शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

नाशिक विभागाचा निकाल ८६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:29 IST

महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नाशिक विभागाचा निकाल ८६.१३ टक्के इतका लागला.

नाशिक : महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नाशिक विभागाचा निकाल ८६.१३ टक्के इतका लागला. मागील वर्षीनिकालाची टक्केवारी ८८.२२ इतकी होती. यंदाही विभागात मुलीच हुशार असल्याचे सिद्ध झाले असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९० टक्के इतके आहे. विद्यार्थ्यांना येत्या १२ जून रोजी गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे.फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा नाशिक विभागाचा निकाल विभागाचे सचिव मारवाडी यांनी जाहीर केला. त्यानुसार विभागात नाशिक जिल्ह्याचा निकाल ८६.८५ टक्के इतका लागला. धुळे जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ८८.८७ टक्के, तर जळगाव जिल्ह्याचा निकाल ८४.२० आणि नंदुरबार जिल्ह्याचा निकाल ८४.७० टक्के इतका लागला. विभागाच्या एकूण निकालाची टक्केवारी ८६.१३ इतकी आहे.  नाशिक विभागातून १ लाख ६० हजार २८४ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ३८ हजार ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.१३ टक्के इतके आहे. विभागातील २२६ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. विभागात एकूण २२४ कॉपीचे गैरप्रकार समोर आले होते.मुलींचीच बाजीनाशिक विभागात सातत्याने मुलींनी बोर्डाच्या परीक्षेत झेंडा रोवला आहे. यावर्षीदेखील मुली याला अपवाद नाहीत. विभागातील चारही जिल्ह्यांत मुलींचा वरचष्मा राहिला आहे. विभागात ९१,०४७ मुलांनी परीक्षा दिली होती, त्यातील ७५,३०७ मुले उत्तीर्ण झाली. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८२.७१ टक्के इतके आहे, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.६३ टक्के इतके आहे. विभागात ६९,२३७ मुली परीक्षार्थी होत्या, त्यापैकी ६२,७४८ मुली उत्तीर्ण झाल्या.पुनर्मूल्यांकनाबाबतफेब्रुवारी-मार्च २०१८ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित शुल्क भरून विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांना अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचेपुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी मंडळाशी संपर्क करावा, असेदेखील आवाहन करण्यात आले आहे.गुणपडताळणी आणि छायाप्रतीआॅनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची व्यवस्था परीक्षा मंडळाने केली आहे. यासाठी आवश्यक त्या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. संकेतस्थळावरील अर्जाची प्रत काढून तो अर्ज विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. यासंदर्भात आवश्यकता असल्यास माहितीसाठी या विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या साक्षांकित प्रतीसह गुरुवार, दि. ३१ मे ते शनिवार, दि. ९ जूनपर्यंत विहित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. छायांकित प्रतीसाठी गुरुवार, दि. ३१ मे ते मंगळवार, दि. १९ जूनपर्यंत विहित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८