शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

नांदगाव मतदारसंघ : पडद्याआडच्या हालचालींबाबत उत्सुकता

By admin | Updated: August 20, 2014 00:46 IST

राजकीय ध्रुवीकरणाची प्रक्रिया गतिमान

संजीव धामणे ल्ल नांदगावमतदारसंघात उद्घाटनांच्या निमित्ताने निवडणूक जवळ आल्याचे सूतोवाच झाले. तसेच व्यासपीठावरील नेते मंडळींची उपस्थिती व गैरहजेरी नवीन राजकीय समीकरणांना जन्म देणारी ठरावी, अशी परिस्थिती आहे. राजकीय गप्पांनी रात्रीचे प्रहर उलटत आहेत. खरे किती खोटे किती हा भाग अलाहिदा असला तरी पडद्याआडच्या हालचाली जाणून घेण्यासाठी मंडळी ऊत्सुक आहेत.मातोश्री, वर्षा, रामटेकवर इच्छुकांनी पायधूळ झाडायला सुरुवात केल्याच्या वार्तांनी राजकीय ध्रुवीकरणास वेग येऊ लागला आहे. कालपरवापर्यंत भुजबळांच्या व्यासपीठावर दिसणारे, माजी आमदार संजय पवार यांनी, गेल्या चार वर्षात राष्ट्रवादीकडून काहीच(?) मिळाले नाही असा आक्षेप घेऊन राजीनामा दिल्याने ते यापुढे कोणत्या पक्षात जातील याची अटकळ बांधणे सुरू झाले आहे. शिवसेनेला अंतर्गत गटबाजीने पछाडले आहे. लोकसभा संघटक अ‍ॅड. जयंत सानप व उपजिल्हाप्रमुख नानाभाऊ शिंंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली असून, आता कोणाचा नंबर लागणार याची चर्चा आहे. इच्छुक उमेदवार सुहास कांदे यांच्या शिवसेनेतल्या वाढत्या प्रभावामुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. तालुकाप्रमुख संतोष गुप्ता व त्यांच्या पाठीराख्यांनी अलीकडे कांदे यांना उघड विरोध केला होता. तर मित्रपक्ष भाजपातर्फे मालेगावातल्या जिल्हा परिषदेच्या तीन गटांच्या बळावर अद्वय हिरे निवडणूक लढविण्याच्या मूडमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर जातीची समीकरणे प्रबळ होतांना दिसत असून, मराठा, माळी व वंजारी यापैकी कोण उमेदवार होणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळातल्या चर्चेचा गरमागरम विषय आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार पंकज भुजबळ यांच्या उमेदवारीसंदर्भात अनेक प्रवाद आहेत. परंतु या क्षणापर्यंत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. असे असले तरी ऐनवेळी काहीही होऊ शकते. पंकज भुजबळांपुढे प्रबळ मराठा उमेदवार हे एक मोठे आव्हान ठरू शकते. या गृहीतकावर डावपेच आखले जात असून, भुजबळांच्या गोटातूनही मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही माजी आमदारांनी शिवसेनेच्या तिकिटासाठी मातोश्री गाठल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांनी १९९५ मध्ये रिपाइंच्या तिकिटावर उमेदवारी केली होती. एरवी भुजबळांच्या व्यासपीठावर दिसणारे धात्रक शेवटच्या उद्घाटनांमध्ये दिसले नाहीत.पंकज भुजबळांची उमेदवारी हा मतदारसंघ सोडून दुसरीकडे शिफ्ट झाली तर काँग्रेस किंंवा शिवसेना यापैकी कोणत्याही पक्षाकडून मराठा उमेदवार उभा करण्यासाठी राजकीय उलथापालथीचे डावपेच सुरू आहेत. राजकीय ध्रुवीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली असली तरी गती रोखणाऱ्या ताकदींनी अद्याप सुरुवात केली आहे किंवा नाही हा कळीचा मुद्दा आहे.