शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचा मृत साठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 18:49 IST

लासलगाव : लासलगावसह सोळा गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचा मृतसाठा शिल्लक असल्याने १५ ते २० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असून नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

ठळक मुद्देलासलगाव : टंचाईमुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

लासलगाव : लासलगावसह सोळा गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचा मृतसाठा शिल्लक असल्याने १५ ते २० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असून नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.पुढील आवर्तन साधारण एक महिन्यानंतर मिळणार असल्याने मे आणि जून या महिन्यांत पाणी सर्वांना जपून वापरावे लागणार आहे. त्याचे नियोजन आत्तापासून केले, तरच जूनच्या अखेरीसपर्यंत पाणी पुरेल, मात्र त्यासाठी प्रशासनासह नागरिकांची मानसिकता असणे गरजेचे आहे.निफाड तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणून नांदूरमध्यमेश्वरची ओळख आहे. या धरणातून लासलगाव सह १६ गाव पाणी योजना, म्हाळसाकोरे १२ गाव पाणी योजना तसेच विंचूर औद्योगिक वसाहतीसाठी व शेतकऱ्यांसाठी पाणी पुरवठा केला जातो.येथील ग्रामीण भागातील जनतेला दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने कमी-अधिक प्रमाणात अशी स्थिती सर्वत्रच दिसते. तालुक्यात दोन-तीन वर्षांपासून जलसंधारण अभियान सुरु आहे. यात जलयुक्त शिवार, शेततळी निर्माण करण्यात आली आहेत. तर बंधारे, नदी, कालवा, तलाव आदी ठिकाणी खोलीकरण करून त्यातील गाळ काढणे व पाणी साठवण क्षमता वाढण्यासाठी दरवर्षी जोरदार उपक्र म राबविले जातात. मात्र या अभियानापेक्षाही सद्यस्थितीत धरणातील पाण्याचे नियोजन करणे महत्वाचे आहे.यंदा होळीच्या आधीपासूनच वातावरणात उष्णता जाणवू लागली होती. पारा ३५ अंशाच्या वर चढल्याने गुढीपाडव्यानंतर सूर्य आग ओकत आहे त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी घटणार यात शंका नाही. यंदा ही स्थिती उद्भवू नये यासाठी सगळ्यांनी पाणी जपूनच वापरले पाहिजे.आवर्तनाचे नियोजन हवेउन्हाळा वाढला की शेतकरी शेतीसाठी आवर्तनाची मागणी करू लागतात व प्रशासनावर दबाब आणतात. त्यामुळे प्रशासनही पाणी सोडते. पण, पाणी सोडताना ते किती प्रमाणात आणि कसे सोडले पाहिजे याचे नियोजन हवे. नाहीतर शेतीला आणि पिण्याच्या पाण्यासाठी मात्र वणवण, अशी स्थिती दरवर्षी पहावयास मिळते. ती यंदा होऊ नये यासाठी धरणातील पाण्याचे नियोजन महत्वाचे ठरणार आहे.(फोटो १३ लासलगाव, १३ लासलगाव १)