शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

नाशिक विभागाचा निकाल ८६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:29 IST

महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नाशिक विभागाचा निकाल ८६.१३ टक्के इतका लागला.

नाशिक : महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नाशिक विभागाचा निकाल ८६.१३ टक्के इतका लागला. मागील वर्षीनिकालाची टक्केवारी ८८.२२ इतकी होती. यंदाही विभागात मुलीच हुशार असल्याचे सिद्ध झाले असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९० टक्के इतके आहे. विद्यार्थ्यांना येत्या १२ जून रोजी गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे.फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा नाशिक विभागाचा निकाल विभागाचे सचिव मारवाडी यांनी जाहीर केला. त्यानुसार विभागात नाशिक जिल्ह्याचा निकाल ८६.८५ टक्के इतका लागला. धुळे जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ८८.८७ टक्के, तर जळगाव जिल्ह्याचा निकाल ८४.२० आणि नंदुरबार जिल्ह्याचा निकाल ८४.७० टक्के इतका लागला. विभागाच्या एकूण निकालाची टक्केवारी ८६.१३ इतकी आहे.  नाशिक विभागातून १ लाख ६० हजार २८४ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ३८ हजार ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.१३ टक्के इतके आहे. विभागातील २२६ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. विभागात एकूण २२४ कॉपीचे गैरप्रकार समोर आले होते.मुलींचीच बाजीनाशिक विभागात सातत्याने मुलींनी बोर्डाच्या परीक्षेत झेंडा रोवला आहे. यावर्षीदेखील मुली याला अपवाद नाहीत. विभागातील चारही जिल्ह्यांत मुलींचा वरचष्मा राहिला आहे. विभागात ९१,०४७ मुलांनी परीक्षा दिली होती, त्यातील ७५,३०७ मुले उत्तीर्ण झाली. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८२.७१ टक्के इतके आहे, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.६३ टक्के इतके आहे. विभागात ६९,२३७ मुली परीक्षार्थी होत्या, त्यापैकी ६२,७४८ मुली उत्तीर्ण झाल्या.पुनर्मूल्यांकनाबाबतफेब्रुवारी-मार्च २०१८ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित शुल्क भरून विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांना अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचेपुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी मंडळाशी संपर्क करावा, असेदेखील आवाहन करण्यात आले आहे.गुणपडताळणी आणि छायाप्रतीआॅनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची व्यवस्था परीक्षा मंडळाने केली आहे. यासाठी आवश्यक त्या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. संकेतस्थळावरील अर्जाची प्रत काढून तो अर्ज विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. यासंदर्भात आवश्यकता असल्यास माहितीसाठी या विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या साक्षांकित प्रतीसह गुरुवार, दि. ३१ मे ते शनिवार, दि. ९ जूनपर्यंत विहित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. छायांकित प्रतीसाठी गुरुवार, दि. ३१ मे ते मंगळवार, दि. १९ जूनपर्यंत विहित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८