शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

ओखी वादळाचा नाशिक जिल्ह्यातील १४२ गावांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:06 IST

महाराष्टÑातील अरबी समुद्रात दाखल झालेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम थेट नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत जाणवला होता. सलग तीन दिवस सुर्यदर्शन न होता, कडाक्याची थंडी तसेच अधून मधून पावसाच्या सरी या काळात कोसळल्या.

ठळक मुद्देद्राक्ष, कारल्याचे नुकसान : १२३१ हेक्टर क्षेत्र बाधित११८४ शेतक-यांचे नुकसान

नाशिक : गेल्या महिन्यात ४ व ५ डिसेंबर रोजी ओखी चक्रीवादळाने नाशिक जिल्ह्यातील शेती पिकांनाही चांगलाच फटका बसला असून, कृषी खात्याने प्रथम दर्शनी केलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील १४२ गावांना कमी-अधिक प्रमाणात या च्रकीवादळामुळे आलेल्या पावसाने झोडपून काढले आहे, त्यात ११८४ शेतक-यांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.महाराष्टÑातील अरबी समुद्रात दाखल झालेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम थेट नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत जाणवला होता. सलग तीन दिवस सुर्यदर्शन न होता, कडाक्याची थंडी तसेच अधून मधून पावसाच्या सरी या काळात कोसळल्या. त्यामुळे काढणीवर आलेल्या द्राक्षबागांवर मोठे संकट कोसळले. काही ठिकाणी द्राक्षबागांमध्ये पावसाचे पाणी साचले तर झोडपणा-या पावसामुळे घडे कोसळून पडण्याच्या व मण्यांना तडे जाण्याचे प्रकारही घडले. खळ्यावर काढून ठेवलेला कांदा, मका भिजण्याचेही प्रकार घडले आहेत. संपुर्ण राज्यातच ओखी वादळाने झोडपून काढल्यामुळे राज्य सरकारने पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश उशीराने काढले. त्यामुळे कृषी खात्याने केलेल्या पंचनाम्याविषयीही संशय घेतला जात आहे. त्यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील चांदवड, बागलाण तालुक्यातील सुमारे १२३१ हेक्टरवरील द्राक्ष बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. दिंडोरी तालुक्यात २० हेक्टर क्षेत्रावरील कारले पिकाचे नुकसान झाले. मात्र पावसाच्या या तडाख्यापासून तुर वाचल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक