शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

नांदगाव मतदारसंघ : पडद्याआडच्या हालचालींबाबत उत्सुकता

By admin | Updated: August 20, 2014 00:46 IST

राजकीय ध्रुवीकरणाची प्रक्रिया गतिमान

संजीव धामणे ल्ल नांदगावमतदारसंघात उद्घाटनांच्या निमित्ताने निवडणूक जवळ आल्याचे सूतोवाच झाले. तसेच व्यासपीठावरील नेते मंडळींची उपस्थिती व गैरहजेरी नवीन राजकीय समीकरणांना जन्म देणारी ठरावी, अशी परिस्थिती आहे. राजकीय गप्पांनी रात्रीचे प्रहर उलटत आहेत. खरे किती खोटे किती हा भाग अलाहिदा असला तरी पडद्याआडच्या हालचाली जाणून घेण्यासाठी मंडळी ऊत्सुक आहेत.मातोश्री, वर्षा, रामटेकवर इच्छुकांनी पायधूळ झाडायला सुरुवात केल्याच्या वार्तांनी राजकीय ध्रुवीकरणास वेग येऊ लागला आहे. कालपरवापर्यंत भुजबळांच्या व्यासपीठावर दिसणारे, माजी आमदार संजय पवार यांनी, गेल्या चार वर्षात राष्ट्रवादीकडून काहीच(?) मिळाले नाही असा आक्षेप घेऊन राजीनामा दिल्याने ते यापुढे कोणत्या पक्षात जातील याची अटकळ बांधणे सुरू झाले आहे. शिवसेनेला अंतर्गत गटबाजीने पछाडले आहे. लोकसभा संघटक अ‍ॅड. जयंत सानप व उपजिल्हाप्रमुख नानाभाऊ शिंंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली असून, आता कोणाचा नंबर लागणार याची चर्चा आहे. इच्छुक उमेदवार सुहास कांदे यांच्या शिवसेनेतल्या वाढत्या प्रभावामुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. तालुकाप्रमुख संतोष गुप्ता व त्यांच्या पाठीराख्यांनी अलीकडे कांदे यांना उघड विरोध केला होता. तर मित्रपक्ष भाजपातर्फे मालेगावातल्या जिल्हा परिषदेच्या तीन गटांच्या बळावर अद्वय हिरे निवडणूक लढविण्याच्या मूडमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर जातीची समीकरणे प्रबळ होतांना दिसत असून, मराठा, माळी व वंजारी यापैकी कोण उमेदवार होणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळातल्या चर्चेचा गरमागरम विषय आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार पंकज भुजबळ यांच्या उमेदवारीसंदर्भात अनेक प्रवाद आहेत. परंतु या क्षणापर्यंत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. असे असले तरी ऐनवेळी काहीही होऊ शकते. पंकज भुजबळांपुढे प्रबळ मराठा उमेदवार हे एक मोठे आव्हान ठरू शकते. या गृहीतकावर डावपेच आखले जात असून, भुजबळांच्या गोटातूनही मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही माजी आमदारांनी शिवसेनेच्या तिकिटासाठी मातोश्री गाठल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांनी १९९५ मध्ये रिपाइंच्या तिकिटावर उमेदवारी केली होती. एरवी भुजबळांच्या व्यासपीठावर दिसणारे धात्रक शेवटच्या उद्घाटनांमध्ये दिसले नाहीत.पंकज भुजबळांची उमेदवारी हा मतदारसंघ सोडून दुसरीकडे शिफ्ट झाली तर काँग्रेस किंंवा शिवसेना यापैकी कोणत्याही पक्षाकडून मराठा उमेदवार उभा करण्यासाठी राजकीय उलथापालथीचे डावपेच सुरू आहेत. राजकीय ध्रुवीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली असली तरी गती रोखणाऱ्या ताकदींनी अद्याप सुरुवात केली आहे किंवा नाही हा कळीचा मुद्दा आहे.