शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव शहराची पाणीपट्टी थकबाकी ठरणार कळीचा मुद्दा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:35 IST

नांदगाव : वेळोवेळी सेस फंडातून आर्थिक संजीवनी मिळाल्याने तग धरून असलेल्या गिरणा धरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला यावेळी थकबाकीच्या मुद्यावर निधी देण्याचे जिल्हा परिषदेने नाकारल्याने सुमारे दोन लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. योजनेतून येणारे शुध्द पाणी मिळाले नाही. तर इतर स्रोतातून उपलब्ध असलेले ह्यविनाशुध्दीह्ण करणाचे पाणी नागरिकांमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पाणीपट्टीची थकबाकी हा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे प्रशासनाचे दुर्लक्ष : शुद्ध पाण्याअभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नगर परिषदेच्या सभागृहाचा ठराव नाही म्हणून ७.१५ रुपये प्रती हजार लीटर दराने पुढील रक्कम देण्यास तांत्रिक अडचण येत असल्याचा दावा मुख्याधिकारी पंकज गोसावी यांचा आहे. परिषदेच्या म्हणण्यानुसार ३.४० रुपये दराने पाणी पट्टीचा करार झाला आहे. मात्र २०१४ मध्ये मंत्रालयात नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या उच्चस्तरीय बैठकीत ७.१५ रुपये प्रमाणे नगर परिषदेने रक्कम अदा करावी असे ठरले होते, अशी माहिती कार्यकारी अभियंता सुनंदा नलावडे यांनी दिली. त्यानंतर दि. १० जानेवारी २०२१ पर्यंत पाणी पुरवठा सुरू होता. नलावडे यांच्या माहितीनुसार योजना चालविण्यासाठी महिन्याला २० लाख रुपये खर्च येतो. जि.प.च्या सेस निधीतून हा खर्च केला जातो. यंदा शासनाकडून निधी कमी आला. त्यात शहर व ग्रामीण भागाच्या थकबाकीची भर पडली. नांदगाव नगर परिषदेकडे १ कोटी ८७ लाख रुपये, मालेगाव (३९ गावे) विभागाकडे ३ कोटी ४७ लाख रुपये, नांदगाव (१७ गावे) विभागाकडे १ कोटी ९६ लाख रुपये अशी एकूण ७ कोटी ८० लाख रुपये थकबाकी असताना योजना चालविणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे.नेमके इंगित काय?दरवर्षी मार्च अखेरीस ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या शासकीय निधीतून काही रक्कम वळती करून पाणीपट्टीची बाकी भरून घेतली जाते. ग्रामपंचायतीकडे असलेली बाकी जिल्हा परिषद त्यांच्या निधीतून परस्पर वसूल करू शकते. तसे असेल तर त्यांचा पाणी पुरवठा का रोखण्यात आला, पाणी पुरवठा सुरू ठेवण्यास कोणती अडचण प्रशासनाला भासली. तसेच गेली सहा वर्षे ३.४० रुपये प्रती हजार लीटर या दराने नगर परिषदेच्या बिलाची रक्कम अदा केली जात होती व आज त्याच दराने संपूर्ण रक्कम नगर परिषदेने भरली आहे. तर पाणी पुरवठा बंद करण्यामागे नेमके कोणते इंगित आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :NashikनाशिकMuncipal Corporationनगर पालिका