शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

नंदीबैलाची ‘गुबूगुबू’ झाली कालबाह्य!

By admin | Updated: September 13, 2015 23:58 IST

सांग सांग भोलानाथ : नंदीवाल्यांची पुढची पिढी वळतेय शिक्षणाकडे

रामदास शिंदे, पेठ

हल्लीच्या विज्ञानयुगात भ्रमणध्वनीच्या गजराने सुरू होणारी पहाट पूर्वीच्या काळी वासुदेवाच्या टाळ चिपळ्याने व नंदीबैलाच्या गुबूगुबूने होत असे़ काळानुरूप या बाबी आता दुर्मीळ होत चालल्या असतानाच नंदीबैल घेऊन गावोगावी फिरणाऱ्यांनी तीन तीन पिढ्या या व्यवसायात खर्ची घातल्यानंतर त्यांची पुढची पिढी शिक्षणाकडे वळवली असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

सकाळच्या प्रहरी गावातील चौकाचौकात गुबूगुबूचा आवाज कानी पडताच घरातील बालगोपांळासह आबालवृद्धांची पावले अंगणी आलेल्या नंदीबैलाला पाहण्यासाठी आपसुकच वळायची़; मात्र काळाच्या ओघात सध्या नंदीबैल दिसेनासे झाले असून आधुनिकतेच्या जमान्यात नंदीबैल ही संस्कृतीच लोप पावत चालल्याचे दिसून येत आहे़ साधारणपणे खरीप हंगाम आल्यावर नंदीबैल गावात येत होते़ आपल्या धन्याच्या इशाऱ्यावर मान डोलावून नागरिकांचे भविष्य सांगणाऱ्या नंदीबैलावर जनतेची अपार श्रद्धा होती़ घरातील सुवासिनी सुपात धान्य आणून नंदीबैलाचे औक्षण करायच्या. त्याला धान्य खाऊ घालायच्या़ शिल्लक धान्य त्यांच्याच झुलीला शिवलेल्या खोळीत टाकीत नंदीबैलवाला कुळाचा उद्धार आणि सर्वांनाच चांगल्या आरोग्याची व भरभराटीची मागणी करायचा. पण हे चित्र आता दिसेनासे झाले आहे़ गावातील बालगोपाळ तर नंदीबैल गावात असेपर्यंत त्याच्या शेपटीला चिटकलेले दिसून येत़ ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय’ असे प्रश्न विचारल्यावर भोलानाथही अदबीने मान डोलावत प्रतिसाद देत असे़ सध्याच्या औद्योगिकीकरणाने विकसित झालेल्या समाजात नंदीबैलाचे दर्शनही दुर्मीळ झाले आहे़ शिवाय महागाईच्या जमान्यात नंदीबैलाच्या व्यवसायावर स्वत:सह कुटुंबाची गुजराण होत नसल्याने अनेकांनी परंपरागत चालू असलेल्या या व्यवसायाला मुठमाती दिली आहे़ पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर धान्य पिकत असल्याने नंदीबैल व त्याच्या मालकाकडे वर्षभर पुरेल इतके धान्य जमा होत असे़ आता तर जनतेलाच खरेदी करून धान्य वापरावे लागत असल्याने आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येईल अशी गत झाल्याने नंदीबैलवाल्यांचा व्यवसायही काळाच्या पडद्याआड गेला आहेत़नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील शिवाजी घोडे हे आपल्या कुटुंबातील चार कर्त्या पुरुषांसह गत पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील गावोगाव भटकंती करीत ही परंपरा जपत आहेत़; मात्र वाढत्या शहरीकरणामुळे आता नंदीबैलाचे आकर्षण कमी होत चालले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़ पूर्वजांचा पारंपरिक व्यवसाय म्हणून आम्ही यात पडलो मात्र आता आमच्या यापुढील पिढीला शिक्षणाकडे वळवले असल्याचेही घोडे सांगतात़ आजच्या माणसांकडे संपत्ती वाढली असली तरीही मने मात्र संकुचित होत असून नंदीबैलाचा व्यवसाय अडगळीत पडत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली़''आमच्या तीन चार पिढ्यांपासून नंदीबैलाचा खेळ केला जात असताना आता आमची मुले शाळा शिकू म्हणतात. पण त्यांना शासनाच्या कोणत्याच सुविधांचा लाभ मिळत नाही़ कायम भटकंती असल्यामुळे आमच्या जमातीला शासकीय सवलती मिळत नसल्याने शासनाने आमच्या मुलांना शिक्षणात व नोकरीत आरक्षण द्यावे. - शिवाजी घोडे, नंदीबैल मालक