शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा कृषी पर्यटन घोषित करावा

By admin | Updated: September 28, 2016 01:14 IST

जागतिक पर्यटन दिन : कृषी पर्यटन चर्चासत्रात सूर

नाशिक : महाराष्ट्रात ३२८ कृषी पर्यटन केंद्र असून, त्याद्वारे वार्षिक १७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते़ नाशिक जिल्ह्याचा भौगोलिक व ऐतिहासिकदृष्ट्या असलेले महत्त्वच येथील निसर्गरम्य ठिकाणे व आल्हाददायक वातावरण यामुळे कृषी पर्यटनाला चांगला वाव आहे़ नाशिक जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्रांची संख्या वाढविण्यासाठी शासनाने प्रचार - प्रसार व प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असून, नाशिकला कृषी पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र स्टेट अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड रुरल टुरिझमचे अध्यक्ष पांडुरंग तावरे यांनी केले़ जागतिक पर्यटन दिनानिमित्त संस्कृती अ‍ॅग्रो टुरिझम (मामाचा मळा) येथे आयोजित कृषी पर्यटनातील संधी या विषयावर ते बोलत होते़ पुढे बोलताना ते म्हणाले की, कृषी पर्यटनामुळे पर्यावरणाचे संवर्धन तर होतेच, पण त्याचबरोबर ग्रामीण संस्कृतीचे दर्शन व संवर्धन, स्थानिकांना रोजगार निर्माण होतो़ त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला व गावरान उत्पादनांना एक बाजारपेठ मिळते़ विशेष म्हणजे या कृषी पर्यटनासाठी खूप मोठ्या जमिनीची गरज असते असे नाही, तर पाच एकर शेती असणारे आपल्या शेतातील २० टक्के भाग हा कृषी पर्यटनासाठी वापरू शकतात़ विशेष म्हणजे यासाठी शासनाच्या आठ खोल्यांची परवानगीचीही आवश्यकता नाही़ त्यातच शासनाने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना कृषी सहल अनिवार्य केली असून, या पर्यटनाच्या कक्षा अधिक रुंदावल्या आहेत़ भारतात दरवर्षी साधारणत: एक कोटी पर्यटक येतात यातील बहुतांशी पर्यटकांना कृषी पर्यटनाकडे साद घालणे सहज शक्य आहे़ असे तावरे म्हणाले़ यावेळी दिलीपसिंह बेनीवाल, तुकाराम बोराडे, मुरलीधर पाटील, उपस्थित होते़ प्रास्ताविक दिग्विजय मानकर यांनी केले़ आभार चंद्रशेखर कापसे यांनी मानले़ (प्रतिनिधी)