शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक बाजार समितीत लिलाव पूर्ववत सुरू

By admin | Updated: July 15, 2016 01:19 IST

बंद मागे : व्यापारी-आडत्यांमध्ये झाला समझौता

पंचवटी : गेल्या सहा दिवसांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत प्रकरणावरून व्यापाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर आडत वसुलीची टक्केवारी कमी केल्याने मिटला आहे. त्यामुळे सायंकाळपासून लिलाव पूर्ववत सुरू झाले आहेत. बाजार समितीत पूर्वी शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी ६ टक्के आडत आता आडते व्यापाऱ्यांकडून २.७५ टक्के दराने वसूल करणार आहेत, हा व्यापारी आणि आडत्यांमध्ये समझौता झाल्यानंतर संप मिटला आहे. शासनाने काही दिवसांपूर्वी आदेश काढून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी ६ टक्के आडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदार व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याचे आदेश दिले होते. शासनाचे आदेश चुकीचे असून आडत व्यापारी देणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेत गेल्या सहा दिवसांपासून लिलाव बंद केले होते. लिलाव बंद केल्याने शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल कवडीमोल बाजारभावाने विक्री करावा लागत होता. तर शासनाने निर्णय न बदलल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा आडते व व्यापाऱ्यांनी दिला होता. मात्र बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत शासनाने व्यापाऱ्यांकडूनच आडत वसूल करावी, असे स्पष्ट केल्याने सायंकाळी राज्यातील काही बाजार समित्यातील व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतला होता, तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी संप कायम ठेवत व्यापारी व आडत्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय स्पष्ट करणार असल्याचे सांगितले होते. गुरुवारी सकाळी आडते व व्यापाऱ्यांची पुन्हा संयुक्त बैठक झाली. त्यात सुरुवातीला व्यापाऱ्यांनी आडत देण्यास विरोध दर्शविला, मात्र नंतर व्यापाऱ्यांनी नमते पाऊल घेत ६ टक्केऐवजी २.७५ टक्के आडत्यांनी व्यापाऱ्यांकडून आडत वसूल करावी, असे मान्य केल्याने संप मिटला. संपामुळे गेल्या सहा दिवसांपासून बाजार समितीत शुकशुकाट पसरला होता, तर आता संप मिटल्याने शुक्रवारी (दि.१५) बाजार समितीचा आवार पुन्हा गजबजणार असून, शेतमालाची विक्रमी आवक होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. (वार्ताहर)