शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

नाशिक ग्रामपंचायत निवडणूक, मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 16:05 IST

पहिल्यांदाच होत असलेल्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये उत्सुकता दिसून आली.

सिन्नर - पहिल्यांदाच होत असलेल्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये उत्सुकता दिसून आली. सिन्नर तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासह सदस्यांच्या निवडणुकीस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मतदानासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर गर्दी दिसून येत होती.

सिन्नर तालुक्यातील आशापूर, डुबेरवाडी, कीर्तांगळी, कारवाडी, शास्त्रीनगर, नांदूरशिंगोटे, पाटपिंप्री, शहा, सायाळे, ठाणगाव, उजनी व वडगावपिंगळा या १२ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासह ९८ सदस्यपदाच्या निवडणुकीच्या मतदानाला सकाळी साडेसात वाजता प्रारंभ झाला. सकाळपासून प्रत्येक केंद्रावर मतदानाला गर्दी दिसून आली.

१२ सरपंच व ९८ सदस्यांसाठी १२ ग्रामपंचायतींमध्ये मतदान होत आहे. २२ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ४२ मतदान केंद्रावर होत असलेल्या १२ गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६ निवडणूक अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली होती.

सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत या १२ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ३८ टक्के मतदान झाले होती. दुपारी दीड वाजता मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आसपास पोहचली होती. त्यानंतर दुपारी तीन वाजता मतदानाच्या टक्केवारीने ६० पर्यंत पोहचली होती. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नांदूरशिंगोटे व ठाणगाव येथे वादळी वाºयासह पावसाला प्रारंभ झाल्याने उमेदवार, कार्यकर्ते व मतदारांची धावपळ उडाली.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचे असते. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करतांना दिसून येते होते. नांदूरशिंगोटे येथील सरपंचपद सर्वसाधारण असल्याने येथे मोठी चुरस दिसून आली. दुपारी तीन वाजेपर्यंत तालुक्यात शांततेत मतदान झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. वावी, सिन्नर व एमआयडीसी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरु असणार असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.