शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव मतदारसंघ : पडद्याआडच्या हालचालींबाबत उत्सुकता

By admin | Updated: August 20, 2014 00:46 IST

राजकीय ध्रुवीकरणाची प्रक्रिया गतिमान

संजीव धामणे ल्ल नांदगावमतदारसंघात उद्घाटनांच्या निमित्ताने निवडणूक जवळ आल्याचे सूतोवाच झाले. तसेच व्यासपीठावरील नेते मंडळींची उपस्थिती व गैरहजेरी नवीन राजकीय समीकरणांना जन्म देणारी ठरावी, अशी परिस्थिती आहे. राजकीय गप्पांनी रात्रीचे प्रहर उलटत आहेत. खरे किती खोटे किती हा भाग अलाहिदा असला तरी पडद्याआडच्या हालचाली जाणून घेण्यासाठी मंडळी ऊत्सुक आहेत.मातोश्री, वर्षा, रामटेकवर इच्छुकांनी पायधूळ झाडायला सुरुवात केल्याच्या वार्तांनी राजकीय ध्रुवीकरणास वेग येऊ लागला आहे. कालपरवापर्यंत भुजबळांच्या व्यासपीठावर दिसणारे, माजी आमदार संजय पवार यांनी, गेल्या चार वर्षात राष्ट्रवादीकडून काहीच(?) मिळाले नाही असा आक्षेप घेऊन राजीनामा दिल्याने ते यापुढे कोणत्या पक्षात जातील याची अटकळ बांधणे सुरू झाले आहे. शिवसेनेला अंतर्गत गटबाजीने पछाडले आहे. लोकसभा संघटक अ‍ॅड. जयंत सानप व उपजिल्हाप्रमुख नानाभाऊ शिंंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली असून, आता कोणाचा नंबर लागणार याची चर्चा आहे. इच्छुक उमेदवार सुहास कांदे यांच्या शिवसेनेतल्या वाढत्या प्रभावामुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. तालुकाप्रमुख संतोष गुप्ता व त्यांच्या पाठीराख्यांनी अलीकडे कांदे यांना उघड विरोध केला होता. तर मित्रपक्ष भाजपातर्फे मालेगावातल्या जिल्हा परिषदेच्या तीन गटांच्या बळावर अद्वय हिरे निवडणूक लढविण्याच्या मूडमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर जातीची समीकरणे प्रबळ होतांना दिसत असून, मराठा, माळी व वंजारी यापैकी कोण उमेदवार होणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळातल्या चर्चेचा गरमागरम विषय आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार पंकज भुजबळ यांच्या उमेदवारीसंदर्भात अनेक प्रवाद आहेत. परंतु या क्षणापर्यंत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. असे असले तरी ऐनवेळी काहीही होऊ शकते. पंकज भुजबळांपुढे प्रबळ मराठा उमेदवार हे एक मोठे आव्हान ठरू शकते. या गृहीतकावर डावपेच आखले जात असून, भुजबळांच्या गोटातूनही मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही माजी आमदारांनी शिवसेनेच्या तिकिटासाठी मातोश्री गाठल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांनी १९९५ मध्ये रिपाइंच्या तिकिटावर उमेदवारी केली होती. एरवी भुजबळांच्या व्यासपीठावर दिसणारे धात्रक शेवटच्या उद्घाटनांमध्ये दिसले नाहीत.पंकज भुजबळांची उमेदवारी हा मतदारसंघ सोडून दुसरीकडे शिफ्ट झाली तर काँग्रेस किंंवा शिवसेना यापैकी कोणत्याही पक्षाकडून मराठा उमेदवार उभा करण्यासाठी राजकीय उलथापालथीचे डावपेच सुरू आहेत. राजकीय ध्रुवीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली असली तरी गती रोखणाऱ्या ताकदींनी अद्याप सुरुवात केली आहे किंवा नाही हा कळीचा मुद्दा आहे.