शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-औरंगाबाद महामार्ग काही काळ ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 18:01 IST

निफाड : निफाड व परिसराला मुसळधार पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते तर शेतांमध्ये प्रचंड पाणी साठल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान होणार आहे. मुसळधार पावसाने झोडपल्याने नाशिक औरंगाबाद महामार्गावर निफाड ते शिवरेफाटा या दरम्यान बर्याच भागात पाणी साचल्याने वाहतूक एक तास ठप्प झाली होती.

ठळक मुद्देनिफाड परिसराला मुसळधार पावसाने झोडपल्यानेवाहतुकविस्कळीत

निफाड : निफाड व परिसराला मुसळधार पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते तर शेतांमध्ये प्रचंड पाणी साठल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान होणार आहे. मुसळधार पावसाने झोडपल्याने नाशिक औरंगाबाद महामार्गावर निफाड ते शिवरेफाटा या दरम्यान बर्याच भागात पाणी साचल्याने वाहतूक एक तास ठप्प झाली होती.बुधवारी (दि. ५) सायंकाळी साडेसहा ते ८ वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक-औरंगाबाद महामार्गावर निफाड येथील शांतीनगर चौफुली ते आचोळा नाला, शिवरे फाटा या दरम्यान बऱ्याच भागात अक्षरश: वाहणारी नदी वाटावी इतके पाणी रस्त्यावर आल्याने मगामार्ग गडप झाला होता. त्यामुळे या मार्गावर सुमारे १ तास वाहतूक विस्कळीत झाली होती.या रस्त्यावर साठलेल्या पाण्यातून वाट काढताना तीन ते चार मोटरसायकलस्वार खाली पाण्यात पडले. चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या काहींना हा मार्ग एक तास बंद झाल्यामुळे २० ते २५ कि.मी. चा फेरा करून वाहनधारकांना लासलगाव मनमाड जावे लागले.नाशिक औरंगाबाद महामार्गावरील निफाड येथील शांतीनगर चौफुली ते शिवरें फाटा या ३ किमी अंतराच्या दरम्यान पावसाचे पाणी तुडुंब भरून रस्त्यावर साचल्याने महामार्गावरील वाहतूक दरवर्षी विस्कळीत होत असते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या( बी ओ टी) दुर्लक्षामुळे हि समस्या अनेक वर्षांपासून जैसे थे आहे.निफाड येथील शांतीनगर त्रिफुली ते नैताळे या दरम्यान या महामार्गावर चौपदरीकरण करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बी ओ टी विभागाने पाणी काढण्यासाठी गटार व चेंबरच तयार केलेले नाही. अर्धा तास जरी पाऊस झाला तरी उजव्या बाजूच्या रस्ता दुभाजकावरून पाणी डाव्या बाजूला जाते आणि हा महामार्ग जलमय होऊन जातो आणि वाहतूक ठप्प होत असते पूर्वी नैसर्गिक पाण्याचा स्तोत वाहून जाणारे ओढे, नाले गडप झाल्याने हे पाणी रस्त्यावर साचून राहते, त्यामुळे हा रस्ता खचून खराब होतो.या मुसळधार पावसाने निफाड, जळगांव व परिसरातील गावांतील शेतांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होत आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRainपाऊस