शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी वाळू, वीटभट्ट्या नदीपात्रात

By admin | Updated: April 19, 2016 22:40 IST

विनापरवाना उपसा : तहसील प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

नांदगाव : शासकीय कारवाईचा धाक कुणालाच वाटत नाही. याचे कारण कमकुवत प्रशासन असा निष्कर्ष अनेकदा काढला जातो. स्मशानभूमी रस्त्यालगत थेट शाकांबरी नदीपात्रात फोफावणाऱ्या वीटभट्ट्या हे त्याचे एक उदाहरण ठरावे. तलाठी, मंडल अधिकारी दरवर्षी त्यासंदर्भातला अहवाल तहसीलदारांकडे पाठवतात. यंदाही तसेच घडले. नेमेचि येतात नोटिसा असे घडते; पण कारवाई होत नाही. त्यामुळे कायद्याचा धाक कोणालाच वाटत नाही.तलाठी संदीप सुरसुजे यांनी नदीपात्रातील भट्ट्यांच्या यंदा पाठवलेल्या अहवालात चार लाख विटांचा व १०० ब्रास मातीचा उल्लेख आहे. त्याची अंदाजे किंमत अडीच कोटी रुपये आहे.शाकांबरी नदीपात्रातील वाळूच्या विनापरवाना उपशाने खडक उघडे पडले; पण प्रशासन मात्र सुस्त पडले. त्यामुळे पाणी अडविण्याच्या कितीही योजना झाल्या तरी पाण्याचे दुर्भिक्ष्य तसेच राहणार असल्याने हा भाग सुजलाम् सुफलाम् हे दिवास्वप्नच ठरणार आहे.वाळू उपसणाऱ्यांकडे काणाडोळा व वीटभट्ट्यांना बेकायदेशीर संरक्षण देणारे तहसीलचे प्रशासन हा जलसंधारण प्रगतीच्या मार्गातला मोठा अडसर ठरत आहे. कितीही जलयुक्त शिवार योजना ओवाळून टाकल्या तरी येथील जनता पाणी... पाणी.... असा टाहो फोडत दुर्दैवी पाणीटंचाईला सामोरे जात एक दिवस लातूरसारख्या भीषण परिस्थितीला सामोरे जाईल, अशी स्थिती वाळू उपसणाऱ्यांनी केली आहे.खरं तर गेल्या काही वर्षांत वाळूचे लिलाव नांदगाव तालुक्यात झालेले नाहीत. भूगर्भ खात्याचा अहवाल या तालुक्यात वाळू नाही असे दर्शवितो; मात्र सुरू असलेल्या बांधकामांना वाळूचा पुरवठा कमी पडत नाही. येथे मांडवड (शाकांबरी नदी), सावरगाव (मन्याड नदी) हे दोन वाळूचे ज्ञात सोर्सेस आहेत. पण येथील अमर्याद वाळू उपशामुळे तेथेही वाळू शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे मिळेल तिथून ती उपसली जात असल्याने (त्यावर कुणाचाही अंकुश नसल्याने) खडक उघडे पडले आहेत. पाणी जिरण्यासाठी वाळूच राहिलेली नाही.यासंदर्भातले अगदी परवाचे उदाहरण, शाकांबरी नदीपात्रातल्या बेकायदेशीर वाळू उपशाचे लाइव्ह (जिवंत) चित्र व्हॉट्सअ‍ॅपवर तहसीलदारांना पाठविण्यात आले. ताबडतोब कारवाई करण्याचे आश्वासन देऊनही तहसीलदार किंंवा त्यांचे तलाठी, मंडळ अधिकारी पोहोचले नाहीत. ते पोहोचले मात्र ट्रॅक्टर तिथून निघून गेले तेव्हा. त्यानंतर दोन दिवस ‘पाहणी’ सुरू होती, अशी माहिती तहसीलदार अनिल गवांदे यांनी पत्रकारांना पुरवली. पंचनाम्याचा अहवाल आल्यानंतर त्यावर कारवाई करण्याचे सोडून, फेरपंचनाम्याचे तोंडी आदेश ही प्रशासनाची वेळकाढू भूमिका आहे. तसेच नैसर्गिक साधन संपत्तीच्या ऱ्हासाकडे अक्षम्य दुर्लक्ष करणारी आहे. यामुळे कारवाई करत असल्याचा देखावा व एकंदरीत धोरण संशय निर्माण करणारे आहे. (वार्ताहर)