शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नांदूरशिंगोटे आजपासून चार दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 14:45 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यात व परिसरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण गाव चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णयाची मंगळवार (दि. ७) पासून अंमलबजावणी केली जाणार असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी नांदूरशिंगोटे येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत गाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्दे ग्रामपंचायतीचा निर्णय : नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

सरपंच गोपाल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपसरपंच रंजना शेळके, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, दीपक बर्के, भारत दराडे, उत्तम बर्के, अनिल शेळके, निवृत्ती शेळके, पोलीस पाटील मनोहर शेळके, रामदास सानप, एकनाथ शेळके, अनिल पठारे, संतोष सानप, ग्रामविकास अधिकारी एस. डी. अहिरे, आरोग्यसेवक ए. बी. गांगुर्डे, तलाठी एस. डी. जाधव, भाऊपाटील दराडे आदी उपस्थित होते. नांदूरशिंगोटे येथे परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने बाहेरील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण होते. पाच ते सहा दिवसांत परिसरात कोरोना बाधित रु ग्णांची संख्या वाढल्याने त्याचा प्रसार आपल्या गावाकडे होऊ नये म्हणून प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी होती. यापूर्वीही नांदूरशिंगोटे गाव दोन ते तीन वेळा संपूर्णपणे लॉकडाऊन होते. शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने दुकानांमध्ये गर्दी वाढली होती. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली होती. दि. ७ ते १० जुलै हे चार दिवस नांदूरशिंगोटे गावात शंभर टक्के लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. दूध संकलन केंद्रे, पीठ गिरणी, मेडिकल, दवाखाने, गॅस एजन्सी आदी अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असून किराणा दुकान, खत दुकाने, भाजीपाला विक्र ी केंद्र बंद राहणार आहेत. केवळ आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेशी निगडीत आस्थापना सुरु राहतील, असे सरपंच गोपाल शेळके यांनी घोषित केले आहे. शासनाने लॉकडाऊनचे कालावधी वाढवून दिला याचा अर्थ परिस्थिती नियंत्रणात असली तरी गंभीर आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी अनावश्यकरित्या घराबाहेर पडणे प्रत्येकाने टाळावे. ग्रामपंचायत क्षेत्रात तोंडाला मास्क, रु माल न बांधता फिरणाऱ्यांवर शंभर रु पये दंड व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या