शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नारपारची संजीवनी नांदगावला मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 01:39 IST

नांदगाव : गेली अनेक दशके पाणीटंचाईच्या झळा सोसताना उंचीच्या समस्येमुळे आपल्याला पाणी मिळूच शकणार नाही, आर्थिकदृष्ट्या तालुका सक्षम होणार नाही, विकासाची गंगा आपल्या दारी येणार नाही अशा नकारात्मक भूतकाळातून नांदगाव तालुका उन्नत भविष्याकडे वाटचाल करू शकणार आहे.. नारपारचे पाणी तालुक्याला संजीवनी देणारे ठरू शकते. ते आले तर पुढच्या पिढ्या सुखी होतील याची जाणीव झाल्याने तालुक्यात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. गेली दोन- अडीच वर्षे नारपारच्या पाण्याचा पाठपुरावा सुरू ठेवलेल्या नांदगाव तालुका पाणी संघर्ष समितीला केंद्र सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देगडकरी यांचे राज्य सरकारला पत्र पाणी संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला बळ

संजीव धामणे ।नांदगाव : गेली अनेक दशके पाणीटंचाईच्या झळा सोसताना उंचीच्या समस्येमुळे आपल्याला पाणी मिळूच शकणार नाही, आर्थिकदृष्ट्या तालुका सक्षम होणार नाही, विकासाची गंगा आपल्या दारी येणार नाही अशा नकारात्मक भूतकाळातून नांदगाव तालुका उन्नत भविष्याकडे वाटचाल करू शकणार आहे.. नारपारचे पाणी तालुक्याला संजीवनी देणारे ठरू शकते. ते आले तर पुढच्या पिढ्या सुखी होतील याची जाणीव झाल्याने तालुक्यात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. गेली दोन- अडीच वर्षे नारपारच्या पाण्याचा पाठपुरावा सुरू ठेवलेल्या नांदगाव तालुका पाणी संघर्ष समितीला केंद्र सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.नारपार प्रकल्पाच्या डीपीआरमध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश होण्यासाठी भूपृष्ठ वाहतूक व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला सूचित केले आहे. या संदर्भातील पत्र केंद्रीय जलसंसाधन विभागाचे विशेष अधिकारी यांच्याकडून पाणी संघर्ष समितीचे समाधान पाटील व डॉ. प्रभाकर पवार यांनी मिळविले असून, या लढ्यात सर्वपक्षीयांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.तालुक्यातील मोरझर परिसरात अत्यल्प पर्जन्यामुळे नागरिकांना स्थलांतराची वेळ आली आहे. पाणी कोठून आणता येईल, पर्जन्य विभाग काही मदत करू शकेल का याचा सन २०१५ पासून समितीने पाठपुरावा सुरू केला. तेव्हा नारपारमध्ये नांदगावचा समावेश करण्यात आलेला नव्हता. विविध शासकीय व प्रशासकीय स्तरावरील लोकांच्या गाठीभेटी घेत असताना नारपार प्रकल्पातून शाश्वत व कमी खर्चात पाणी मिळू शकते याची माहिती पाटील-पवार द्वयींना मिळाली. आंदोलने करून पाणी मागण्याआधी शास्त्रीय माहिती मिळवावी म्हणून अभियांत्रिकी ज्ञान व भौगोलिक चढउतार यांची माहिती संकलित करण्यात आली. आवश्यक नकाशे, समुद्रसपाटीपासूनची उंची यांचे कागद गोळा करत असताना तालुक्याच्या उंबरठ्यावरून दुसरीकडे जाणारा नारपार प्रकल्पाचा कालवा समोर आला. मनमाड अनकाईपासून जाणाऱ्या या कालव्याला टॅप केले तर? त्याची उंची ६२२ मीटर असल्याने व तालुक्यातील धरणे व गावांची उंची त्यापेक्षा कमी असल्याने गुरुत्वाकर्षणाने पाणी येऊ शकते हे स्पष्ट झाले.नारपारचा डीपीआर बनविण्यासाठी राष्ट्रीय जलनियामक प्राधिकरण, इंटरनशनल कन्सल्टंट इन वॉटर रिसोर्स पॉवर व इंफ्फ्रा. डेव्हलपमेंट या कंपन्या काम करत आहेत. नांदगावचा समावेश डीपीआरमध्ये करण्यात यावा असे केंद्र सरकारचे पत्र राज्य सरकारचे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल आणि तापी पाटबंधारे विभाग मंडळाचे कार्यकारी संचालक एस. डी. कुलकर्णी यांना प्राप्त झाले असून, संघर्ष समितीचे पाटील व पवार यांनी नुकतीच त्यांची भेट घेऊन पाठपुरावा केला आहे. डॉ. प्रवीण निकम, उदय पाटील हे त्यांच्यासह होते.तालुक्यात शेती सिंचनाचे प्रमाण फक्त ५ टक्के आहे. येथील खुंटलेल्या विकासात व शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीवरून त्याचे प्रतिबिंब दिसून येते. शेतीसाठी पाणी हा आजपर्यंत केवळ कल्पनाविलासच ठरला आहे. उपलब्ध माहितीनुसार नांदगाव तालुक्याचे दरडोई उत्पन्न आदिवासी तालुक्यांच्या बरोबरीने आहे. ही परिस्थिती नारपारच्या पाण्याने बदलू शकते. प्रशासनातल्या अधिकाºयांनी कालव्याला टॅप करून तालुक्यातील नाग्यासाक्या, दहेगाव, माणिकपुंज, मनमाड शहरासह अनेक छोटी धरणे, नद्या व नाले भरू शकतात याची पुष्टी केली. सध्या तालुक्यात पाणी साठवण क्षमता फक्त १.५ टीएमसी आहे. ती वाढवावी लागणार आहे.