शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

नाशिकमध्ये रस्ता दुभाजकांमध्ये वड, पिंपळ वृक्ष लागवडीवर फुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 14:46 IST

महापालिका : उद्यान विभागाकडून धोरण राबविण्याचा विचार

ठळक मुद्देसिंहस्थ कुंभमेळा काळात शहरातील गंगापूररोड, दिंडोरीरोड या मार्गांचे रुंदीकरण करताना महापालिकेला मोठ्या दिव्यातून जावे लागलेभविष्यात मेट्रो, बीआरटीएस यांसारखे प्रकल्प राबविले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही

नाशिक : वेगाने विस्तारणा-या शहरात रस्ता रुंदीकरणात वड, पिंपळासारखे मोठे वृक्ष हटवण्यास न्यायालयाचे निर्बंध असल्याने यापुढे रस्ता दुभाजकांमध्ये अशा वृक्षांचे रोपणच न करण्याचे धोरण महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. भविष्यातील स्मार्ट सिटीचा विचार करता अशा प्रकारचे धोरण अनिवार्य ठरणार आहे.सिंहस्थ कुंभमेळा काळात शहरातील गंगापूररोड, दिंडोरीरोड या मार्गांचे रुंदीकरण करताना महापालिकेला मोठ्या दिव्यातून जावे लागले. या मार्गावरील वृक्ष तोडण्यास पर्यावरणप्रेमींनी हरकत घेत थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने काही अटी-शर्तींवर वृक्ष तोडण्यास परवानगी दिली. परंतु, वड, पिंपळ, नांदुरका यांसारखे सावली देणारे मोठे वृक्ष हटविण्यास मनाई केली. त्यामुळे, गंगापूररोडवरील सुमारे सात, तर दिंडोरीरोडवरील ३८ वृक्षं महापालिकेला हटवता आले नाही. महापालिकेमार्फत दरवर्षी वृक्षलागवड केली जात असते याशिवाय, शासनाच्या निर्देशानुसारही वृक्षलागवडीचे उपक्रम होत असतात. महापालिकेने गेल्या तीन-चार वर्षांत शहरातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण केले असून, दुभाजकांमध्ये वृक्षलागवड केलेली आहे. परंतु, भविष्यातील विकासाची दिशा लक्षात घेत उद्यान विभागाने आता दुभाजकांमध्ये वड, पिंपळ, नांदुरका यांसारख्या वृक्ष लागवडीवर फुली मारली आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत येत्या ५ ते १० वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत. भविष्यात मेट्रो, बीआरटीएस यांसारखे प्रकल्प राबविले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता दुभाजकांमध्ये वड, पिंपळासारख्या वृक्षांची लागवड केल्यास भविष्यात त्यांना हटविणे मुश्किल बनणार आहे. परिणामी, आतापासूनच रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये वड, पिंपळाचे वृक्षं लावण्याऐवजी ते रस्त्याच्या दुतर्फा लावण्यावरच भर देण्याचा विचार उद्यान विभागाने सुरू केला आहे आणि त्यानुसार, काही ठिकाणी त्याची अंमलबजावणीदेखील सुरू केल्याची माहिती उद्यान विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. गंगापूररोड आणि दिंडोरीरोडवरील वड, पिंपळ वृक्षं हटविण्यास न्यायालयाची मनाई आहे. सद्य:स्थितीत न्यायालयात याचिका प्रलंबित असून, येत्या १६ फेबु्रवारीला सुनावणी आहे. तोपर्यंत गंगापूररोड व दिंडोरीरोडवरील मधोमध असलेल्या वृक्षांबाबतची समस्या कायम असणार आहे. दरम्यान, दुभाजकांमध्ये कमी उंचीची आणि शोभेची झाडे लावण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.३० टक्के वृक्ष मृतमहापालिकेने दीड वर्षांपूर्वी शहरात २१ हजार वृक्षांची लागवड मक्तेदारांमार्फत केली होती. त्यासाठी मक्तेदारांना दहा फूटावरील वृक्ष लागवडीचे बंधन घालण्यात आले होते. त्यानुसार, वृक्षलागवड झाली परंतु, त्यातील ७० टक्के झाडे जगल्याचा दावा महापालिकेच्या उद्यान विभागाने केला असून, उर्वरित ३० टक्के झाडांची पुन्हा एकदा संबंधित मक्तेदारांकडूनच लागवड करून घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका