शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

नाशिक बाजार समितीत लिलाव पूर्ववत सुरू

By admin | Updated: July 15, 2016 01:19 IST

बंद मागे : व्यापारी-आडत्यांमध्ये झाला समझौता

पंचवटी : गेल्या सहा दिवसांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत प्रकरणावरून व्यापाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर आडत वसुलीची टक्केवारी कमी केल्याने मिटला आहे. त्यामुळे सायंकाळपासून लिलाव पूर्ववत सुरू झाले आहेत. बाजार समितीत पूर्वी शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी ६ टक्के आडत आता आडते व्यापाऱ्यांकडून २.७५ टक्के दराने वसूल करणार आहेत, हा व्यापारी आणि आडत्यांमध्ये समझौता झाल्यानंतर संप मिटला आहे. शासनाने काही दिवसांपूर्वी आदेश काढून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी ६ टक्के आडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदार व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याचे आदेश दिले होते. शासनाचे आदेश चुकीचे असून आडत व्यापारी देणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेत गेल्या सहा दिवसांपासून लिलाव बंद केले होते. लिलाव बंद केल्याने शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल कवडीमोल बाजारभावाने विक्री करावा लागत होता. तर शासनाने निर्णय न बदलल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा आडते व व्यापाऱ्यांनी दिला होता. मात्र बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत शासनाने व्यापाऱ्यांकडूनच आडत वसूल करावी, असे स्पष्ट केल्याने सायंकाळी राज्यातील काही बाजार समित्यातील व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतला होता, तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी संप कायम ठेवत व्यापारी व आडत्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय स्पष्ट करणार असल्याचे सांगितले होते. गुरुवारी सकाळी आडते व व्यापाऱ्यांची पुन्हा संयुक्त बैठक झाली. त्यात सुरुवातीला व्यापाऱ्यांनी आडत देण्यास विरोध दर्शविला, मात्र नंतर व्यापाऱ्यांनी नमते पाऊल घेत ६ टक्केऐवजी २.७५ टक्के आडत्यांनी व्यापाऱ्यांकडून आडत वसूल करावी, असे मान्य केल्याने संप मिटला. संपामुळे गेल्या सहा दिवसांपासून बाजार समितीत शुकशुकाट पसरला होता, तर आता संप मिटल्याने शुक्रवारी (दि.१५) बाजार समितीचा आवार पुन्हा गजबजणार असून, शेतमालाची विक्रमी आवक होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. (वार्ताहर)