शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

नागासाक्या दुथडी भरुन वाहू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 15:19 IST

नांदगाव : सम्ततधार पावसामुळे तालुक्यातील मध्यम प्रकल्पातील नाग्यासाक्या धरण ओसंडून वाहू लागल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

नांदगाव : सम्ततधार पावसामुळे तालुक्यातील मध्यम प्रकल्पातील नाग्यासाक्या धरण ओसंडून वाहू लागल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील माणिकपुंज धरणासह अन्य लहान बंधारे भरून वाहू लागले असले तरी नाग्यासाक्या धरणात मात्र अपेक्षति असा जलसंचय झालेला नव्हता. मात्र, झालेल्या पावसाने धरण ओव्हर फ्लो झाल्याने लाभधारक शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसाळ्याच्या शेवटी दमदार पावसाने नाग्यासाक्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जलस्त्रोत वाहू लागल्याने गेल्या तीन वर्षांपासून न भरलेले नाग्यासाक्या धरण अखेरीस भरले. धरणाच्या सांडव्यावरून पाण्याने पांझण नदीच्या पात्राकडे झेप घेतली. नाग्यासाक्या धरण भरले नसल्याने डाव्या उजव्या कालव्यावरील सिंचनक्षेत्राला आवर्तन देतांना जलसंपदा विभागाला काटकसर करावी लागत होती. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण त्यात असल्यामुळे तालुक्याच्या बहुतांशी ग्रामीण भागाला टँकरने पाणीपुरवठा याच धरणाच्या मृत साठयातून होत असे. धरणात सध्या मोठ्या प्रमाणात साचलेला गाळामुळे पिण्याच्या पाण्याचाही पुरवठा अशुद्ध असा होत असे. शनिवारी नाग्यासाक्या परिसरातील पावसामुळे अखेर धरण भरले. आता पांझण नदी वाहू लागली आहे नदीकाठच्या विहिरी व अन्य लहान मोठ्या पाणी योजनांना त्यामुळे मोठा आधार झाला आहे. मालेगाव तालुक्यातील जेऊर, पाथर्डे, साकोरी, मळगाव, निमगुले आदी तर नांदगाव तालुक्यातील वाखारी, पिंप्राळे, साकोरा आदी गावांतील एकूण दोन हजार हेक्टरातील सिंचन क्षेत्राला या धरणाच्या पाण्यामुळे लाभ होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक