शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नारळीकर यांच्यामुळे साहित्याला लाभेल वैज्ञानिक आयाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:23 IST

नाशिक : मराठी वाचकाला अवघ्या ब्रह्मांडाचे ज्ञान डॉ. नारळीकर यांनी दिले. त्यांच्या वैचारिक आणि विज्ञानवादी विचारांनी मराठी साहित्याला ...

नाशिक : मराठी वाचकाला अवघ्या ब्रह्मांडाचे ज्ञान डॉ. नारळीकर यांनी दिले. त्यांच्या वैचारिक आणि विज्ञानवादी विचारांनी मराठी साहित्याला वैचारिक दिशा देण्याचे कार्य केल्याने त्यांना मिळालेला संमेलनाध्यक्षपदाचा मान हा त्यांचा उचित गौरव आहे. आपणासारखा वैचारिक आणि विज्ञानवादी साहित्यिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभल्याने ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य विचाराला वैज्ञानिक आयाम देणारे ठरेल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री आणि साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

नाशिकमध्ये होणाऱ्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन संमेलनाचे निमंत्रण दिले. यावेळी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी नाशिक येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी भुजबळ म्हणाले की, विज्ञानात साक्षर करणारी, माहिती देणारी असंख्य पुस्तके असतात. परंतु, विज्ञानाला मानवी जगण्याचे नवे तत्त्व देऊन वाचकांना वैचारिक दिशा देण्याचे महत्त्वाचे काम डॉ. नारळीकर यांच्या साहित्याने केले असल्याचे सांगून डॉ. नारळीकर यांच्या वैज्ञानिक संशोधनपर कार्याचा आणि साहित्याचा गौरव केला. तसेच आम्ही सर्व नाशिककर आपल्या स्वागतासाठी अतिशय उत्सुक आहोत. आपल्या सुविद्य पत्नी मंगलाताई यांच्यासह आपणास संमेलनासाठी आमंत्रित करीत आहोत. नाशिकमध्ये आम्ही आपल्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. यावेळी श्रीमती मंगला नारळीकर, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, मुकुंद कुलकर्णी, दिलीप साळवेकर आदी उपस्थित होते.

इन्फो

सर्व भावभावनांच्याही पलीकडे जाऊन विज्ञानातील अद्भुत रहस्ये, मूलभूत तत्त्वे आणि त्याचा मानवी जगण्याशी असलेला कमालीचा उत्कट संबंध मराठी साहित्यप्रांतात अफाट क्षमतेने मांडला आहे. त्यातूनच मराठी साहित्याला एक सशक्त काळाच्या पुढची विलक्षण लखलखीत दिशा देण्याचे काम आपल्या लेखनाने केले आहे. सुमारे पाच दशकांहून अधिक काळ आपल्या लेखनाने मराठी वाचकांना विज्ञानविचारांनी समृद्ध करण्याचे कार्य केले असल्याचे सांगून भुजबळ यांनी डॉ. नारळीकर यांना अधिकृत निमंत्रणपत्र दिले.

फोटो

०४नारळीकर