शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

नाशिक-औरंगाबाद महामार्ग काही काळ ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 18:01 IST

निफाड : निफाड व परिसराला मुसळधार पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते तर शेतांमध्ये प्रचंड पाणी साठल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान होणार आहे. मुसळधार पावसाने झोडपल्याने नाशिक औरंगाबाद महामार्गावर निफाड ते शिवरेफाटा या दरम्यान बर्याच भागात पाणी साचल्याने वाहतूक एक तास ठप्प झाली होती.

ठळक मुद्देनिफाड परिसराला मुसळधार पावसाने झोडपल्यानेवाहतुकविस्कळीत

निफाड : निफाड व परिसराला मुसळधार पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते तर शेतांमध्ये प्रचंड पाणी साठल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान होणार आहे. मुसळधार पावसाने झोडपल्याने नाशिक औरंगाबाद महामार्गावर निफाड ते शिवरेफाटा या दरम्यान बर्याच भागात पाणी साचल्याने वाहतूक एक तास ठप्प झाली होती.बुधवारी (दि. ५) सायंकाळी साडेसहा ते ८ वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक-औरंगाबाद महामार्गावर निफाड येथील शांतीनगर चौफुली ते आचोळा नाला, शिवरे फाटा या दरम्यान बऱ्याच भागात अक्षरश: वाहणारी नदी वाटावी इतके पाणी रस्त्यावर आल्याने मगामार्ग गडप झाला होता. त्यामुळे या मार्गावर सुमारे १ तास वाहतूक विस्कळीत झाली होती.या रस्त्यावर साठलेल्या पाण्यातून वाट काढताना तीन ते चार मोटरसायकलस्वार खाली पाण्यात पडले. चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या काहींना हा मार्ग एक तास बंद झाल्यामुळे २० ते २५ कि.मी. चा फेरा करून वाहनधारकांना लासलगाव मनमाड जावे लागले.नाशिक औरंगाबाद महामार्गावरील निफाड येथील शांतीनगर चौफुली ते शिवरें फाटा या ३ किमी अंतराच्या दरम्यान पावसाचे पाणी तुडुंब भरून रस्त्यावर साचल्याने महामार्गावरील वाहतूक दरवर्षी विस्कळीत होत असते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या( बी ओ टी) दुर्लक्षामुळे हि समस्या अनेक वर्षांपासून जैसे थे आहे.निफाड येथील शांतीनगर त्रिफुली ते नैताळे या दरम्यान या महामार्गावर चौपदरीकरण करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बी ओ टी विभागाने पाणी काढण्यासाठी गटार व चेंबरच तयार केलेले नाही. अर्धा तास जरी पाऊस झाला तरी उजव्या बाजूच्या रस्ता दुभाजकावरून पाणी डाव्या बाजूला जाते आणि हा महामार्ग जलमय होऊन जातो आणि वाहतूक ठप्प होत असते पूर्वी नैसर्गिक पाण्याचा स्तोत वाहून जाणारे ओढे, नाले गडप झाल्याने हे पाणी रस्त्यावर साचून राहते, त्यामुळे हा रस्ता खचून खराब होतो.या मुसळधार पावसाने निफाड, जळगांव व परिसरातील गावांतील शेतांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होत आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRainपाऊस