शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 00:57 IST

नांदगाव : कोट्यवधीच्या थकबाकीवरुन गिरणा धरणाचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्याने योजनेवरील नांदगाव शहरासह दोन लाखांहून अधिक ग्रामीण लोकसंख्येला पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याचा बाका प्रसंग उद‌्भवला आहे. त्यात सद्यस्थितीत सुरु असलेल्या पाणी पुरवठ्याची शुद्धता रामभरोसे असल्याने नांदगावकरांचे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या पाणीबाणीच्या संकटातून कधी मुक्तता होते, याकडे नांदगावकरांचे लक्ष लागून आहे.

ठळक मुद्देथकबाकीवरुन संघर्ष : शुद्धतेबाबत साशंकता; आरोग्य धोक्यात

सद्यस्थितीत नांदगावी ८० टक्के दहेगाव धरणाचे व २० टक्के माणिकपुंज धरणाचे पाणी व्हाया ह्यजलशुद्धीकरण प्रकल्पह्णद्वारे घरोघरी पोहोचविले जात आहे. आधुनिक जल शुद्धीकरण प्रक्रियेच्या तुलनेत कालबाह्य झालेला प्रकल्प चालविण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व तंत्रज्ञान माहिती नसताना तो चालविला जात आहे. त्यामुळे नांदगावकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेली दहा वर्षे दहेगाव धरण कोरडे असल्याने गिरणा धरणाच्या जलशुद्धीकरण प्रक्रियेतून आलेले पाणी नांदगावकर पित होते. नगरपरिषदेची पाणी पुरवठा करणारी बहुतांश यंत्रणा केवळ वितरण व्यवस्थेच्या कामावर मग्न होती. आज नळाला गिरणा धरणाचे पाणी येणार की दहेगाव/माणिकपुंजचे यावरून पिण्याचे वेगळे साठे करणारे नागरिक येईल ते पाणी पिण्यास हतबल झाले आहेत.दहेगाव मधून येणारे पाणी स्वच्छ दिसते. याठिकाणी आठवड्यातून एकदा तुरटी टाकली जाते अशी माहिती शुद्धीकरण केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून मिळाली. शुद्धीकरणाची प्रक्रिया राबविणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. पूर्वापार चालत आलेले डोस व केमिकल पुरविणारे यांच्या माहितीतून प्रकल्प राबविला जात आहे. नागरिकांना पाणी मिळावे या हेतूने पाणी पुरवठा कर्मचारी तुटपुंज्या संख्येने दिवस रात्र काम करत आहेत. धरणातून येणाऱ्या पाण्यात सुरूवातीला ब्लिचिंग पावडर टाकली जाते व नंतर सेटलिंग टाकीतून बाहेर जाणाऱ्या पाण्यात द्रवरूप क्लोरिन डायऑक्साईड टाकले जाते. पाणीपुरवठ्याबाबत गांभीर्य मात्र कुठल्याही यंत्रणेला नसल्याचे दिसून येत आहे. थकबाकीच्या विवादात सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा धोका उभा राहिल्यानंतर कागदी सोपस्कारात अडकलेली यंत्रणा व राजकारणात कुरघोडी करणाऱ्यांना मात्र याचे कसलेही सोयसुतक उरलेले नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.दर मंजुरीवरून घोडे अडलेह्यनाक दाबले की तोंड उघडतेह्ण या न्यायाने जिल्हा परिषद प्रशासनाने आर्थिक कारवाईचा बडगा उगारल्याने नगर परिषद प्रशासन कामाला लागले असले तरी अधिक रकमेचा दर मंजूर (आधीचा ३.४० व नवीन सुमारे ७.१५ रूपये) झाल्याशिवाय व मोठी रक्कम अदा केल्याशिवाय जिल्हा परिषदेकडून गिरणाचे पाणी मिळणार नाही. त्यामुळे नगरपरिषदेची बैठक तातडीने बोलावून निर्णय घेणे गरजेचे ठरले आहे. बैठकीत नवीन दर मंजूर झाला की रक्कम अदा करू अशी माहिती मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी दिली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीकपात