शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक विभागाचा ८८.२२ टक्के निकाल

By admin | Updated: May 31, 2017 00:33 IST

नाशिक विभागाचा ८८.२२ टक्के निकाल

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा (बारावी) निकाल मंगळवारी (दि.३०) जाहीर झाला आहे. नाशिक विभागातून या परीक्षेत ८८.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत ९२.३८ टक्के मुली, तर ८५.११ टक्के मुलांनी यश प्राप्त केले केले असून, यंदा बारावीच्या परीक्षेत मुलांपेक्षा ७.१७ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्याने यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. नाशिक विभागातून बारावीच्या परीक्षेत ९१ हजार ८६ मुली, ८६ हजार २५१ मुले असे एकूण एक लाख ५९ हजार ३३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ४० हजार ५७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गोधने यांनी पत्रकार परिषदेत दिली. या परीक्षेत ७७ हजार ५२३ मुलींसह ६३ हजार ५१ मुले उत्तीर्ण झाले. या परीक्षेत नाशिक जिल्ह्णातून ७० हजार १७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७० हजार ९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६१ हजार ४७ म्हणजेच ८७.९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले . धुळे जिल्ह्णात १९५ कनिष्ठ महाविद्यालयांतील २४,४४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २४ हजार ४०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील २२,१८६ म्हणजेच ९०.८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जळगावच्या २७७ महाविद्यालयांमधून नोंदणी केलेल्या ४९,१७९ विद्यार्थ्यांपैकी ४९,१०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ४३,०२७ म्हणजे ८७.६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.इन्फो - विभागात नंदुरबार अव्वल नाशिक विभागातील सर्वाधिक निकाल नंदुरबार जिल्ह्णाचा लागला. अतिशय दुर्गम भाग असलेल्या आदिवासी नंदुरबार जिल्ह्णात १४,३१५ (९१.०५ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्णातून सर्वाधिक (६१,०४७) विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी नाशिकमधून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही अधिक असल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत नाशिकची घसरण झाली आहे.  विक्रम मोडीतबारावीच्या परीक्षेत नाशिक विभागातील विद्यार्थ्यांची कामगिरी उंचावली आहे. २०१५ मध्ये ८८.१३ टक्के, २०१६ मध्ये ८३.९९ टक्के निकाल लागला होता. तर यंदा ८८.२२ टक्के असा सर्वाधिक निकाल लागला आहे.