शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

नाशिक महापालिका आयुक्तांचे इलेक्शन बजेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 01:13 IST

राजकारणात सर्वांना खूश करता येते, परंतु अर्थकारणात सर्व खूश होतील असे नाही याचे कारण म्हणजे अर्थकारण हे शास्त्रावर आधारित आहेत. ठराविक कसोटीवर ते तपासले गेले आहेत.

नाशिक : राजकारणात सर्वांना खूश करता येते, परंतु अर्थकारणात सर्व खूश होतील असे नाही याचे कारण म्हणजे अर्थकारण हे शास्त्रावर आधारित आहेत. ठराविक कसोटीवर ते तपासले गेले आहेत. त्यामुळे ज्यावेळी एखाद्या संस्थेत अर्थशास्त्राचे निकष डावलून निर्णय होतात, तेव्हा ते आर्थिक प्रस्ताव असो वा अंदाजपत्रक तग धरू शकत नाही. महपालिकेच्या अंदाजपत्रकाची अशीच अवस्था आहे. करवाढीची तीव्रता कमी करण्यासाठी आयुक्तांनी जे अंदाजपत्रक तयार केले आहे. ते कितपत टिकेल याविषयी शंका घेण्यास वाव आहे.कोणत्याही अर्थसंकल्पाच्या वेळी त्यावेळी असलेली पार्श्वभूमी महत्त्वाची असते. महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अंदाजपत्रक मांडताना या आर्थिक परिस्थितीला जरा जास्तच महत्त्व देऊन यापूर्वी आयुक्तांविषयी कलुषित असलेली मने जरा सकारात्मक करण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात आयुक्तपदाविषयी नगरसेवकांची मते कलुषित का होती तर त्यांनी (माजी आयुक्त तुकाराम मुंढे) केलेली करवाढ, नगरसेवकांचे डावलले हक्क, महापालिकेतील विशिष्ट पदाधिकाऱ्याला दिलेले महत्त्व. नागरी कामांसाठी आयुक्ततुकाराम मुंढे कामाची व्यवहार्यता, आर्थिक उपलब्धता आणि गरज हे तीन निकष लागू केले. त्याचा सर्वाधिक फटका नगरसेवकांना बसला. व्यवहार्यता आणि आर्थिक उपलब्धता हा मुद्दा एकवेळ ठीक, परंतु गरज ही खूपच सापेक्ष कल्पना आहे. एखाद्या नगरसेवकाला किंवा त्याच्या प्रभागातील नागरिकांना अमुक एक रस्ता महत्त्वाचा वाटेल, परंतु तो शहरपातळीवर काम करताना आयुक्तांना तितकासा महत्त्वाचा वाटणार नाही आणि ते खरेही आहे. सर्वांना समतोल विकास करा, असे म्हणणे सोपे असते परंतु तसे केले तर माझ्या प्रभागात सर्वाधिक कामे झाली असे सांगण्यास जागा राहत नाही.जलवाहिनी किंवा मलवाहिका ही मूलभूत कामे असली तरी जमिनीखालील कामे नागरिकांना दिसत नाही. त्यांना जमिनीवर उभारलेले समाजमंदिर, व्यायामशाळा, तरण तलाव, नाट्यगृह दिसत नाही तोपर्यंत काम केले असे नगरसेवकांना सांगता येत नाही. हीच सारी नाराजीची पार्श्वभूमी होती आणि त्यात राधाकृष्ण गमे यांचे आगमन झाल्याने अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर वाढले. ते कायदेशीरदृष्ट्या जितके कमी करणे शक्य होते ते कायदेशीर बाब तपासून त्यांनी कमी केले, परंतु सर्वच बाबतीत शक्य नसल्यानेच त्यांनी समतोल धोरण राबविले. त्यामुळे त्यांच्या अंदाजपत्रकाला ज्या छटा आहेत, त्या याच पद्धतीच्या आहेत.आगामी आर्थिक वर्षांचा १८९४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडताना करवाढ कमी करता आली नाही याची जाणीव असल्याने त्यांनी भांडवली खर्चाबाबत हात सैल सोडला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वांना कसे खूश करता येईल ते त्यांनी बघितले. त्यामुळे जी कामे मुंढे यांनी व्यवहार्यता नसल्याने नाकारली होती तीदेखील त्यांनी स्वीकारली. पंचवटी, नाशिकरोड आणि गंगापूररोड येथे नाट्यगृह हे त्याचे वानगी दाखल उदाहरण. नगरसेवक निधीला प्रभाग विकास निधीची जोड देणे आणि चाळीस लाख रुपये खर्चासाठी देणे, प्रभाग समित्यांना आर्थिक अधिकार देऊन आर्थिक विकेंद्रीकरण करणे हे सर्व याच सदरात मोडणारे आहे.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गेल्यावर्षीच करवाढीवरून एक मोठा गदारोळ सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रस्ताव मांडून निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा सर्वपक्षीय विरोध पत्करण्याची त्यांनी खेळी केली नाही उलट निवडणुकीच्या तोेंडावर सर्वांनाच खूश करणारे आणि सुखी करणारे अंदाजपत्रक मांडले आणि वाहवा मिळविली. एकंदरच निवडणुका लढवायच्या राजकीय नेत्यांना आहे. मात्र, इलेक्शन बजेट आयुक्तांनी सादर केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प