शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

नांदगावच्या ‘त्या’ जमिनी अखेर मालकांकडे

By admin | Updated: March 31, 2017 01:23 IST

नाशिक :नवीन शर्तीच्या जमिनींचे व्यवहार बेकायदेशीर ठरवून त्या जमिनी शासन जमा करण्याचा मालेगावच्या तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांचा आदेश विभागीय आयुक्तांनी रद्द ठरविला.

नाशिक : नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तीच्या जमिनींचे व्यवहार बेकायदेशीर ठरवून त्या जमिनी शासन जमा करण्याचा मालेगावच्या तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांचा आदेश विभागीय आयुक्तांनी रद्द ठरविला असून, पवार यांच्या आदेशाच्या आधारे जमीनमालकांसह तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्यालाही त्यामुळे चपराक बसली आहे. या जमिनी मूळ मालकांकडे परत देण्यात आल्याने त्यांनी शासनाचा नजराणा बुडवून फसवणूक केल्याचा दावाही फोल ठरला असून, त्याचा परिणाम याबाबतच्या गुन्ह्णावर होणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ज्या जमीनमालकांवर लाचलुचपत कायद्यान्वये गुन्हा दाखल केला त्याच जमीनमालकांनी रामचंद्र पवार यांच्या जमिनी शासनजमा करण्याच्या निर्णयाविरुद्ध विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते.त्या अपिलाची सुनावणी नुकतीच पूर्ण होऊन गुरुवारी यासंदर्भातील निकाल देण्यात आला. या निकालात विभागीय अपर आयुक्त ज्योतिबा पाटील यांनी म्हटले आहे की, सदरच्या जमिनी इनामी आहेत की वतनी याचा उलगडा होत नसल्यामुळे त्याबाबत चौकशी करणे अपेक्षित असून, मालेगावचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांनी यासंदर्भातील दिलेले आदेश संदिग्ध व त्रोटक स्वरूपाचे असल्यामुळे जमीनमालकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी दिली जावी व पवार यांनी काढलेले शासन जमा आदेश रद्द ठरविण्यात येत आहेत. विभागीय आयुक्तांच्या या निर्णयामुळे नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तींच्या जमिनींबाबत गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटण्याची चिन्हे दिसू लागली असली तरी, या निर्णयामुळे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला मोठी चपराक बसली आहे. रामचंद्र पवार यांनी जमिनी शासन जमा केल्याचा धागा पकडूनच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने यासंदर्भात गुन्हा दाखल करून घेताना जमिनींच्या व्यवहारात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा नजराणा बुडवून फसवणूक केली, तसेच रकमेचा अपहार केल्याचा दावा गुन्ह्णात करण्यात आला आहे. मात्र विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निकालात या जमिनी इनामी आहेत की वतनाच्या याचा उलगडाच झालेला नसल्याने त्यांच्या खरेदी-विक्रीत शासनाच्या नजराणा रक्कम बुडविण्याचा किंवा फसवणूक करण्याचा प्रश्नच निर्माण होत नसताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा दावा न्यायालयात कितपत टिकेल, याविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे.