शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचा मृत साठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 18:49 IST

लासलगाव : लासलगावसह सोळा गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचा मृतसाठा शिल्लक असल्याने १५ ते २० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असून नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

ठळक मुद्देलासलगाव : टंचाईमुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

लासलगाव : लासलगावसह सोळा गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचा मृतसाठा शिल्लक असल्याने १५ ते २० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असून नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.पुढील आवर्तन साधारण एक महिन्यानंतर मिळणार असल्याने मे आणि जून या महिन्यांत पाणी सर्वांना जपून वापरावे लागणार आहे. त्याचे नियोजन आत्तापासून केले, तरच जूनच्या अखेरीसपर्यंत पाणी पुरेल, मात्र त्यासाठी प्रशासनासह नागरिकांची मानसिकता असणे गरजेचे आहे.निफाड तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणून नांदूरमध्यमेश्वरची ओळख आहे. या धरणातून लासलगाव सह १६ गाव पाणी योजना, म्हाळसाकोरे १२ गाव पाणी योजना तसेच विंचूर औद्योगिक वसाहतीसाठी व शेतकऱ्यांसाठी पाणी पुरवठा केला जातो.येथील ग्रामीण भागातील जनतेला दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने कमी-अधिक प्रमाणात अशी स्थिती सर्वत्रच दिसते. तालुक्यात दोन-तीन वर्षांपासून जलसंधारण अभियान सुरु आहे. यात जलयुक्त शिवार, शेततळी निर्माण करण्यात आली आहेत. तर बंधारे, नदी, कालवा, तलाव आदी ठिकाणी खोलीकरण करून त्यातील गाळ काढणे व पाणी साठवण क्षमता वाढण्यासाठी दरवर्षी जोरदार उपक्र म राबविले जातात. मात्र या अभियानापेक्षाही सद्यस्थितीत धरणातील पाण्याचे नियोजन करणे महत्वाचे आहे.यंदा होळीच्या आधीपासूनच वातावरणात उष्णता जाणवू लागली होती. पारा ३५ अंशाच्या वर चढल्याने गुढीपाडव्यानंतर सूर्य आग ओकत आहे त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी घटणार यात शंका नाही. यंदा ही स्थिती उद्भवू नये यासाठी सगळ्यांनी पाणी जपूनच वापरले पाहिजे.आवर्तनाचे नियोजन हवेउन्हाळा वाढला की शेतकरी शेतीसाठी आवर्तनाची मागणी करू लागतात व प्रशासनावर दबाब आणतात. त्यामुळे प्रशासनही पाणी सोडते. पण, पाणी सोडताना ते किती प्रमाणात आणि कसे सोडले पाहिजे याचे नियोजन हवे. नाहीतर शेतीला आणि पिण्याच्या पाण्यासाठी मात्र वणवण, अशी स्थिती दरवर्षी पहावयास मिळते. ती यंदा होऊ नये यासाठी धरणातील पाण्याचे नियोजन महत्वाचे ठरणार आहे.(फोटो १३ लासलगाव, १३ लासलगाव १)