शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

नाशिक जिल्ह्यात कोसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 02:01 IST

हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २) मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गोदावरीसह अन्य नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे.

ठळक मुद्दे४१५ मिलिमीटर पाऊस , नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; ६० जणांना हलविले सुरक्षितस्थळी

नाशिक : हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २) मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गोदावरीसह अन्य नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभरात तब्बल १७१ मिलिमीटर पाऊस झाल्याने धरण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग वाढविल्यामुळे गोदावरीला पूर आला असून, जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.नाशिकच्या गंगापूर आणि दारणा धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरण ८७ टक्के, तर दारणा ८८ टक्के भरले आहे. शनिवारी (दि. ३) गंगापूरमधून १७ हजार ७४८ हजार, दारणातून २३ हजार क्यूसेक विसर्ग सुरू असून, नांदूरमधमेश्वरमधून मराठवाड्याला जायवाडी धरणासाठी तब्बल ८३ हजार ७७३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात दिवसभरात सुमारे ४१५.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गोदावरी व दारणेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गोदावरीच्या पुरामुळे दुतोंड्या मारुती बुडून रामसेतूवरूनही पाणी गेले. तर दारणा नदीची पाणीपातळी वाढल्याने लहवीत-वंजारवाडी पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील गावांचा संपर्क तुटला होता. खबरदारीचा उपाय म्हणून येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाशिकसह, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा आदी तालुक्यांमध्ये शुक्रवारी (दि. २) मध्यरात्रीपासून जोरदार श्रावणसरी कोसळल्या असून, पावसाचा जोर वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सायखेडा गावातील सुमारे ६० जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. गंगापूर व दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे गंगापूर धरणांची पातळी वाढली असून, दोन्ही धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरीला या पावसाळ्यातील सर्वांत मोठा पूर आला आहे. गंगापूर धरणसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने शनि२९वारी सकाळी ९ वाजता गंगापूर धरणातून सुरू असलेल्या ११ हजार क्यूसेकचा विसर्ग दुपारी १ वाजता १३ हजार, तर दुपारी २ वाजता १७ हजार ७४८ क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला, धरणसाठ्यात वाढ सुरूच असल्याने सायंकाळी ५ वाजता होळकर पुलाखालून तब्बल २० हजार क्यूसेक विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.इन्पो-जिल्ह्णातील धरणातून विसर्ग (क्यूसेक)गंगापूर : १७ हजार ७४८गौतमी गोदावरी : ६ हजार २२५आळंदी : ६८७दारणा : २३ हजार १९२भावली : १ हजार ५०९वालदेवी : ५०२नांदूरमधमेश्वर : ८३ हजार ७७३.पालखेड ५ हजार ३०७चनकापूर : ७ हजार ३०७पूनद : २८९५ क्यूसेकहरणबरी ५६ क्यूसेकहोळकर पूल : २० हजार ३७५——इन्फो-दिवसभरातील तालुकानिहाय पाऊसनाशिक जिल्ह्णात शनिवारी (दि.३) सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ४१५.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक त्र्यंबकेश्वर तालुक्यात १७१ मिलीमीटर पाऊस कोसळला असून, नाशिकमध्ये २१.१, इगतपुरी ४०, दिंडोरी ३१, पेठ ७६ व सुरगाण्यात ७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर चांदवडमध्ये अवघा दोन व कळवणमध्ये एक मिलीमीटर पाऊस पडला असून, सिन्नर, देवळा, येवला, नांदगाव या तालुक्यांसाठी शनिवारचा दिवस कोरडाच गेला.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरीfloodपूर