शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

नाशिक बाजार समितीत लिलाव पूर्ववत सुरू

By admin | Updated: July 15, 2016 01:19 IST

बंद मागे : व्यापारी-आडत्यांमध्ये झाला समझौता

पंचवटी : गेल्या सहा दिवसांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत प्रकरणावरून व्यापाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर आडत वसुलीची टक्केवारी कमी केल्याने मिटला आहे. त्यामुळे सायंकाळपासून लिलाव पूर्ववत सुरू झाले आहेत. बाजार समितीत पूर्वी शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी ६ टक्के आडत आता आडते व्यापाऱ्यांकडून २.७५ टक्के दराने वसूल करणार आहेत, हा व्यापारी आणि आडत्यांमध्ये समझौता झाल्यानंतर संप मिटला आहे. शासनाने काही दिवसांपूर्वी आदेश काढून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी ६ टक्के आडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदार व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याचे आदेश दिले होते. शासनाचे आदेश चुकीचे असून आडत व्यापारी देणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेत गेल्या सहा दिवसांपासून लिलाव बंद केले होते. लिलाव बंद केल्याने शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल कवडीमोल बाजारभावाने विक्री करावा लागत होता. तर शासनाने निर्णय न बदलल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा आडते व व्यापाऱ्यांनी दिला होता. मात्र बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत शासनाने व्यापाऱ्यांकडूनच आडत वसूल करावी, असे स्पष्ट केल्याने सायंकाळी राज्यातील काही बाजार समित्यातील व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतला होता, तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी संप कायम ठेवत व्यापारी व आडत्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय स्पष्ट करणार असल्याचे सांगितले होते. गुरुवारी सकाळी आडते व व्यापाऱ्यांची पुन्हा संयुक्त बैठक झाली. त्यात सुरुवातीला व्यापाऱ्यांनी आडत देण्यास विरोध दर्शविला, मात्र नंतर व्यापाऱ्यांनी नमते पाऊल घेत ६ टक्केऐवजी २.७५ टक्के आडत्यांनी व्यापाऱ्यांकडून आडत वसूल करावी, असे मान्य केल्याने संप मिटला. संपामुळे गेल्या सहा दिवसांपासून बाजार समितीत शुकशुकाट पसरला होता, तर आता संप मिटल्याने शुक्रवारी (दि.१५) बाजार समितीचा आवार पुन्हा गजबजणार असून, शेतमालाची विक्रमी आवक होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. (वार्ताहर)