

वायु प्रदुषणमुक्ततेसाठी २० कोटी

- महापालिकेने सादर केलेला वायू गुणवत्ता सुधार आराखडा केंद्र शासनाने चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यात मंजूर केला. त्यानंतर, नाशिक शहरातील हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी २० कोटी रुपये राज्य शासनाने दिले आहेत. महापालिकेला प्रथमच अशा प्रकारचा निधी मिळाला आहे.

- गोदावरी नदी प्रवाही राहावी, यासाठी प्रोजेक्ट गोदाअंतर्गत दुतेांड्या मारोती ते गाडगे महाराज पुलाखालील नदीपात्रातील तळ काँक्रिटीकरण काढण्यास प्रारंभ झाला आहे.

- गोदावरी नदीच्या परीसरातील १७ कुंडांचे पुनरुज्जीवन करण्यासाठीही चाचणी करण्यात आली असून, आता लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

----

फेरबदल प्रशासन आणि राजकारणातही

महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांची जून महिन्यात अचानक बदली करण्यात आली. त्यांच्या जागी कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. गमे यांना नंतर विभागीय आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले.

- महापालिकेत पक्षीय तौलनिक बळानुसार स्थायी समिती सदस्य नियुक्तीचा वाद गाजला. त्यानंतरही न्याय प्रविष्ट प्रकरणात भाजपचे गणेश गीते यांनी बाजी मारली.

- महापालिकेच्या विषय समित्यांच्या निवडणुकीत यंदा प्रथमच स्वाक्षरी जुळत नसल्याने शहर सुधार, तसेच आरोग्य समितीच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद करण्याची नामुष्की ओढावली.

- कोरोनामुळे रखडलेल्या निवडणुका अखेरीस नोव्हेंबर अखेरीस जाहीर झाल्या. महिला बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या स्वाती भामरे, तर विधी समितीच्या सभापतीपदीही भाजपच्याच केामल मेहरोलीया यांची बिनविरोध निवड झाली.