शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

नांदगावच्या ‘त्या’ जमिनी अखेर मालकांकडे

By admin | Updated: March 31, 2017 01:23 IST

नाशिक :नवीन शर्तीच्या जमिनींचे व्यवहार बेकायदेशीर ठरवून त्या जमिनी शासन जमा करण्याचा मालेगावच्या तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांचा आदेश विभागीय आयुक्तांनी रद्द ठरविला.

नाशिक : नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तीच्या जमिनींचे व्यवहार बेकायदेशीर ठरवून त्या जमिनी शासन जमा करण्याचा मालेगावच्या तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांचा आदेश विभागीय आयुक्तांनी रद्द ठरविला असून, पवार यांच्या आदेशाच्या आधारे जमीनमालकांसह तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्यालाही त्यामुळे चपराक बसली आहे. या जमिनी मूळ मालकांकडे परत देण्यात आल्याने त्यांनी शासनाचा नजराणा बुडवून फसवणूक केल्याचा दावाही फोल ठरला असून, त्याचा परिणाम याबाबतच्या गुन्ह्णावर होणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ज्या जमीनमालकांवर लाचलुचपत कायद्यान्वये गुन्हा दाखल केला त्याच जमीनमालकांनी रामचंद्र पवार यांच्या जमिनी शासनजमा करण्याच्या निर्णयाविरुद्ध विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते.त्या अपिलाची सुनावणी नुकतीच पूर्ण होऊन गुरुवारी यासंदर्भातील निकाल देण्यात आला. या निकालात विभागीय अपर आयुक्त ज्योतिबा पाटील यांनी म्हटले आहे की, सदरच्या जमिनी इनामी आहेत की वतनी याचा उलगडा होत नसल्यामुळे त्याबाबत चौकशी करणे अपेक्षित असून, मालेगावचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांनी यासंदर्भातील दिलेले आदेश संदिग्ध व त्रोटक स्वरूपाचे असल्यामुळे जमीनमालकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी दिली जावी व पवार यांनी काढलेले शासन जमा आदेश रद्द ठरविण्यात येत आहेत. विभागीय आयुक्तांच्या या निर्णयामुळे नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तींच्या जमिनींबाबत गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटण्याची चिन्हे दिसू लागली असली तरी, या निर्णयामुळे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला मोठी चपराक बसली आहे. रामचंद्र पवार यांनी जमिनी शासन जमा केल्याचा धागा पकडूनच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने यासंदर्भात गुन्हा दाखल करून घेताना जमिनींच्या व्यवहारात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा नजराणा बुडवून फसवणूक केली, तसेच रकमेचा अपहार केल्याचा दावा गुन्ह्णात करण्यात आला आहे. मात्र विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निकालात या जमिनी इनामी आहेत की वतनाच्या याचा उलगडाच झालेला नसल्याने त्यांच्या खरेदी-विक्रीत शासनाच्या नजराणा रक्कम बुडविण्याचा किंवा फसवणूक करण्याचा प्रश्नच निर्माण होत नसताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा दावा न्यायालयात कितपत टिकेल, याविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे.