शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचा मृत साठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 18:49 IST

लासलगाव : लासलगावसह सोळा गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचा मृतसाठा शिल्लक असल्याने १५ ते २० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असून नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

ठळक मुद्देलासलगाव : टंचाईमुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

लासलगाव : लासलगावसह सोळा गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचा मृतसाठा शिल्लक असल्याने १५ ते २० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असून नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.पुढील आवर्तन साधारण एक महिन्यानंतर मिळणार असल्याने मे आणि जून या महिन्यांत पाणी सर्वांना जपून वापरावे लागणार आहे. त्याचे नियोजन आत्तापासून केले, तरच जूनच्या अखेरीसपर्यंत पाणी पुरेल, मात्र त्यासाठी प्रशासनासह नागरिकांची मानसिकता असणे गरजेचे आहे.निफाड तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणून नांदूरमध्यमेश्वरची ओळख आहे. या धरणातून लासलगाव सह १६ गाव पाणी योजना, म्हाळसाकोरे १२ गाव पाणी योजना तसेच विंचूर औद्योगिक वसाहतीसाठी व शेतकऱ्यांसाठी पाणी पुरवठा केला जातो.येथील ग्रामीण भागातील जनतेला दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने कमी-अधिक प्रमाणात अशी स्थिती सर्वत्रच दिसते. तालुक्यात दोन-तीन वर्षांपासून जलसंधारण अभियान सुरु आहे. यात जलयुक्त शिवार, शेततळी निर्माण करण्यात आली आहेत. तर बंधारे, नदी, कालवा, तलाव आदी ठिकाणी खोलीकरण करून त्यातील गाळ काढणे व पाणी साठवण क्षमता वाढण्यासाठी दरवर्षी जोरदार उपक्र म राबविले जातात. मात्र या अभियानापेक्षाही सद्यस्थितीत धरणातील पाण्याचे नियोजन करणे महत्वाचे आहे.यंदा होळीच्या आधीपासूनच वातावरणात उष्णता जाणवू लागली होती. पारा ३५ अंशाच्या वर चढल्याने गुढीपाडव्यानंतर सूर्य आग ओकत आहे त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी घटणार यात शंका नाही. यंदा ही स्थिती उद्भवू नये यासाठी सगळ्यांनी पाणी जपूनच वापरले पाहिजे.आवर्तनाचे नियोजन हवेउन्हाळा वाढला की शेतकरी शेतीसाठी आवर्तनाची मागणी करू लागतात व प्रशासनावर दबाब आणतात. त्यामुळे प्रशासनही पाणी सोडते. पण, पाणी सोडताना ते किती प्रमाणात आणि कसे सोडले पाहिजे याचे नियोजन हवे. नाहीतर शेतीला आणि पिण्याच्या पाण्यासाठी मात्र वणवण, अशी स्थिती दरवर्षी पहावयास मिळते. ती यंदा होऊ नये यासाठी धरणातील पाण्याचे नियोजन महत्वाचे ठरणार आहे.(फोटो १३ लासलगाव, १३ लासलगाव १)