शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा कृषी पर्यटन घोषित करावा

By admin | Updated: September 28, 2016 01:14 IST

जागतिक पर्यटन दिन : कृषी पर्यटन चर्चासत्रात सूर

नाशिक : महाराष्ट्रात ३२८ कृषी पर्यटन केंद्र असून, त्याद्वारे वार्षिक १७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते़ नाशिक जिल्ह्याचा भौगोलिक व ऐतिहासिकदृष्ट्या असलेले महत्त्वच येथील निसर्गरम्य ठिकाणे व आल्हाददायक वातावरण यामुळे कृषी पर्यटनाला चांगला वाव आहे़ नाशिक जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्रांची संख्या वाढविण्यासाठी शासनाने प्रचार - प्रसार व प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असून, नाशिकला कृषी पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र स्टेट अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड रुरल टुरिझमचे अध्यक्ष पांडुरंग तावरे यांनी केले़ जागतिक पर्यटन दिनानिमित्त संस्कृती अ‍ॅग्रो टुरिझम (मामाचा मळा) येथे आयोजित कृषी पर्यटनातील संधी या विषयावर ते बोलत होते़ पुढे बोलताना ते म्हणाले की, कृषी पर्यटनामुळे पर्यावरणाचे संवर्धन तर होतेच, पण त्याचबरोबर ग्रामीण संस्कृतीचे दर्शन व संवर्धन, स्थानिकांना रोजगार निर्माण होतो़ त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला व गावरान उत्पादनांना एक बाजारपेठ मिळते़ विशेष म्हणजे या कृषी पर्यटनासाठी खूप मोठ्या जमिनीची गरज असते असे नाही, तर पाच एकर शेती असणारे आपल्या शेतातील २० टक्के भाग हा कृषी पर्यटनासाठी वापरू शकतात़ विशेष म्हणजे यासाठी शासनाच्या आठ खोल्यांची परवानगीचीही आवश्यकता नाही़ त्यातच शासनाने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना कृषी सहल अनिवार्य केली असून, या पर्यटनाच्या कक्षा अधिक रुंदावल्या आहेत़ भारतात दरवर्षी साधारणत: एक कोटी पर्यटक येतात यातील बहुतांशी पर्यटकांना कृषी पर्यटनाकडे साद घालणे सहज शक्य आहे़ असे तावरे म्हणाले़ यावेळी दिलीपसिंह बेनीवाल, तुकाराम बोराडे, मुरलीधर पाटील, उपस्थित होते़ प्रास्ताविक दिग्विजय मानकर यांनी केले़ आभार चंद्रशेखर कापसे यांनी मानले़ (प्रतिनिधी)