शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

नाशिकला ‘मायनिंग प्लॅनिंग’साठी मिळेना सल्लागार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 15:11 IST

पर्यावरणाचे संवर्धन व -हास टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने गौणखनिजाबाबत नवीन धोरण स्वीकारले असून, त्याची अंमलबजावणी राज्यांना सक्तीची केली आहे. गौणखनिजात समाविष्ट असलेल्या दगड, मुरूम, माती, वाळू यांचा उपसा, वाहतूक व साठवणूक करताना पर्यावरणाची खबरदारी घेतली जावी, असे स्पष्ट निर्देश केंद्र

ठळक मुद्देजाहिरातीकडे दोनवेळा पाठ : गौणखनिज विभागाची डोकेदुखीगौणखनिजाचा उपसा, वाहतूक व साठवणुकीबाबत केलेल्या नवीन कायद्या

नाशिक : केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने गौणखनिजाचा उपसा, वाहतूक व साठवणुकीबाबत केलेल्या नवीन कायद्यानुसार मायनिंग प्लॅनिंग करण्यासाठी त्रयस्थ कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्याची बाब स्थानिक गौणखनिज विभागाची डोकेदुखी ठरली आहे. तांत्रिक सल्लागार नेमण्यासाठी यापूर्वी दोनवेळा जाहिरात देऊन एकही कंपनी या कामासाठी पुढे येत नसल्याने नेमके काय करावे, असा प्रश्न या विभागाला पडला आहे.पर्यावरणाचे संवर्धन व -हास टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने गौणखनिजाबाबत नवीन धोरण स्वीकारले असून, त्याची अंमलबजावणी राज्यांना सक्तीची केली आहे. गौणखनिजात समाविष्ट असलेल्या दगड, मुरूम, माती, वाळू यांचा उपसा, वाहतूक व साठवणूक करताना पर्यावरणाची खबरदारी घेतली जावी, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिलेले असल्यामुळे यापुढे गौणखनिज उपसा करण्यासाठी लिलाव काढण्यापूर्वी ज्या ठिकाणाहून ते काढले जाईल त्याचे मायनिंग प्लॅन तयार करणे सक्तीचे केले आहे. यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाचा सखोल अभ्यास असणे व मायनिंग प्लॅनिंगचा किमान तीन वर्षे अनुभव असणे आवश्यक धरण्यात आले आहे. मायनिंग प्लॅनमध्ये प्रामुख्याने ज्या ठिकाणाहून दगड, माती, मुरूम वा वाळूचा उपसा केला जाईल त्या ठिकाणाचा संपूर्ण अभ्यास करून गौणखनिज उपसामुळे पर्यावरणावर काय परिणाम होईल याचा अहवाल तयार करणे, किती गौणखनिज उपसा होईल याचा अंदाज बांधणे, या खनिजाची वाहतूक केल्या जाणाºया मार्गाचा सविस्तर वाहतूक आराखडा, त्याची साठवणूक केल्या जाणाºया ठिकाणाचाही विस्तृत अहवाल तयार करणे आदी बाबींचा समावेश आहे. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाºयांना यासंदर्भात पत्र पाठवून प्रत्येक जिल्ह्यात मायनिंग प्लॅनिंग करणारी कंपनी नेमण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा गौणखनिज विभागाने जानेवारी महिन्यात एक व फेब्रुवारी महिन्यात एक अशाप्रकारे दोन वेळा वृत्तपत्रातून जाहिरात देऊन सल्लागार कंपनीसाठी अर्ज मागविले, परंतु शासनाच्या या जाहिरातीला एकही प्रतिसाद मिळालेला नाही. पुन्हा तिसºयांदा जाहिरात देऊन सल्लागार कंपनीला आवाहन करण्यात येणार आहे. मात्र सल्लागार कंपनीची नेमणूक न झाल्यास गौणखनिजाचे यापुढील परवाने वा करार अडचणीत येणार असून, मायनिंग प्लॅनिंगशिवाय कोणत्याही गौणखनिजाचा लिलाव करणे अशक्य आहे. परिणामी जिल्हा गौणखनिज विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक