शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

नाशिकला ‘मायनिंग प्लॅनिंग’साठी मिळेना सल्लागार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 15:11 IST

पर्यावरणाचे संवर्धन व -हास टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने गौणखनिजाबाबत नवीन धोरण स्वीकारले असून, त्याची अंमलबजावणी राज्यांना सक्तीची केली आहे. गौणखनिजात समाविष्ट असलेल्या दगड, मुरूम, माती, वाळू यांचा उपसा, वाहतूक व साठवणूक करताना पर्यावरणाची खबरदारी घेतली जावी, असे स्पष्ट निर्देश केंद्र

ठळक मुद्देजाहिरातीकडे दोनवेळा पाठ : गौणखनिज विभागाची डोकेदुखीगौणखनिजाचा उपसा, वाहतूक व साठवणुकीबाबत केलेल्या नवीन कायद्या

नाशिक : केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने गौणखनिजाचा उपसा, वाहतूक व साठवणुकीबाबत केलेल्या नवीन कायद्यानुसार मायनिंग प्लॅनिंग करण्यासाठी त्रयस्थ कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्याची बाब स्थानिक गौणखनिज विभागाची डोकेदुखी ठरली आहे. तांत्रिक सल्लागार नेमण्यासाठी यापूर्वी दोनवेळा जाहिरात देऊन एकही कंपनी या कामासाठी पुढे येत नसल्याने नेमके काय करावे, असा प्रश्न या विभागाला पडला आहे.पर्यावरणाचे संवर्धन व -हास टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने गौणखनिजाबाबत नवीन धोरण स्वीकारले असून, त्याची अंमलबजावणी राज्यांना सक्तीची केली आहे. गौणखनिजात समाविष्ट असलेल्या दगड, मुरूम, माती, वाळू यांचा उपसा, वाहतूक व साठवणूक करताना पर्यावरणाची खबरदारी घेतली जावी, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिलेले असल्यामुळे यापुढे गौणखनिज उपसा करण्यासाठी लिलाव काढण्यापूर्वी ज्या ठिकाणाहून ते काढले जाईल त्याचे मायनिंग प्लॅन तयार करणे सक्तीचे केले आहे. यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाचा सखोल अभ्यास असणे व मायनिंग प्लॅनिंगचा किमान तीन वर्षे अनुभव असणे आवश्यक धरण्यात आले आहे. मायनिंग प्लॅनमध्ये प्रामुख्याने ज्या ठिकाणाहून दगड, माती, मुरूम वा वाळूचा उपसा केला जाईल त्या ठिकाणाचा संपूर्ण अभ्यास करून गौणखनिज उपसामुळे पर्यावरणावर काय परिणाम होईल याचा अहवाल तयार करणे, किती गौणखनिज उपसा होईल याचा अंदाज बांधणे, या खनिजाची वाहतूक केल्या जाणाºया मार्गाचा सविस्तर वाहतूक आराखडा, त्याची साठवणूक केल्या जाणाºया ठिकाणाचाही विस्तृत अहवाल तयार करणे आदी बाबींचा समावेश आहे. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाºयांना यासंदर्भात पत्र पाठवून प्रत्येक जिल्ह्यात मायनिंग प्लॅनिंग करणारी कंपनी नेमण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा गौणखनिज विभागाने जानेवारी महिन्यात एक व फेब्रुवारी महिन्यात एक अशाप्रकारे दोन वेळा वृत्तपत्रातून जाहिरात देऊन सल्लागार कंपनीसाठी अर्ज मागविले, परंतु शासनाच्या या जाहिरातीला एकही प्रतिसाद मिळालेला नाही. पुन्हा तिसºयांदा जाहिरात देऊन सल्लागार कंपनीला आवाहन करण्यात येणार आहे. मात्र सल्लागार कंपनीची नेमणूक न झाल्यास गौणखनिजाचे यापुढील परवाने वा करार अडचणीत येणार असून, मायनिंग प्लॅनिंगशिवाय कोणत्याही गौणखनिजाचा लिलाव करणे अशक्य आहे. परिणामी जिल्हा गौणखनिज विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक