शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नारपारची संजीवनी नांदगावला मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 01:39 IST

नांदगाव : गेली अनेक दशके पाणीटंचाईच्या झळा सोसताना उंचीच्या समस्येमुळे आपल्याला पाणी मिळूच शकणार नाही, आर्थिकदृष्ट्या तालुका सक्षम होणार नाही, विकासाची गंगा आपल्या दारी येणार नाही अशा नकारात्मक भूतकाळातून नांदगाव तालुका उन्नत भविष्याकडे वाटचाल करू शकणार आहे.. नारपारचे पाणी तालुक्याला संजीवनी देणारे ठरू शकते. ते आले तर पुढच्या पिढ्या सुखी होतील याची जाणीव झाल्याने तालुक्यात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. गेली दोन- अडीच वर्षे नारपारच्या पाण्याचा पाठपुरावा सुरू ठेवलेल्या नांदगाव तालुका पाणी संघर्ष समितीला केंद्र सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देगडकरी यांचे राज्य सरकारला पत्र पाणी संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला बळ

संजीव धामणे ।नांदगाव : गेली अनेक दशके पाणीटंचाईच्या झळा सोसताना उंचीच्या समस्येमुळे आपल्याला पाणी मिळूच शकणार नाही, आर्थिकदृष्ट्या तालुका सक्षम होणार नाही, विकासाची गंगा आपल्या दारी येणार नाही अशा नकारात्मक भूतकाळातून नांदगाव तालुका उन्नत भविष्याकडे वाटचाल करू शकणार आहे.. नारपारचे पाणी तालुक्याला संजीवनी देणारे ठरू शकते. ते आले तर पुढच्या पिढ्या सुखी होतील याची जाणीव झाल्याने तालुक्यात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. गेली दोन- अडीच वर्षे नारपारच्या पाण्याचा पाठपुरावा सुरू ठेवलेल्या नांदगाव तालुका पाणी संघर्ष समितीला केंद्र सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.नारपार प्रकल्पाच्या डीपीआरमध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश होण्यासाठी भूपृष्ठ वाहतूक व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला सूचित केले आहे. या संदर्भातील पत्र केंद्रीय जलसंसाधन विभागाचे विशेष अधिकारी यांच्याकडून पाणी संघर्ष समितीचे समाधान पाटील व डॉ. प्रभाकर पवार यांनी मिळविले असून, या लढ्यात सर्वपक्षीयांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.तालुक्यातील मोरझर परिसरात अत्यल्प पर्जन्यामुळे नागरिकांना स्थलांतराची वेळ आली आहे. पाणी कोठून आणता येईल, पर्जन्य विभाग काही मदत करू शकेल का याचा सन २०१५ पासून समितीने पाठपुरावा सुरू केला. तेव्हा नारपारमध्ये नांदगावचा समावेश करण्यात आलेला नव्हता. विविध शासकीय व प्रशासकीय स्तरावरील लोकांच्या गाठीभेटी घेत असताना नारपार प्रकल्पातून शाश्वत व कमी खर्चात पाणी मिळू शकते याची माहिती पाटील-पवार द्वयींना मिळाली. आंदोलने करून पाणी मागण्याआधी शास्त्रीय माहिती मिळवावी म्हणून अभियांत्रिकी ज्ञान व भौगोलिक चढउतार यांची माहिती संकलित करण्यात आली. आवश्यक नकाशे, समुद्रसपाटीपासूनची उंची यांचे कागद गोळा करत असताना तालुक्याच्या उंबरठ्यावरून दुसरीकडे जाणारा नारपार प्रकल्पाचा कालवा समोर आला. मनमाड अनकाईपासून जाणाऱ्या या कालव्याला टॅप केले तर? त्याची उंची ६२२ मीटर असल्याने व तालुक्यातील धरणे व गावांची उंची त्यापेक्षा कमी असल्याने गुरुत्वाकर्षणाने पाणी येऊ शकते हे स्पष्ट झाले.नारपारचा डीपीआर बनविण्यासाठी राष्ट्रीय जलनियामक प्राधिकरण, इंटरनशनल कन्सल्टंट इन वॉटर रिसोर्स पॉवर व इंफ्फ्रा. डेव्हलपमेंट या कंपन्या काम करत आहेत. नांदगावचा समावेश डीपीआरमध्ये करण्यात यावा असे केंद्र सरकारचे पत्र राज्य सरकारचे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल आणि तापी पाटबंधारे विभाग मंडळाचे कार्यकारी संचालक एस. डी. कुलकर्णी यांना प्राप्त झाले असून, संघर्ष समितीचे पाटील व पवार यांनी नुकतीच त्यांची भेट घेऊन पाठपुरावा केला आहे. डॉ. प्रवीण निकम, उदय पाटील हे त्यांच्यासह होते.तालुक्यात शेती सिंचनाचे प्रमाण फक्त ५ टक्के आहे. येथील खुंटलेल्या विकासात व शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीवरून त्याचे प्रतिबिंब दिसून येते. शेतीसाठी पाणी हा आजपर्यंत केवळ कल्पनाविलासच ठरला आहे. उपलब्ध माहितीनुसार नांदगाव तालुक्याचे दरडोई उत्पन्न आदिवासी तालुक्यांच्या बरोबरीने आहे. ही परिस्थिती नारपारच्या पाण्याने बदलू शकते. प्रशासनातल्या अधिकाºयांनी कालव्याला टॅप करून तालुक्यातील नाग्यासाक्या, दहेगाव, माणिकपुंज, मनमाड शहरासह अनेक छोटी धरणे, नद्या व नाले भरू शकतात याची पुष्टी केली. सध्या तालुक्यात पाणी साठवण क्षमता फक्त १.५ टीएमसी आहे. ती वाढवावी लागणार आहे.