शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

नाईक शिक्षण संस्थेत ‘परिवर्तन’२९ पैकी २८ जागा पटकावल्या

By admin | Updated: July 23, 2014 00:25 IST

दिघोळे पराभूत; अध्यक्षपदी कोंडाजी आव्हाड

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत १५ वर्षांनंतर प्रथमच विद्यमान अध्यक्ष माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांना कोंडाजी आव्हाड यांच्याकडून ८३४ मतांनी पराभूत व्हावे लागले. कोंडाजी आव्हाड व हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने श्रीविजय पॅनलचा धुव्वा उडवित २९ पैकी २८ जागांवर विजय मिळविला. श्रीविजय पॅनलचे एकमेव विजयी उमेदवार नगरसेवक दामोदर मानकर यांनी अवघ्या एका मताने विनायक शेळके यांचा पराभव केला.सोमवारी सकाळी सुरू झालेली मतमोजणी मंगळवारी सकाळी सात वाजता संपली. विश्वस्त पदासाठीच्या सहा जागांसाठी परिवर्तनच्या बाळासाहेब गामणे (३६२४), विठ्ठलराव पालवे (३४२१), बबनराव सानप (३२८९), (पान ७ वर)अ‍ॅड. वाळीबा हाडपे (३२४१), डॉ. धर्माजी बोडके (३२४०) हे उमेदवार विजयी झाले, तर विनायक शेळके यांना श्रीविजयच्या दामोदर मानकर यांच्यापेक्षा (३०११) अवघे एक मत कमी पडल्याने पराभूत व्हावे लागले. नाशिक तालुका संचालक पदासाठी परिवर्तन पॅनलचे महेंद्र आव्हाड (३५५२), प्रकाश घुगे (३६३२), गोकुळ काकड (३६०५), माणिक सोनवणे (३४२४) यांनी श्रीविजयच्या चारही उमेदवारांना सहाशे ते नऊशे मतांनी पराभूत केले. निफाड तालुका संचालक पदासाठी परिवर्तन पॅनलचे उमेदवार बंडू नाना दराडे (३८२४), रामनाथ नागरे (३५३५), भगवान सानप (३५५०) यांनी श्रीविजयच्या उमेदवारांचा नऊशे ते बाराशे मतांनी पराभव केला. दिंडोरी संचालक पदासाठी परिवर्तन पॅनलचे कचरू आव्हाड (३७५६), शरद बोडके (३७१४) व यशवंत दरगोडे (३५३८) यांनी विजय मिळविला. येवला संचालक पदासाठी महेश आव्हाड (३७१५) व संपत वाघ (३५४२) यांनी विजय मिळविला. सिन्नर संचालक पदासाठी बाळासाहेब चकोर (३७५७), हेमंत नाईक (३६५२), सुदाम नवाळे (३३७१) यांनी, तर महिला राखीव गटातून कविता शिवाजी मानकर (३७३५) व शैलेजा अशोक बुरकूल (३४६७) यांनी विजय मिळविला. सहचिटणीस पदासाठी अ‍ॅड. तानाजी जायभावे यांनी सर्वाधिक ४३४३ मते मिळवून गोविंद साबळे यांचा २२११ मतांनी पराभव केला. सरचिटणीस पदासाठी परिवर्तनचे हेमंत धात्रक यांनी ४१०० मते मिळवित अ‍ॅड. पी. आर. गिते यांचा १८७५ मतांनी परावभ केला. उपाध्यक्ष पदासाठी परिवर्तनच्या प्रभाकर धात्रक यांनी ३५४८ मते घेत अ‍ॅड. विलास आंधळे यांचा ५३० मतांनी पराभव केला, तर सर्वाधिक चुरशीची अध्यक्षपदाची लढत होईल अशी अपेक्षा असताना, प्रत्यक्षात कोंडाजी आव्हाड यांनी ३६३५ मते घेत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांना ८३४ मतांनी पराभूत केले. सोमवारी सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेली मतमोजणी मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास संपली. मात्र सोमवारी मध्यरात्रीच विजयाचा कौल पाहता परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी विजयोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. मात्र, परिवर्तन पॅनलच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना हार-तुरे आणण्यास व गुलाल उधळण्यास मनाई करीत हा विजय स्व. गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली म्हणून घोषित केला. यावेळी परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार कोंडाजी आव्हाड, हेमंत धात्रक, माणिक सोनवणे, महेश आव्हाड, महेंद्र आव्हाड, बाळासाहेब गामणे, कविता शिवाजी मानकर यांच्यासह सर्वच उमेदवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)इन्फो..एक मताचा घोळविश्वस्तपदासाठी परिवर्तन पॅनलचे पाचही उमेदवार विजयाकडे आगेकूच करीत असताना विनायक शेळके व श्रीविजय पॅनलचे दामोदर मानकर यांच्यात सातव्या फेरीनंतर रस्सीखेच सुरू झाली. निकालाच्या सर्वात शेवटी दामोदर मानकर यांना ३०११, तर विनायक शेळके यांना ३०१० मते पडल्याने मानकर यांना निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. जालिंदर ताडगे यांनी विजयी घोषित करताच परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी त्यास तीव्र हरकत घेत दुबार मतमोजणीची मागणी केली. मात्र ताडगे यांनी ती फेटाळली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.सप्तशृंगीचे घेतले दर्शनपरिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांनी मंगळवारी (दि.२२) दुपारी वणी येथे जाऊन सप्तशृंगी देवीचे दर्शन केले. त्यानंतर बुधवारी (दि.२३) हे सर्व विजयी उमेदवार पदभार स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी निकालानंतर बहुतांश संचालकांनी दिवसभर आराम घेणे पसंत केले.