शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्यात चूल बंद !

By श्याम बागुल | Updated: September 20, 2018 14:54 IST

दोन वर्षापुर्वी अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांपुरती मर्यादीत असलेली पंतप्रधान उज्वला योजनेत आता ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक दुर्बल असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सहभागी करून घेण्यात येत आहे. शंभर रूपयांच्या प्रतिज्ञापत्रावर व आवश्यक त्या निवास पुराव्याच्या आधारे गॅस एजन्सीकडून

ठळक मुद्देघासलेट मुक्तीकडे वाटचाल : ८४ हजाराने कोटा कमीगेल्या महिन्यात ८४ हजार लिटर मागणी कमी

नाशिक : गोरगरिबांना दोन वेळेचे अन्न शिजविण्यासाठी लागणारे इंधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घासलेटचा वापर कमी करून त्याच्या सबसिडीवर होणारा खर्च वाचविण्यासाठी सरकारकडून स्वयंपाकासाठी घासलेट ऐवजी गॅस सिलींडर वापराचा धरला जात असून, त्यामुळे सिन्नर, निफाड आणि मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या महिन्यापासून नागरिकांनी एक लिटरही घासलेटची मागणी न करता चूल कायमचीच बंद करून टाकली आहे. जिल्ह्याला दरमहा मिळणा-या घासलेटच्या कोट्यात गेल्या महिन्यात ८४ हजार लिटर मागणी कमी झाल्याने जिल्ह्याची घासलेट मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.दोन वर्षापुर्वी अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांपुरती मर्यादीत असलेली पंतप्रधान उज्वला योजनेत आता ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक दुर्बल असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सहभागी करून घेण्यात येत आहे. शंभर रूपयांच्या प्रतिज्ञापत्रावर व आवश्यक त्या निवास पुराव्याच्या आधारे गॅस एजन्सीकडून घरपोहोच गॅस सिलींडर उपलब्ध करून दिले जात असून, जिल्ह्यात अलिकडच्या काळात जवळपास एक लाख, ४६ हजार नवीन गॅस जोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच स्वयंपाकासाठी लागणाºया घासलेटची मागणी कमी होण्यास मदत झाली असून, एकेकाळी साडेआठ लाख लिटर दरमहा घासलेट लागणाºया नाशिक जिल्ह्याचा कोटा गेल्या वर्षभरात जवळपास पाच लाख लिटरने कमी झाला आहे. घासलेटची खुल्या बाजारात असलेली किंमत व कार्डधारकांना स्वस्त दरात पुरविण्यात येत असलेल्या किंमतीत शासनाला दरमहा लाखो कोटीचा खर्च उचलावा लागतो, तो कमी करण्यासाठी घासलेट ऐवजी गॅसचा वापर व्हावा जेणे करून खर्च कमी व निसर्गाचा ºहास रोखण्यास मदत होण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या काही वर्षापासून एक व दोन सिलींडर असलेल्या ग्राहकांचे घासलेट पुर्णत: बंद करण्यात आल्यामुळे देखील घासलेटचा वापर कमी होण्यास मदत झाली होती. सध्या नाशिक जिल्ह्यासाठी तीन लाख, ३६हजार लिटर घासलेट लागत असून, त्यातही मालेगाव शहरातील झोपडपट्टीधारकांमध्ये घासलेट वापरणाºयांची संख्या अधिक आहे. गेल्या महिन्यात दिंडोरी, येवला या तालुक्यांनी घासलेटचे प्रत्येकी एक टॅँकर कमी केले असून, चालू महिन्यात ही संख्या आणखी कमी होण्याची अपेक्षा पुरवठा खाते बाळगून आहे. दरमहा घासलेट वापरणाºयांचा आढावा पुरवठा खात्याकडून घेतला जात असल्याने त्यात मागणीत घटच होत असल्याचे आढळून आले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक