शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नांदगावी शिवसेनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 14:41 IST

नांदगाव : वीज बिल माफीसह कांद्याला हमी भाव मिळावा यासह इतर मागण्यांसाठी नांदगाव तालुका शिवसेनेतर्र्फे गुरूवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

नांदगाव : वीज बिल माफीसह कांद्याला हमी भाव मिळावा यासह इतर मागण्यांसाठी नांदगाव तालुका शिवसेनेतर्र्फे गुरूवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, जिल्हाध्यक्ष सुहास कांदे यांनी केले. यावेळी शिवसैनिकांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. सरासरीच्या अवघे ४० टक्के पर्जन्यवृष्टी झाल्याने तालुक्यातील भूगर्भ जलपातळी खोल गेली असून अनेक गावांना जलशोष निर्माण झाला आहे. शासनाने नांदगाव तालुका गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या यादीत टाकला असला तरी अद्याप दुष्काळ जाहीर नाही. पिण्याच्या पाण्याचे टॅकर मंजुरीला तीन ते चार आठवडे लागतात. मंजुरी आल्यानंतर व टॅँकर हजर झाल्यानंतर त्याची फेरी निश्चिती करण्याला विलंब होत आहे. फेरी निश्चित करणे हा तहसीलदारांचा अधिकार आहे. मात्र तहसीलदार त्याला विलंब करत असल्याने ते जागेवरच उभे आहेत असा आरोप शिवसेना नेत्यांनी केला. मागण्यांमध्ये सात-बाराचा उतारा कोरा करावा यासह हेक्टरी ५० हजार रु पयांचे अनुदान, वीज बिल माफी, चारा छावण्या, कांद्याला हमी भाव, माणिकपुंज धरणातील पाटचाऱ्याची कामे व पाण्याचे योग्य वाटप, रोहयोची कामे, शालेय शुल्क माफी, नार पार योजनेत नांदगाव तालुक्याचा समावेश, तसेच विकासाच्या दृष्टीने आवश्यक विविध योजना सुरु कराव्यात अशा मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारला जाग यावी यांचा समावेश आहे.

टॅग्स :Nashikनाशिक