शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

नांदगावी ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 00:57 IST

नांदगाव : कोट्यवधीच्या थकबाकीवरुन गिरणा धरणाचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्याने योजनेवरील नांदगाव शहरासह दोन लाखांहून अधिक ग्रामीण लोकसंख्येला पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याचा बाका प्रसंग उद‌्भवला आहे. त्यात सद्यस्थितीत सुरु असलेल्या पाणी पुरवठ्याची शुद्धता रामभरोसे असल्याने नांदगावकरांचे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या पाणीबाणीच्या संकटातून कधी मुक्तता होते, याकडे नांदगावकरांचे लक्ष लागून आहे.

ठळक मुद्देथकबाकीवरुन संघर्ष : शुद्धतेबाबत साशंकता; आरोग्य धोक्यात

सद्यस्थितीत नांदगावी ८० टक्के दहेगाव धरणाचे व २० टक्के माणिकपुंज धरणाचे पाणी व्हाया ह्यजलशुद्धीकरण प्रकल्पह्णद्वारे घरोघरी पोहोचविले जात आहे. आधुनिक जल शुद्धीकरण प्रक्रियेच्या तुलनेत कालबाह्य झालेला प्रकल्प चालविण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व तंत्रज्ञान माहिती नसताना तो चालविला जात आहे. त्यामुळे नांदगावकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेली दहा वर्षे दहेगाव धरण कोरडे असल्याने गिरणा धरणाच्या जलशुद्धीकरण प्रक्रियेतून आलेले पाणी नांदगावकर पित होते. नगरपरिषदेची पाणी पुरवठा करणारी बहुतांश यंत्रणा केवळ वितरण व्यवस्थेच्या कामावर मग्न होती. आज नळाला गिरणा धरणाचे पाणी येणार की दहेगाव/माणिकपुंजचे यावरून पिण्याचे वेगळे साठे करणारे नागरिक येईल ते पाणी पिण्यास हतबल झाले आहेत.दहेगाव मधून येणारे पाणी स्वच्छ दिसते. याठिकाणी आठवड्यातून एकदा तुरटी टाकली जाते अशी माहिती शुद्धीकरण केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून मिळाली. शुद्धीकरणाची प्रक्रिया राबविणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. पूर्वापार चालत आलेले डोस व केमिकल पुरविणारे यांच्या माहितीतून प्रकल्प राबविला जात आहे. नागरिकांना पाणी मिळावे या हेतूने पाणी पुरवठा कर्मचारी तुटपुंज्या संख्येने दिवस रात्र काम करत आहेत. धरणातून येणाऱ्या पाण्यात सुरूवातीला ब्लिचिंग पावडर टाकली जाते व नंतर सेटलिंग टाकीतून बाहेर जाणाऱ्या पाण्यात द्रवरूप क्लोरिन डायऑक्साईड टाकले जाते. पाणीपुरवठ्याबाबत गांभीर्य मात्र कुठल्याही यंत्रणेला नसल्याचे दिसून येत आहे. थकबाकीच्या विवादात सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा धोका उभा राहिल्यानंतर कागदी सोपस्कारात अडकलेली यंत्रणा व राजकारणात कुरघोडी करणाऱ्यांना मात्र याचे कसलेही सोयसुतक उरलेले नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.दर मंजुरीवरून घोडे अडलेह्यनाक दाबले की तोंड उघडतेह्ण या न्यायाने जिल्हा परिषद प्रशासनाने आर्थिक कारवाईचा बडगा उगारल्याने नगर परिषद प्रशासन कामाला लागले असले तरी अधिक रकमेचा दर मंजूर (आधीचा ३.४० व नवीन सुमारे ७.१५ रूपये) झाल्याशिवाय व मोठी रक्कम अदा केल्याशिवाय जिल्हा परिषदेकडून गिरणाचे पाणी मिळणार नाही. त्यामुळे नगरपरिषदेची बैठक तातडीने बोलावून निर्णय घेणे गरजेचे ठरले आहे. बैठकीत नवीन दर मंजूर झाला की रक्कम अदा करू अशी माहिती मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी दिली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीकपात